शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

हेल्पलाईनलाच ‘हेल्प’ची प्रतीक्षा

By admin | Updated: March 23, 2015 01:00 IST

पंचगंगा नदी प्रदूषण : टोल फ्री क्रमांक कुचकामी; गांभीर्याचा अभाव

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर--पंचगंगा नदी प्रदूषणासंबंधी तक्रारी जाणून त्या सोडविण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १८००२३३१२१९ या टोल फ्री क्रमांकालाच मदतीची प्रतीक्षा आहे. २४ तास टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवून घेण्यासाठी दीड लाखांचे रेकॉर्डिंग यंत्र बसविणे गरजेचे आहे. त्यासाठी कोल्हापूर मनपा अणि इचलकरंजी नगरपालिकेने निम्मे-निम्मे पैसे देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंंडळाला पैसे न देता ठेंगा दाखविला आहे. कार्यालयीन वेळेतही तक्रारीसाठी स्वतंत्र कर्मचारी नसल्याने हेल्पलाईन कुचकामी ठरली आहे.नदीकाठावरील ३८ गावांचे व कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळते. परिणामी नदीवरील योजनेतून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. प्रदूषणप्रश्नी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी केंद्र सरकारकडे १०८ कोटी ९३ लाखांचा प्रकल्प अहवाल देण्यात आला.‘प्रदूषण’च्या आणि जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पंचगंगा प्रदूषणासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार उपाययोजनांच्या पाठपुराव्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती कार्यरत आहे. प्रदूषणप्रश्नी सूचना, तक्रारी, उपाय ऐकून घेण्यासाठी १७ जानेवारी २०१५ रोजी येथील प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाने टोल फ्री क्रमांक सुरू केले. टोल फ्री क्रमांकावरून तक्रारी नोंदवून घेण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र, रेकॉर्डिंग यंत्रणा नसल्याने कार्यालयीन वेळेत तक्रारींची नोंद घेतली जाते.फोन रिसिव्ह करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. यामुळे अनेकवेळा फोन वाजूनही कोणी उचलत नाहीत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आपल्या कामातून वेळ मिळाल्यास फोन रिसीव्ह करतात. तक्रार नोंदवून घेतात. नोंदवून घेतलेल्या बहुतांशी तक्रारीचे पुढे काहीही होत नाही, अशी नागरिकांची मानसिकता होत आहे. आतापर्यंत टोल फ्री क्रमांकावर २० ते २२ तक्रारी नोंदवून घेतल्या आहेत. रेकॉर्डिंग यंत्रासाठी उपसमितीच्या आदेशानुसार हे पैसे कोल्हापूर मनपा आणि इचलकरंजी नगरपालिका द्यायचे आहे. त्यासाठी ‘प्रदूषण’च्या प्रशासनाने प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. टोल फ्री क्रमांकावर चोवीस तासांत कधीही तक्रार नोंदवून घेण्यासाठी रेकॉर्डिंग यंत्र बसविण्यात आलेले नाही. यंत्रासाठी आवश्यक पैशांसाठी कोल्हापूर मनपा आणि इचलकरंजी पालिकेकडे प्रस्ताव दिला आहे. मात्र, अजून पैसे मिळालेले नाहीत. कार्यालयीन वेळेत तक्रार नोंदवून घेतली जाते. - मनिष होळकर, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर अनेकवेळा फोन रिसिव्ह केला जात नाही. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पुढे काहीही होत नाही. त्यामुळे हेल्पलाईन कुचकामी ठरत आहे. ‘प्रदूषण’च्या प्रशासनाने त्वरित २४ तास हेल्पलाईन कार्यान्वित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी. - बंडू पाटील, अध्यक्ष, स्वा. शेतकरी युवा आघाडी