शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पुण्याची झाली; कोल्हापूरची हद्दवाढ कधी ?

By admin | Updated: May 31, 2014 01:09 IST

आशा पल्लवित : जुलैपूर्वी अंतिम निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

कोल्हापूर : राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे कोल्हापूर शहराची एक इंचानेही हद्दवाढ झाली नाही. याउलट ठाणे व पुणे महापालिकेची पाच-पाचवेळा हद्दवाढ झाली. आता पुन्हा पुणे शहरात ३४ गावांचा समावेश होत आहे. त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ कधी होणार? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात कोल्हापूर महानगरपालिकेने हद्दवाढीच्या दिलेल्या प्रस्तावावर कोणत्याही परिस्थितीत जुलै २०१४ पर्यंत अंतिम निर्णय घेणे बंधनकारक आहे. माजी नगरसेवक सुनील मोदी व पांडुरंग आडसुळे यांनी हद्दवाढीबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला होता. राज्य शासनाने हद्दवाढीस अनुकूल असल्याचे प्रतिज्ञापत्र यापूर्वीच सादर केले आहे. पुण्याची हद्दवाढ झाल्याने आता कोल्हापूरकरांना हद्दवाढीचे वेध लागले आहेत. न्यायालयाने हद्दवाढीबाबत विचारताच राज्य शासनाने हद्दवाढ करण्यास उत्सुक असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, महापालिका सहकार्य करत नसल्याचा ठपका यामध्ये ठेवण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेनेही सर्व माहिती न्यायालयात सादर केली आहे. जुलै महिन्यापर्यंत हद्दवाढीबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. प्रत्येक नव्या गोष्टीस विरोध हा होतोच, गावांची इच्छा असो वा नसो राज्यशासन विशेष अधिकार वापरून अंतिम निर्णय घेऊ शकते. यासाठी गावांच्या नाहरकत दाखल्यांची गरज नाही, असे न्यायालयानेच स्पष्ट केल्याने हद्दवाढीच्या कोल्हापूकरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या १९ वर्षांत हद्दवाढीबाबत निर्णय झाला नाही. प्रत्येकवेळी हरकती व सूचनांचा खेळखंडोबा करण्यात आला. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे यावर निर्णय होत नव्हता. सरकार जबाबदारी टाळत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतरच न्यायालयाने हद्दवाढीबाबत डेडलाईन दिली.