शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

स्वातंत्र्योत्तर काळातही २३ गावांना एसटीची प्रतीक्षा

By admin | Updated: March 14, 2016 23:42 IST

जिल्ह्यातील चित्र : प्रवासी करतात दररोज तीन-चार किलोमीटरची पायपीट

प्रदीप शिंदे - कोल्हापूर सर्वत्र ‘मेक इन इंडिया’चा जयघोष होत असतानाच स्वातंत्र्योत्तर काळानंतर आजही अनेक गावांत मूलभूत सुविधांची कमतरता कायम आहे. प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देण्याच्या घोषणा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बससेवेपासून अजूनही जिल्ह्यातील तब्ब्ल २३ गावे वंचित आहे. या गावांना एस.टी.ची सेवा पोहोचू शकत नसल्याने परिवहन महामंडळाचे ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रीदवाक्य केवळ कागदावरच पाहावयास मिळते. प्रवाशांना सुरक्षित व चांगल्या दर्जाच्या सुविधांसोबतच गावागावांत एस.टी. पोहोचविण्यासाठी ‘गाव तिथे एस.टी.’ची घोषणा देणाऱ्या महामंडळाची घोषणा फक्त घोषणाच राहिल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहण्यास मिळते. खराब रस्ते, कमी उत्पन्न, मुख्य रस्त्यापासून जवळ असलेले गाव यामुळे जिल्ह्यात अजूनही २३ गावांपर्यंत एस.टी. पोहोचू शकलेली नाही.डोंगराळ भागांतील गावोगावी आणि वाड्यावस्त्यांवर प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली असली तरी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे जाळे मात्र त्या तुलनेत आजही विणले गेलेले नाही. शिक्षणासाठी अजूनही येथील विद्यार्थ्यांच्या नशिबी पायपीट कायम आहे. उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा; दररोज पाच ते दहा किलोमीटर पायपीट विद्यार्थ्यांना चुकलेली नाही. याच गावांत एस. टी.ची सुविधा नसल्याने विद्यार्र्थी चालतच विद्यालयांमध्ये जातात. काहींच्या नशिबी १५ ते २० किलोमीटरची पायपीट कायम आहे. इतकेच नाही तर ज्या गावांत एस. टी. पोहोचते, त्या बसगाड्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे. सीट फाटलेली, दरवाजा नाही, खिडक्या तुटक्या अशा परिस्थितीत बसगाड्या चालविल्या जातात.काही गावे मुख्य रस्त्यापासून जवळ असल्याने गावांमध्ये बस जात नाही. त्यामुळे दोन-तीन किलोमीटर दररोजची पायपीट तेथील जनतेच्या नशिबी आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये दिवसभरात बसच्या केवळ दोन ते चार फेऱ्याच केल्या जातात. गावांमध्ये बससेवा नसल्याने ‘गाव तिथे एस.टी.’हे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या परिवहन महामंडळाची बस जिल्ह्यातील २३ गावांपर्यंत पोहोचू शकली नाही. यात मुख्य रस्त्यापासून जवळ असल्याने, ओढा किंवा नदीपत्रात असलेली गावे, रस्तेच नसलेले किंवा रस्त्यांची खराबी असलेले किंवा काही वाड्यावस्त्यांवर उत्पन्न मिळत नसलेल्या गावांमध्ये बसफेऱ्या केल्या जात नाहीत. गावांमध्ये एस. टी. बस नसल्याने शहरात येण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी, मजूर, नोकरदार यांना पायी दुसऱ्या गावात येऊन शहरात यावे लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवाशांना शहरात पोहोचावे लागत असते. त्यामुळे देश जरी स्वतंत्र झाला तरी आपणास कधी सुविधा मिळणार? अशी विचारणा येथील ग्रामस्थ करीत आहेत.या गावांना एस.टी.च नाही...आजरा आगार : चित्री धनगरवाडा, गारगोटी आगार : आंबवणे. मलकापूर आगार : आंबरडे, पणुंद्रे, कुरुगळे, गेळवडे, वरेवाडी, खोतवाडी (पिशवी), भाडळे, आमटेवाडी, वरकटवाडी. संभाजीनगर आगार : वाळुली, साळवाडी, देसाईवाडी, जाधववाडी, तांदूळवाडी. गडहिंग्लज आगार : दोनेवाडी (नेसरी). राधानगरी आगार : सोनाळी, औचितवाडी. कोल्हापूर आगार : मौजे वडगाव, सादळे-मादळे, कासारवाडी.