शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

स्वातंत्र्योत्तर काळातही २३ गावांना एसटीची प्रतीक्षा

By admin | Updated: March 14, 2016 23:42 IST

जिल्ह्यातील चित्र : प्रवासी करतात दररोज तीन-चार किलोमीटरची पायपीट

प्रदीप शिंदे - कोल्हापूर सर्वत्र ‘मेक इन इंडिया’चा जयघोष होत असतानाच स्वातंत्र्योत्तर काळानंतर आजही अनेक गावांत मूलभूत सुविधांची कमतरता कायम आहे. प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देण्याच्या घोषणा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बससेवेपासून अजूनही जिल्ह्यातील तब्ब्ल २३ गावे वंचित आहे. या गावांना एस.टी.ची सेवा पोहोचू शकत नसल्याने परिवहन महामंडळाचे ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रीदवाक्य केवळ कागदावरच पाहावयास मिळते. प्रवाशांना सुरक्षित व चांगल्या दर्जाच्या सुविधांसोबतच गावागावांत एस.टी. पोहोचविण्यासाठी ‘गाव तिथे एस.टी.’ची घोषणा देणाऱ्या महामंडळाची घोषणा फक्त घोषणाच राहिल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहण्यास मिळते. खराब रस्ते, कमी उत्पन्न, मुख्य रस्त्यापासून जवळ असलेले गाव यामुळे जिल्ह्यात अजूनही २३ गावांपर्यंत एस.टी. पोहोचू शकलेली नाही.डोंगराळ भागांतील गावोगावी आणि वाड्यावस्त्यांवर प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली असली तरी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे जाळे मात्र त्या तुलनेत आजही विणले गेलेले नाही. शिक्षणासाठी अजूनही येथील विद्यार्थ्यांच्या नशिबी पायपीट कायम आहे. उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा; दररोज पाच ते दहा किलोमीटर पायपीट विद्यार्थ्यांना चुकलेली नाही. याच गावांत एस. टी.ची सुविधा नसल्याने विद्यार्र्थी चालतच विद्यालयांमध्ये जातात. काहींच्या नशिबी १५ ते २० किलोमीटरची पायपीट कायम आहे. इतकेच नाही तर ज्या गावांत एस. टी. पोहोचते, त्या बसगाड्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे. सीट फाटलेली, दरवाजा नाही, खिडक्या तुटक्या अशा परिस्थितीत बसगाड्या चालविल्या जातात.काही गावे मुख्य रस्त्यापासून जवळ असल्याने गावांमध्ये बस जात नाही. त्यामुळे दोन-तीन किलोमीटर दररोजची पायपीट तेथील जनतेच्या नशिबी आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये दिवसभरात बसच्या केवळ दोन ते चार फेऱ्याच केल्या जातात. गावांमध्ये बससेवा नसल्याने ‘गाव तिथे एस.टी.’हे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या परिवहन महामंडळाची बस जिल्ह्यातील २३ गावांपर्यंत पोहोचू शकली नाही. यात मुख्य रस्त्यापासून जवळ असल्याने, ओढा किंवा नदीपत्रात असलेली गावे, रस्तेच नसलेले किंवा रस्त्यांची खराबी असलेले किंवा काही वाड्यावस्त्यांवर उत्पन्न मिळत नसलेल्या गावांमध्ये बसफेऱ्या केल्या जात नाहीत. गावांमध्ये एस. टी. बस नसल्याने शहरात येण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी, मजूर, नोकरदार यांना पायी दुसऱ्या गावात येऊन शहरात यावे लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवाशांना शहरात पोहोचावे लागत असते. त्यामुळे देश जरी स्वतंत्र झाला तरी आपणास कधी सुविधा मिळणार? अशी विचारणा येथील ग्रामस्थ करीत आहेत.या गावांना एस.टी.च नाही...आजरा आगार : चित्री धनगरवाडा, गारगोटी आगार : आंबवणे. मलकापूर आगार : आंबरडे, पणुंद्रे, कुरुगळे, गेळवडे, वरेवाडी, खोतवाडी (पिशवी), भाडळे, आमटेवाडी, वरकटवाडी. संभाजीनगर आगार : वाळुली, साळवाडी, देसाईवाडी, जाधववाडी, तांदूळवाडी. गडहिंग्लज आगार : दोनेवाडी (नेसरी). राधानगरी आगार : सोनाळी, औचितवाडी. कोल्हापूर आगार : मौजे वडगाव, सादळे-मादळे, कासारवाडी.