शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

पुण्याची झाली; कोल्हापूरची हद्दवाढ कधी ?

By admin | Updated: May 31, 2014 01:09 IST

आशा पल्लवित : जुलैपूर्वी अंतिम निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

कोल्हापूर : राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे कोल्हापूर शहराची एक इंचानेही हद्दवाढ झाली नाही. याउलट ठाणे व पुणे महापालिकेची पाच-पाचवेळा हद्दवाढ झाली. आता पुन्हा पुणे शहरात ३४ गावांचा समावेश होत आहे. त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ कधी होणार? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात कोल्हापूर महानगरपालिकेने हद्दवाढीच्या दिलेल्या प्रस्तावावर कोणत्याही परिस्थितीत जुलै २०१४ पर्यंत अंतिम निर्णय घेणे बंधनकारक आहे. माजी नगरसेवक सुनील मोदी व पांडुरंग आडसुळे यांनी हद्दवाढीबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला होता. राज्य शासनाने हद्दवाढीस अनुकूल असल्याचे प्रतिज्ञापत्र यापूर्वीच सादर केले आहे. पुण्याची हद्दवाढ झाल्याने आता कोल्हापूरकरांना हद्दवाढीचे वेध लागले आहेत. न्यायालयाने हद्दवाढीबाबत विचारताच राज्य शासनाने हद्दवाढ करण्यास उत्सुक असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, महापालिका सहकार्य करत नसल्याचा ठपका यामध्ये ठेवण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेनेही सर्व माहिती न्यायालयात सादर केली आहे. जुलै महिन्यापर्यंत हद्दवाढीबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. प्रत्येक नव्या गोष्टीस विरोध हा होतोच, गावांची इच्छा असो वा नसो राज्यशासन विशेष अधिकार वापरून अंतिम निर्णय घेऊ शकते. यासाठी गावांच्या नाहरकत दाखल्यांची गरज नाही, असे न्यायालयानेच स्पष्ट केल्याने हद्दवाढीच्या कोल्हापूकरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या १९ वर्षांत हद्दवाढीबाबत निर्णय झाला नाही. प्रत्येकवेळी हरकती व सूचनांचा खेळखंडोबा करण्यात आला. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे यावर निर्णय होत नव्हता. सरकार जबाबदारी टाळत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतरच न्यायालयाने हद्दवाढीबाबत डेडलाईन दिली.