शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्योत्तर काळातही २३ गावांना एसटीची प्रतीक्षा

By admin | Updated: March 14, 2016 23:42 IST

जिल्ह्यातील चित्र : प्रवासी करतात दररोज तीन-चार किलोमीटरची पायपीट

प्रदीप शिंदे - कोल्हापूर सर्वत्र ‘मेक इन इंडिया’चा जयघोष होत असतानाच स्वातंत्र्योत्तर काळानंतर आजही अनेक गावांत मूलभूत सुविधांची कमतरता कायम आहे. प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देण्याच्या घोषणा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बससेवेपासून अजूनही जिल्ह्यातील तब्ब्ल २३ गावे वंचित आहे. या गावांना एस.टी.ची सेवा पोहोचू शकत नसल्याने परिवहन महामंडळाचे ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रीदवाक्य केवळ कागदावरच पाहावयास मिळते. प्रवाशांना सुरक्षित व चांगल्या दर्जाच्या सुविधांसोबतच गावागावांत एस.टी. पोहोचविण्यासाठी ‘गाव तिथे एस.टी.’ची घोषणा देणाऱ्या महामंडळाची घोषणा फक्त घोषणाच राहिल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहण्यास मिळते. खराब रस्ते, कमी उत्पन्न, मुख्य रस्त्यापासून जवळ असलेले गाव यामुळे जिल्ह्यात अजूनही २३ गावांपर्यंत एस.टी. पोहोचू शकलेली नाही.डोंगराळ भागांतील गावोगावी आणि वाड्यावस्त्यांवर प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली असली तरी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे जाळे मात्र त्या तुलनेत आजही विणले गेलेले नाही. शिक्षणासाठी अजूनही येथील विद्यार्थ्यांच्या नशिबी पायपीट कायम आहे. उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा; दररोज पाच ते दहा किलोमीटर पायपीट विद्यार्थ्यांना चुकलेली नाही. याच गावांत एस. टी.ची सुविधा नसल्याने विद्यार्र्थी चालतच विद्यालयांमध्ये जातात. काहींच्या नशिबी १५ ते २० किलोमीटरची पायपीट कायम आहे. इतकेच नाही तर ज्या गावांत एस. टी. पोहोचते, त्या बसगाड्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे. सीट फाटलेली, दरवाजा नाही, खिडक्या तुटक्या अशा परिस्थितीत बसगाड्या चालविल्या जातात.काही गावे मुख्य रस्त्यापासून जवळ असल्याने गावांमध्ये बस जात नाही. त्यामुळे दोन-तीन किलोमीटर दररोजची पायपीट तेथील जनतेच्या नशिबी आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये दिवसभरात बसच्या केवळ दोन ते चार फेऱ्याच केल्या जातात. गावांमध्ये बससेवा नसल्याने ‘गाव तिथे एस.टी.’हे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या परिवहन महामंडळाची बस जिल्ह्यातील २३ गावांपर्यंत पोहोचू शकली नाही. यात मुख्य रस्त्यापासून जवळ असल्याने, ओढा किंवा नदीपत्रात असलेली गावे, रस्तेच नसलेले किंवा रस्त्यांची खराबी असलेले किंवा काही वाड्यावस्त्यांवर उत्पन्न मिळत नसलेल्या गावांमध्ये बसफेऱ्या केल्या जात नाहीत. गावांमध्ये एस. टी. बस नसल्याने शहरात येण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी, मजूर, नोकरदार यांना पायी दुसऱ्या गावात येऊन शहरात यावे लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवाशांना शहरात पोहोचावे लागत असते. त्यामुळे देश जरी स्वतंत्र झाला तरी आपणास कधी सुविधा मिळणार? अशी विचारणा येथील ग्रामस्थ करीत आहेत.या गावांना एस.टी.च नाही...आजरा आगार : चित्री धनगरवाडा, गारगोटी आगार : आंबवणे. मलकापूर आगार : आंबरडे, पणुंद्रे, कुरुगळे, गेळवडे, वरेवाडी, खोतवाडी (पिशवी), भाडळे, आमटेवाडी, वरकटवाडी. संभाजीनगर आगार : वाळुली, साळवाडी, देसाईवाडी, जाधववाडी, तांदूळवाडी. गडहिंग्लज आगार : दोनेवाडी (नेसरी). राधानगरी आगार : सोनाळी, औचितवाडी. कोल्हापूर आगार : मौजे वडगाव, सादळे-मादळे, कासारवाडी.