शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

लक्ष्मीपुरीतील रस्त्यावरून चालणेही झाले अवघड, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रस्ते उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 12:53 IST

आख्ख्या कोल्हापूरची भूक भागविणाऱ्या धान्यबाजाराचे अस्तित्व, करोडो रुपयांची होणारी उलाढाल, लाखो लोकांचा संपर्क, हजारो वाहनांची रहदारी असलेल्या लक्ष्मीपुरीसारख्या गजबजलेल्या परिसरातील सर्वच रस्ते अत्यंत खराब झाले असून, त्यांवरून वाहने हाकणे सोडाच; धड चालणेही मुश्किलीचे होऊन गेले आहे. पावसाळ्यात तर हा परिसर दलदलीतच बुडून जातो. गेल्या ४० वर्षांत येथील सर्व रस्त्यांना जर डांबर लागले नसेल तर महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला, कल्पकतेला आणि कार्यक्षमतेला जनतेने सलाम करावा लागेल.

ठळक मुद्देलक्ष्मीपुरीतील रस्त्यावरून चालणेही झाले अवघडअधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रस्ते उखडले

कोल्हापूर : आख्ख्या कोल्हापूरची भूक भागविणाऱ्या धान्यबाजाराचे अस्तित्व, करोडो रुपयांची होणारी उलाढाल, लाखो लोकांचा संपर्क, हजारो वाहनांची रहदारी असलेल्या लक्ष्मीपुरीसारख्या गजबजलेल्या परिसरातील सर्वच रस्ते अत्यंत खराब झाले असून, त्यांवरून वाहने हाकणे सोडाच; धड चालणेही मुश्किलीचे होऊन गेले आहे. पावसाळ्यात तर हा परिसर दलदलीतच बुडून जातो. गेल्या ४० वर्षांत येथील सर्व रस्त्यांना जर डांबर लागले नसेल तर महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला, कल्पकतेला आणि कार्यक्षमतेला जनतेने सलाम करावा लागेल.लक्ष्मीपुरीत ४० वर्षांपूर्वी रस्ते केले होते, असे त्या भागातील नागरिक, नगरसेवक सांगतात. त्यानंतर रस्त्यांवर कधीही डांबर टाकललेले नाही. खड्डे कधी बुजविले नाहीत. जयधवल बिल्डिंग ते चांदणी चौक, श्रमिक हॉल ते धवन भट्टी, धान्यबाजार ते पद्मा टॉकीजजवळील जैन मंदिर असे जवळपास दोन ते अडीच किलोमीटर अंतरातील रस्त्यांवर ‘डांबर दाखवा आणि लाख रुपये मिळवा’ अशी कोणी स्पर्धा घेतली तर तेथे कोणालाही डांबर असलेला रस्ता सापडणार नाही, इतकी वाईट अवस्था झाली आहे.लक्ष्मीपुरीत चारचाकी, दुचाकी वाहने चालविणे सोडाच; तेथून नागरिकांना चालत जातानाही अनेकांना पाय मुरगळून जखमी व्हावे लागले आहे. अनेक दुचाकी खड्ड्यांमुळे घसरल्याने नागरिक जखमी झाले आहेत. अनेकांच्या माना दुखावल्या आहेत. आजही या अवस्थेत फरक पडलेला नाही. हे दुखणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीस कधीच पडलेले नाही. बाजारपेठेत अधिकारी कधी फिरतीही करीत नाहीत. पावसाळ्यात तर अक्षरश: दलदल निर्माण झालेली असते. अशा स्थितीतच व्यापारी, हातगाडीवाले, भाजी विक्रेते व्यवसाय करीत असतात.या भागाच्या नगरसेविका मेहजबीन सुभेदार, निलोफर आजरेकर यांनी वारंवार लक्ष्मीपुरीतील रस्त्यांसाठी आवाज उठविला. गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून सुभेदार महासभेत भांडतात; परंतु अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्येकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे महिन्यापूर्वी येथील नागरिक, व्यापारी, विक्रेत्यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले होते. तेव्हाही एक महिन्याभरात रस्त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. अद्याप त्यावर काहीच झालेले नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिक मात्र मोठ्या यातना भोगत आहेत.

माझे घर विका, पण रस्ता करारस्त्याच्या कामासाठी नगरसेविका मेहजबीन सुभेदार गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत; परंतु जनतेच्या भावनेशी काहीही देणं-घेणं नसलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सतत निधी नसल्याचे कारण देऊन टोलविले. एके दिवशी महापालिका सभेत सुभेदार संतापल्या. ‘तुम्हाला निधी उपलब्ध होणार नसेल तर माझे घर विका आणि रस्ता करा’, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांच्या नकारात्मकतेवर प्रहार केला होता, तेव्हा कुठे रस्त्यांची एस्टिमेट झाले आणि नवीन वर्षाच्या अंदाजपत्रकात निधी धरण्याचे आश्वासन दिले गेले. 

 

आश्वासन पाळले नाहीहा रस्ता अत्यंत खराब झाल्याने तो मुख्य बाजारपेठेतील आहे यावर विश्वास बसत नाही. शहराच्या आमदारांनी आंदोलन केले नाही. मग नऊ वर्षे त्यांना का हा रस्ता दिसला नाही? रास्ता रोको केल्यानंतर अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत रस्ता करू, असे आश्वासन आमदारांना दिले; पण ते पाळले गेले नाही. ‘मी करतो मारल्यासारखे, तू कर रडल्यासारखे’ असा काही प्रकार आहे का, हेच कळत नाही. रस्ता लवकर करा हीच आमची मागणी आहे.- जे. बी. कामतलक्ष्मीपुरी

मार्चनंतर नगरसेवकपदाचा राजीनामालक्ष्मीपुरीतील रस्त्यांसाठी २८ लाखांचा खर्च येणार आहे. निधीची तरतूद नवीन अंदाजपत्रकात करून मार्चनंतर रस्ते केले जातील, असे अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. जर एप्रिलमध्ये रस्त्याची कामे सुरू झाली नाहीत तर आपण नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ. जर तीन-तीन वर्षे सातत्याने भांडत असूनही रस्ता होणार नसेल तर नगरसेवकपदावर राहून तरी काय उपयोग?- मेहजबीन सुभेदार,नगरसेविका 

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकkolhapurकोल्हापूर