शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
IND vs SA : सूर्यानं भरवसा दाखवला नाही! मॅचनंतर पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही! कारण...
4
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
6
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
7
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
8
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
9
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
10
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
11
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
12
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
13
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
14
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
15
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
16
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
17
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
18
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
19
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
20
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

उष्मा वाढला... तापमान ३४ डिग्रीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:12 IST

कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून शुक्रवारी ते ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. आगामी आठ दिवस तापमानात वाढ होत जाणार आहे. हळूहळू तापमानात वाढ होत असून फेबु्रवारीपासूनच हवामान तापू लागल्याने ऐन मार्च, एप्रिलमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, हा उष्मा नागरिकांना घामाघूम करणार हे निश्चित आहे.

ठळक मुद्देआठवड्यात पारा वाढतच जाणार मार्च, एप्रिलमध्ये घामाघूम करणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून शुक्रवारी ते ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. आगामी आठ दिवस तापमानात वाढ होत जाणार आहे. हळूहळू तापमानात वाढ होत असून फेबु्रवारीपासूनच हवामान तापू लागल्याने ऐन मार्च, एप्रिलमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, हा उष्मा नागरिकांना घामाघूम करणार हे निश्चित आहे.साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्याकडे तापमानात वाढ होत जाते. एप्रिल आणि मे महिन्यांत पारा ४० डिग्रीपर्यंत पोहोचतो. मात्र यंदा फेबु्वारीच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच तापमानात वाढ होत गेली. शुक्रवारी किमान तापमान १६ डिग्री, तर कमाल तापमान ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले होते. पहाटेपासून काहीसे गार वारे वाहत असले तरी सकाळी आठनंतर हळूहळू अंग तापू लागते.

दहानंतर घराबाहेर पडले तर अंगातून घामाच्या धारा येत राहतात. दुपारी बारा ते दोनपर्यंत तापमानात वाढ होत जाते. दुपारी दोन वाजता पारा ३४ डिग्रीपर्यंत पोहोचल्यानंतर अंग भाजू लागते. दुपारी घराबाहेर पडल्यानंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुचाकीवरून जाणाऱ्यांचे ‘सनकोट’, स्कार्फ, टोप्या बाहेर पडल्याचे दिसते. दुपारी तीननंतर पारा हळूहळू खाली येत जातो. सायंकाळी पाचनंतर वातावरण पुन्हा गार होत जाते.किमान तापमान नियंत्रणातकमाल तापमानात वाढ झाली असली तरी अद्याप किमान तापमान नियंत्रणात आहे. किमान तापमान १६ डिग्रीपर्यंत असल्याने सकाळी व रात्री फारसा उष्मा जाणवत नाही. मात्र पुढील आठवड्यापासून किमान तापमानातही वाढ होत असून ते २१ डिग्रीपर्यंत पोहोचणार आहे.

ऊसतोडणी मजुरांचा त्रास वाढलासाखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शिल्लक ऊस आहे तो अडचणीतील आहे. सकाळी आठनंतर उष्मा वाढत जात असल्याने ऊसतोडणी मजुरांना त्याचा त्रास होत आहे.

पिकांची पाण्याची मागणीही वाढलीतापमानवाढीचा परिणाम शेतीवरही झाला असून, पिकांची पाण्याची मागणीही वाढली आहे. जमीन तापू लागल्याने ऊस, भुईमूग, उन्हाळी भाताला जास्त पाणी लागत आहे. 

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर