शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उष्मा वाढला... तापमान ३४ डिग्रीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:12 IST

कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून शुक्रवारी ते ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. आगामी आठ दिवस तापमानात वाढ होत जाणार आहे. हळूहळू तापमानात वाढ होत असून फेबु्रवारीपासूनच हवामान तापू लागल्याने ऐन मार्च, एप्रिलमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, हा उष्मा नागरिकांना घामाघूम करणार हे निश्चित आहे.

ठळक मुद्देआठवड्यात पारा वाढतच जाणार मार्च, एप्रिलमध्ये घामाघूम करणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून शुक्रवारी ते ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. आगामी आठ दिवस तापमानात वाढ होत जाणार आहे. हळूहळू तापमानात वाढ होत असून फेबु्रवारीपासूनच हवामान तापू लागल्याने ऐन मार्च, एप्रिलमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, हा उष्मा नागरिकांना घामाघूम करणार हे निश्चित आहे.साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्याकडे तापमानात वाढ होत जाते. एप्रिल आणि मे महिन्यांत पारा ४० डिग्रीपर्यंत पोहोचतो. मात्र यंदा फेबु्वारीच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच तापमानात वाढ होत गेली. शुक्रवारी किमान तापमान १६ डिग्री, तर कमाल तापमान ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले होते. पहाटेपासून काहीसे गार वारे वाहत असले तरी सकाळी आठनंतर हळूहळू अंग तापू लागते.

दहानंतर घराबाहेर पडले तर अंगातून घामाच्या धारा येत राहतात. दुपारी बारा ते दोनपर्यंत तापमानात वाढ होत जाते. दुपारी दोन वाजता पारा ३४ डिग्रीपर्यंत पोहोचल्यानंतर अंग भाजू लागते. दुपारी घराबाहेर पडल्यानंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुचाकीवरून जाणाऱ्यांचे ‘सनकोट’, स्कार्फ, टोप्या बाहेर पडल्याचे दिसते. दुपारी तीननंतर पारा हळूहळू खाली येत जातो. सायंकाळी पाचनंतर वातावरण पुन्हा गार होत जाते.किमान तापमान नियंत्रणातकमाल तापमानात वाढ झाली असली तरी अद्याप किमान तापमान नियंत्रणात आहे. किमान तापमान १६ डिग्रीपर्यंत असल्याने सकाळी व रात्री फारसा उष्मा जाणवत नाही. मात्र पुढील आठवड्यापासून किमान तापमानातही वाढ होत असून ते २१ डिग्रीपर्यंत पोहोचणार आहे.

ऊसतोडणी मजुरांचा त्रास वाढलासाखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शिल्लक ऊस आहे तो अडचणीतील आहे. सकाळी आठनंतर उष्मा वाढत जात असल्याने ऊसतोडणी मजुरांना त्याचा त्रास होत आहे.

पिकांची पाण्याची मागणीही वाढलीतापमानवाढीचा परिणाम शेतीवरही झाला असून, पिकांची पाण्याची मागणीही वाढली आहे. जमीन तापू लागल्याने ऊस, भुईमूग, उन्हाळी भाताला जास्त पाणी लागत आहे. 

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर