शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

हेल्पलाईनलाच ‘हेल्प’ची प्रतीक्षा

By admin | Updated: March 23, 2015 01:00 IST

पंचगंगा नदी प्रदूषण : टोल फ्री क्रमांक कुचकामी; गांभीर्याचा अभाव

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर--पंचगंगा नदी प्रदूषणासंबंधी तक्रारी जाणून त्या सोडविण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १८००२३३१२१९ या टोल फ्री क्रमांकालाच मदतीची प्रतीक्षा आहे. २४ तास टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवून घेण्यासाठी दीड लाखांचे रेकॉर्डिंग यंत्र बसविणे गरजेचे आहे. त्यासाठी कोल्हापूर मनपा अणि इचलकरंजी नगरपालिकेने निम्मे-निम्मे पैसे देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंंडळाला पैसे न देता ठेंगा दाखविला आहे. कार्यालयीन वेळेतही तक्रारीसाठी स्वतंत्र कर्मचारी नसल्याने हेल्पलाईन कुचकामी ठरली आहे.नदीकाठावरील ३८ गावांचे व कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळते. परिणामी नदीवरील योजनेतून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. प्रदूषणप्रश्नी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी केंद्र सरकारकडे १०८ कोटी ९३ लाखांचा प्रकल्प अहवाल देण्यात आला.‘प्रदूषण’च्या आणि जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पंचगंगा प्रदूषणासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार उपाययोजनांच्या पाठपुराव्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती कार्यरत आहे. प्रदूषणप्रश्नी सूचना, तक्रारी, उपाय ऐकून घेण्यासाठी १७ जानेवारी २०१५ रोजी येथील प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाने टोल फ्री क्रमांक सुरू केले. टोल फ्री क्रमांकावरून तक्रारी नोंदवून घेण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र, रेकॉर्डिंग यंत्रणा नसल्याने कार्यालयीन वेळेत तक्रारींची नोंद घेतली जाते.फोन रिसिव्ह करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. यामुळे अनेकवेळा फोन वाजूनही कोणी उचलत नाहीत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आपल्या कामातून वेळ मिळाल्यास फोन रिसीव्ह करतात. तक्रार नोंदवून घेतात. नोंदवून घेतलेल्या बहुतांशी तक्रारीचे पुढे काहीही होत नाही, अशी नागरिकांची मानसिकता होत आहे. आतापर्यंत टोल फ्री क्रमांकावर २० ते २२ तक्रारी नोंदवून घेतल्या आहेत. रेकॉर्डिंग यंत्रासाठी उपसमितीच्या आदेशानुसार हे पैसे कोल्हापूर मनपा आणि इचलकरंजी नगरपालिका द्यायचे आहे. त्यासाठी ‘प्रदूषण’च्या प्रशासनाने प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. टोल फ्री क्रमांकावर चोवीस तासांत कधीही तक्रार नोंदवून घेण्यासाठी रेकॉर्डिंग यंत्र बसविण्यात आलेले नाही. यंत्रासाठी आवश्यक पैशांसाठी कोल्हापूर मनपा आणि इचलकरंजी पालिकेकडे प्रस्ताव दिला आहे. मात्र, अजून पैसे मिळालेले नाहीत. कार्यालयीन वेळेत तक्रार नोंदवून घेतली जाते. - मनिष होळकर, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर अनेकवेळा फोन रिसिव्ह केला जात नाही. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पुढे काहीही होत नाही. त्यामुळे हेल्पलाईन कुचकामी ठरत आहे. ‘प्रदूषण’च्या प्रशासनाने त्वरित २४ तास हेल्पलाईन कार्यान्वित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी. - बंडू पाटील, अध्यक्ष, स्वा. शेतकरी युवा आघाडी