शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

स्वातंत्र्योत्तर काळातही २३ गावांना एसटीची प्रतीक्षा

By admin | Updated: March 14, 2016 23:42 IST

जिल्ह्यातील चित्र : प्रवासी करतात दररोज तीन-चार किलोमीटरची पायपीट

प्रदीप शिंदे - कोल्हापूर सर्वत्र ‘मेक इन इंडिया’चा जयघोष होत असतानाच स्वातंत्र्योत्तर काळानंतर आजही अनेक गावांत मूलभूत सुविधांची कमतरता कायम आहे. प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देण्याच्या घोषणा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बससेवेपासून अजूनही जिल्ह्यातील तब्ब्ल २३ गावे वंचित आहे. या गावांना एस.टी.ची सेवा पोहोचू शकत नसल्याने परिवहन महामंडळाचे ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रीदवाक्य केवळ कागदावरच पाहावयास मिळते. प्रवाशांना सुरक्षित व चांगल्या दर्जाच्या सुविधांसोबतच गावागावांत एस.टी. पोहोचविण्यासाठी ‘गाव तिथे एस.टी.’ची घोषणा देणाऱ्या महामंडळाची घोषणा फक्त घोषणाच राहिल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहण्यास मिळते. खराब रस्ते, कमी उत्पन्न, मुख्य रस्त्यापासून जवळ असलेले गाव यामुळे जिल्ह्यात अजूनही २३ गावांपर्यंत एस.टी. पोहोचू शकलेली नाही.डोंगराळ भागांतील गावोगावी आणि वाड्यावस्त्यांवर प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली असली तरी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे जाळे मात्र त्या तुलनेत आजही विणले गेलेले नाही. शिक्षणासाठी अजूनही येथील विद्यार्थ्यांच्या नशिबी पायपीट कायम आहे. उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा; दररोज पाच ते दहा किलोमीटर पायपीट विद्यार्थ्यांना चुकलेली नाही. याच गावांत एस. टी.ची सुविधा नसल्याने विद्यार्र्थी चालतच विद्यालयांमध्ये जातात. काहींच्या नशिबी १५ ते २० किलोमीटरची पायपीट कायम आहे. इतकेच नाही तर ज्या गावांत एस. टी. पोहोचते, त्या बसगाड्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे. सीट फाटलेली, दरवाजा नाही, खिडक्या तुटक्या अशा परिस्थितीत बसगाड्या चालविल्या जातात.काही गावे मुख्य रस्त्यापासून जवळ असल्याने गावांमध्ये बस जात नाही. त्यामुळे दोन-तीन किलोमीटर दररोजची पायपीट तेथील जनतेच्या नशिबी आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये दिवसभरात बसच्या केवळ दोन ते चार फेऱ्याच केल्या जातात. गावांमध्ये बससेवा नसल्याने ‘गाव तिथे एस.टी.’हे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या परिवहन महामंडळाची बस जिल्ह्यातील २३ गावांपर्यंत पोहोचू शकली नाही. यात मुख्य रस्त्यापासून जवळ असल्याने, ओढा किंवा नदीपत्रात असलेली गावे, रस्तेच नसलेले किंवा रस्त्यांची खराबी असलेले किंवा काही वाड्यावस्त्यांवर उत्पन्न मिळत नसलेल्या गावांमध्ये बसफेऱ्या केल्या जात नाहीत. गावांमध्ये एस. टी. बस नसल्याने शहरात येण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी, मजूर, नोकरदार यांना पायी दुसऱ्या गावात येऊन शहरात यावे लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवाशांना शहरात पोहोचावे लागत असते. त्यामुळे देश जरी स्वतंत्र झाला तरी आपणास कधी सुविधा मिळणार? अशी विचारणा येथील ग्रामस्थ करीत आहेत.या गावांना एस.टी.च नाही...आजरा आगार : चित्री धनगरवाडा, गारगोटी आगार : आंबवणे. मलकापूर आगार : आंबरडे, पणुंद्रे, कुरुगळे, गेळवडे, वरेवाडी, खोतवाडी (पिशवी), भाडळे, आमटेवाडी, वरकटवाडी. संभाजीनगर आगार : वाळुली, साळवाडी, देसाईवाडी, जाधववाडी, तांदूळवाडी. गडहिंग्लज आगार : दोनेवाडी (नेसरी). राधानगरी आगार : सोनाळी, औचितवाडी. कोल्हापूर आगार : मौजे वडगाव, सादळे-मादळे, कासारवाडी.