शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

जयसिंगपूर ग्रामीण रुग्णालयाची प्रतीक्षा संपेना

By admin | Updated: October 9, 2015 00:45 IST

साडेचार कोटींचा निधी पडून : जागा हस्तांतरणाचा प्रश्न शासन दरबारी रखडला

संदीप बावचे -- जयसिंगपूर--शिक्षण संस्थांनंतर आरोग्याची पंढरी म्हणून जयसिंगपूरची ओळख आहे. सांगली, मिरजेइतकीच आरोग्य सेवा खासगी स्वरूपात याठिकाणी मिळते. शासकीय यंत्रणेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र असले, तरी दोन वर्षांपूर्वी याठिकाणी ग्रामीण रुग्णालयासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, जागेच्या मंजुरीअभावी येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या वर्षभरापासून कागदावरच राहिले आहे. तालुक्यातील तिसरे ग्रामीण रुग्णालय म्हणून या रुग्णालयाची नोंद होणार असली, तरी शासन दरबारी जागेचा प्रश्न प्रलंबित पडला आहे. सध्या जयसिंगपूर येथे कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव (ता. शिरोळ) या ठिकाणी स्थलांतरित करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सन १९६२ साली जयसिंगपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. या आरोग्य केंद्रामुळे जयसिंगपूरसह परिसरातील रुग्णांची मोठी सोय झाली आहे.सांगली-कोल्हापूर महामार्गावर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाशेजारी सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अस्तित्वात आहे. येथे रुग्णांची मोठी गर्दी असते. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयासाठी चार कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाल्यानंतर जयसिंगपूर नगरपालिकेकडे जागेसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, जागा उपलब्ध नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या इमारतीजवळील जागेत ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाकडे जागेचे हस्तांतरण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण रुग्णालयासाठी चार कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे याठिकाणी अस्तित्वात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उदगाव येथील शशिकला क्षय रुग्णालयामधील चार एकर जागेची प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मागणी करण्यात आली आहे. ही जागा ट्रस्टच्या नावावर असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावर हस्तांतरित झाल्यानंतर जयसिंगपूर येथे गेल्या ५२ वर्षांपासून सुरू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे. सुविधा मिळण्यास मर्यादाजयसिंगपूर शहरात आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा मिळत आहेत. याठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सुविधा मिळण्यास मर्यादा येत आहेत. ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आले, तर आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. खासदार, आमदार यांनी पुढाकार घेऊन शासन दरबारी प्रलंबित असणारा जागा हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे.