शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

रताळे, खजूर, फळांची बाजारात रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 17:14 IST

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात रताळे, खजूर, फळांची रेलचेल वाढली आहे. आवक चांगली असली तरी मागणी वाढल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. दोन-तीन भाज्यांचा अपवाद वगळता इतर भाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत. कडधान्यांच्या दरात थोडी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देरताळे, खजूर, फळांची बाजारात रेलचेलभाजीपाल्याचे दर स्थिर : कडधान्यांच्या दरात थोडी वाढ

कोल्हापूर : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात रताळे, खजूर, फळांची रेलचेल वाढली आहे. आवक चांगली असली तरी मागणी वाढल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. दोन-तीन भाज्यांचा अपवाद वगळता इतर भाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत. कडधान्यांच्या दरात थोडी वाढ झाली आहे.रविवारपासून नवरात्रौत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांची रेलचेल बाजारात पाहावयास मिळत आहे. साधारणत: सफरचंद, मोसंबी, संत्री, केळी, चिक्कू या फळांना मागणी अधिक असते. त्यानुसार या फळांची आवक बाजारात अधिक असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात थोडी वाढ झाली आहे. सफरचंद किरकोळ बाजारात ६० पासून १०० रुपये किलोपर्यंत आहेत. पेरू ५० रुपये किलो, तर केळीचा दर ३० रुपये डझन आहे.

मोठ्या पेरूला चांगला दर असून तो साधारणत: १५० रुपये किलो आहे. रविवारी कोल्हापूर बाजार समितीत रताळ्यांची आवक २४५९ पोती झाली आहे. घाऊक बाजारात सरासरी ३० रुपये किलो दर असला तरी घाऊक बाजारात ४० ते ५० रुपये दर आहे. खजूरची आवकही चांगली आहे. प्रतवारीनुसार खजूरचा दर असून ६० पासून १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. नवरात्रौत्सवाचा पहिला दिवस असल्याने उपवासाच्या पदार्थांच्या खरेदीसाठी गर्दी दिसत होती.तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरांत काहीशी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो १००, तर हरभराडाळ ६५ रुपये दर आहे. शाबू ८० रुपयांवर स्थिर असून उर्वरित धान्याच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. परतीच्या पावसाने टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे आवक काहीशी कमी झाल्याने दर तेजीत आहेत.

किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये किलो दर आहे. ऐन उन्हाळ्यात लालभडक टोमॅटो १० रुपये किलो होता; पण आता पावसामुळे डागाळलेला टोमॅटोला दुप्पट पैसे द्यावे लागत आहेत. गवार, पापडी वाल, फ्लॉवरच्या दरात वाढ झाली आहे. मेथी १५, तर शेपू १० रुपये पेंढी आहे. ओल्या भुईमूग शेंगांची आवक सुरू असून ६० रुपये किलो दर आहे.

कांद्याचे दर घाऊक बाजारात प्रतिकिलो ४० रुपयांपर्यंत असून बटाट्याचे दर मात्र स्थिर राहिले आहेत. किरकोळ बाजारात बटाट्याचा दर २० रुपये किलो राहिला आहे. दसºयाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांची आवकही मोठ्या प्रमाणात आहे. दर १०० रुपये प्रतिकिलो आहे.सणासुदीच्या तोंडावर साखर तेजीतसाखरेला चांगला भाव मिळत असून, सध्या किरकोळ बाजारात ३८ ते ४० रुपये किलो दर आहे. दसरा आणि त्यानंतर येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखर तेजीत होण्याचे संकेत व्यापारी वर्गाकडून मिळत आहेत. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर