शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

प्रतीक्षा संपली; वीज जोडण्या सुरू

By admin | Published: February 16, 2017 12:03 AM

साडेतीन हजार वीज मीटर : महिनाअखेरपर्यंत सर्व जोडण्या पूर्ण; तीन वर्षांत दीड लाख मीटर जोडली

कोल्हापूर : जिल्ह्यातील सुमारे २०१२ पासून प्रलंबित असणाऱ्या विविध प्रकारांतील सुमारे ११ हजार ९३२ वीज जोडण्या मीटरच्या प्रतीक्षेत होत्या. त्यामध्ये घरगुती जोडण्यांची संख्या सुमारे ३८७१ होती, पण ‘प्रकाशगड’ कार्यालयाकडून आता कोल्हापूरवर प्रकाश पडला आहे. सुमारे साडेतीन हजार विजेची नवीन मीटर कोल्हापूर महावितरण कार्यालाकडे प्राप्त झाली आहेत. त्यामुळे वीज जोडण्यांची प्रतीक्षा संपली. ‘महावितरण’कडे घरगुती, दारिद्र्यरेषेखालील, व्यावसायिक, औद्योगिक, यंत्रमाग, कृषीपंप, सामाजिक नळ पाणीपुरवठा, पथदिवे व इतर अशा विविध प्रकारांतील ग्राहक वीज जोडण्या प्रतीक्षेत आहेत. अशा प्रतीक्षेतील ग्राहकांची एकूण संख्या ११ हजार ९३२ इतकी आहे. या ग्राहकांकडे प्रकाशगड कार्यालयाने लक्ष दिल्याने गेल्याच आठवड्यात सुमारे साडेतीन हजार वीज मीटर जोडण्यासाठी पाठविली आहेत. येत्या दोन दिवसांत या वीज मीटर जोडण्यांचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळ प्रतीक्षेत असलेल्या वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांत ‘महावितरण’कडून कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १ लाख ५६ हजार ८१२ वीज जोडण्या झालेल्या आहेत. २०१६ पर्यंत सर्व प्रकारांत सुमारे ६६८९ वीज जोडण्या प्रतीक्षेत होत्या. त्यामध्ये २८५३ घरगुती वीज मीटर जोडण्या ग्राहकांचा समावेश आहे, तर कृषीपंपसाठी २८९४ ग्राहक वीज मीटर जोडण्याच्या प्रतीक्षेत होते. यंदाच्या घरगुती वीज मीटर जोडण्या ग्राहकांच्या संख्येत डिसेंबर २०१६, जानेवारी २०१७ मध्ये अचानक संख्या वाढ झाली आहे. गेल्याच आठवड्यात ‘प्रकाशगड’ कार्यालयाकडून सुमारे साडेतीन हजार घरगुती वीज मीटर कोल्हापूर जिल्हा कार्यालयाकडे प्राप्त झाली आहेत. त्यामुळे प्रलंबित असणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांच्या घरी मीटर बसणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. ही सर्व मीटर जोडण्या सुरू असतानाच दुसऱ्या टप्प्यातील प्रलंबित मीटरही आठवड्यात येणार आहे. त्यामुळे प्रतीक्षेतील सर्व वीज जोडण्यांची कामे फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत.कृषी पंपांचीही काही कनेक्शन देण्यात आलेली नाहीत, पण ज्या कृषीपंपासाठी पोल उभे करण्याची गरज नाही अशा कृषी पंप ग्राहकाला तातडीने वीज जोडणी करण्याचे काम सुरू आहे. यासाठी ‘महावितरण’कडे मुबलक प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत, पण कृषीपंपापासून काही अंतरावर पोल उभे करण्यासाठी येणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात आणि ‘महावितरण’ला करावा लागणार आहे; पण या खर्चाची तरतूद अद्याप झाली नसल्याने अशी अनेक कृषीपंप कनेक्शन प्रतीक्षेत राहिली आहेत. तीन वर्षांत दीड लाख जोडण्या पूर्णगेल्या तीन वर्षांत सुमारे १ लाख ५६ हजार ८१२ वीज जोडण्या ‘महावितरण’कडून कोल्हापूर जिल्ह्यात केल्या आहेत. त्यामध्ये घरगुती ग्राहकांची संख्या सुमारे १ लाख ५ हजार ९६२ इतकी आहे, तर औद्योगिक ग्राहकांची संख्या १६ हजार ९८०, तर कृषी पंपधारकांची संख्या २३ हजार ९४५ इतकी आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत घरगुती वीज ग्राहकांची संख्या अचानक वाढली. यासाठी सुमारे साडेतीन हजार वीज मीटर ‘महावितरण’ला प्राप्त झाल्याने ही प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या पंधरा दिवसांत सर्व घरगुती वीज जोडण्या केल्या जातील. कृषी पंपासाठीही ज्या ठिकाणी पोल उभे करण्याची आवश्यकता नाही तेथे त्वरित वीज मीटर देण्याचे आदेश दिले आहेत. - जितेंद्र सोनवणे, प्रभारी मुख्य अभियंता महावितरण, कोल्हापूर परिमंडल