शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोल्हापुरात विळखा, सोलापूरला इशारा; राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 07:05 IST

पंचगंगा ४५.५ फुटांवर, मराठवाड्यात हुलकावणी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ८३ मार्गांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर / सोलापूर  : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचा विळखा अद्याप कायम आहे. ‘राधानगरी’चे पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने पंचगंगा ४५.५ फुटांवरून वाहत आहे. 

  कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ८३ मार्गांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. निम्मा जिल्हा पुराच्या पाण्याने वेढल्याने दूध, भाजीपाला आवकेसह जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.  सोलापूर जिल्ह्यातही सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.  पावसामुळे भीमा व सीना नदीला पूर येण्याची शक्यता गृहित धरून  १०५  गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

सांगली : कृष्णेची पातळी ३८ फुटांवरशुक्रवारी सकाळी सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दुपारी १२ वाजेपर्यंत ३८ फुटांवर गेली होती. अनेक कुटुंबांनी स्थलांतर सुरू केले होते. दुपारपासून पावसाने उघडीप दिली.  कोयना धरणातून ३२ हजार १०० क्युसेकने विसर्ग चालू आहे.

 सातारा : जिल्ह्यात पाच दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंदावला आहे. २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला २६७ मिमी तर कोयनानगर येथे १९८ मिलीमीटर झाला. दरम्यान, कोयना धरणातील पाणीसाठा ८१ टीएमसीवर पोहोचला आहे. 

 रत्नागिरी :  जिल्ह्यातील नद्या अजूनही ‘ओव्हरफ्लो’आहेत. काही दिवसांत झालेल्या पावसामुळे नद्या, नाले भरलेले आहेत. खेडमधील जगबुडी, संगमेश्वरमधील शास्त्री आणि राजापूरमधील कोदवली नदी दुथडी वाहत आहेत. या नद्या सध्या इशारा पातळीवरच आहेत.

 छत्रपती संभाजीनगर दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे चार तालुक्यांतील २७२ गावांची तहान ३५५ टँकरद्वारे भागवली जात आहे. अजुनही जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक  पाऊस झालेला नाही.  

हिंगोली : औंढा नागनाथमधील सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने दिसाला. नंदुरबार :  नवापूर तालुक्यातील नद्यांना पूर आला असून रंगावली नदीचे पाणी सखल भागात शिरल्याने ४०० घरे बाधित झाली आहेत. नेसू नदीच्या पुरात एक जण वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. तालुक्याच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. 

 सिंधुदुर्ग  :  जिल्ह्यात दोन दिवस पावसाची अधूनमधून संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीपातळीत वाढ झाली असून, आता जिल्ह्यातील २२ धरणे १०० टक्के भरली आहेत. सर्वांत मोठ्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. 

‘पुणे : पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम घ्या’पुण्यात गुरुवारच्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचेती पुलाजवळील पाटील इस्टेट, एकतानगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांत पाणी शिरल्याने चिखल आणि घाण पसरली आहे. घरांमधील चिखलाची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला दिले. पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

टॅग्स :floodपूर