शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
3
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
4
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
5
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
6
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

गडहिंग्लजकरांनो सावधान, पाऊस होतोय निम्मा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:36 PM

गेल्या दोन वर्षांपासून गडहिंग्लज तालुक्यातील सरासरी पाऊसमान कमी होत आहे. यावर्षी मान्सूनच्या पावसाची सुरुवात वेळेवर झाली म्हणून काही मंडळी सुखावली असली तरी, शेतकरी मात्र चिंतेत आहे.

ठळक मुद्देपूर्वभाग दुष्काळी छायेत : दोन वर्षांपासून घटतेय पाऊसमान, ऊस उत्पादकांसह शेतकरी, शेतमजूर चिंतेत

राम मगदूम।गडहिंग्लज : गेल्या दोन वर्षांपासून गडहिंग्लज तालुक्यातील सरासरी पाऊसमान कमी होत आहे. यावर्षी मान्सूनच्या पावसाची सुरुवात वेळेवर झाली म्हणून काही मंडळी सुखावली असली तरी, शेतकरी मात्र चिंतेत आहे. विशेषत: हलकर्णी परिसर हा तालुक्याच्या पूर्वेकडील भाग अलिकडे दुष्काळी छायेत गेला आहे; म्हणूनच गडहिंंग्लजकरांनी सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे; मात्र, ९५ टक्के शेतकरी अल्प भू-धारक व अत्यल्प भू-धारक आहेत. त्यामुळे शेती, शेतमजुरी आणि दुग्धव्यवसाय यावरच त्यांची गुजरान अवलंबून आहे. अलिकडील दशकात चित्रीच्या पाण्यामुळे हिरण्यकेशी नदी बारमाही झाली तरी चित्रीच्या पाण्यालाही मर्यादा पडत आहेत.प्रामुख्याने ऊस, सोयाबीन, भुईमूग, मिरची व ज्वारी हीच पीके तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. चित्रीच्या पाण्यामुळे हिरण्यकेशी नदीकाठच्या गावात ऊस क्षेत्रात अलिकडे वाढ झाली असली तरी उर्वरित पिके पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत; त्यामुळेच वर्षागणिक कमी होणाऱ्या पावसामुळे ऊस उत्पादकांसह सर्वच शेतकरी व शेतमजूर चिंतेत आहेत.

गेल्या १० वर्षांतील तालुक्यातील सरासरी पर्जन्यमानावर नजर टाकल्यास दुष्काळी तालुक्याकडे आपली वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होते. अलिकडील १० पैकी ५ वर्षांतील पाऊस सरासरी १ हजार मिली लिटरच्या खालीच आहे. २०१५-१६ मध्ये सरासरी केवळ ५२१ मिली लिटर इतकाच पाऊस झाला; त्याचवेळी आपल्याला धोक्याचा इशारा मिळाला आहे.

या पार्श्वभूमीवरच गतवर्षीपासून तालुक्यात पाणीप्रश्नावरील चर्चा सुरू झाली आहे. दोन दशकांपासून रखडलेले उचंगी, आंबेओहळ, सर्फनाला या प्रकल्पांच्या पूर्ततेच्या मागणीने उचल खाल्ली आहे.चित्री प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या मागणीबरोबरच कर्नाटकातील हिडकल जलाशयाचे पाणी तेरणी-नरेवाडी तलावात आणण्याची मागणी सुरू झाली आहे. त्याला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याची गरज आहे.कर्नाटकप्रमाणे तलाव पुनर्रभरणाची गरज1 दरवर्षी पावसाळ्यात वाहून जाणाºया हिरण्यकेशी नदीच्या पाण्याने २२ तलाव पुनर्रभरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प कर्नाटक सरकारने गडहिंग्लज लगतच्या हुक्केरी तालुक्यात राबविला आहे. त्या धर्तीवर शासनातर्फे गडहिंग्लज तालुक्यातही असा प्रकल्प राबविणे आवश्यक आहे; त्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आहे.2 बटकणंगले येथे लोकसहभाग व श्रमदानातून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी चरी खुदाई, दगडी बांधबंदिस्ती, वनराई बंधारे आणि नाले-ओढ्यांच्या सफाईची मोहीम सुरू आहे. त्याप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक गावात पाऊस साठविण्याची चळवळ सुरू करण्याची गरज आहे.3 लोकसहभागातून जलयुक्त शिवारयोजना यशस्वीरित्या राबविण्याबरोबरच विहिरी आणि कुपनलिकांचे पुनर्रभरण व प्रत्येक कुटुंबाने पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये सक्रिय सहभागी होण्याची गरज आहे.चित्रीचे पाणी केवळ पिण्यासाठीच..!गेल्या दहा वर्षांतील पाऊसमान विचारात घेता यापुढेही अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात चित्रीचे पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याची वेळ येईल, असे जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर