शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

प्रतीक्षा निर्णयाची अन् उत्कंठा कार्यकर्त्यांची, कोल्हापुरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:32 IST

राज्यात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय काय होतो, याकडे मंगळवारी कोल्हापुरातील राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा लागून राहिली होती. विशेषत: सत्तास्थापनेत आघाडीवर असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेची कार्यालये केंद्रबिंदू राहिल्याने दिवसभर या ठिकाणी कार्यकर्त्यांची ये-जा सुरू होती.

ठळक मुद्दे प्रतीक्षा निर्णयाची अन् उत्कंठा कार्यकर्त्यांची, कोल्हापुरातील चित्रराष्ट्रवादी, शिवसेना कार्यालये बनली केंद्रबिंदू

कोल्हापूर : राज्यात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय काय होतो, याकडे मंगळवारी कोल्हापुरातील राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा लागून राहिली होती. विशेषत: सत्तास्थापनेत आघाडीवर असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेची कार्यालये केंद्रबिंदू राहिल्याने दिवसभर या ठिकाणी कार्यकर्त्यांची ये-जा सुरू होती.विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले; पण त्यांनी असमर्थता दर्शविली.

त्यानंतर सोमवारी (दि. ११) दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आले. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेस यांचे सरकार स्थापन होईल, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात होती.

त्या पार्श्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आज, मंगळवारी साखरवाटपाचेही नियोजन होते; परंतु कॉँग्रेसने वेळेत पाठिंब्याचे पत्र न दिल्याने शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आले नाही. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला पाचारण केले. त्यांना २४ तासांची वेळ देण्यात आली. यामुळे पुन्हा कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यानंतर मंगळवारी शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची ये-जा सुरू राहिली.

सर्वांच्या नजरा मुंबईकडे बहुमताबाबत काय होते याकडे होत्या. टी.व्ही. तसेच सोशल मीडियावरून येणाऱ्या बातम्यांवरून आपल्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून शहानिशा केली जात होती.

राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्तास्थापनेची वेळ ही रात्री साडेआठपर्यंत होती. त्यामुळे काहीतरी निर्णय होईल, असा कार्यकर्त्यांना विश्वास वाटत होता; परंतु दुपारीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला.राष्ट्रपती राजवटीची धास्तीसत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी , शिवसेना, कॉँग्रेसकडून घडामोडी सुरू असतानाच दुपारी राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षरी केल्यानंतर महाराष्टत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली; परंतु सर्वसामान्यांमध्ये या राजवटीबाबत धास्ती दिसून आली.

अनेकजणांनी माध्यमांच्या कार्यालयांमध्ये फोन करून ही राजवट म्हणजे नेमकी काय आहे? लष्करी राजवटीसारखा प्रकार आहे का? याबाबत आपली भीतीही बोलून दाखविली. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीबाबत अधिक स्पष्टता होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १६ दिवसांचा कालावधी उलटला तरी कोणत्याही पक्षाला सत्तेची गणिते जमविता आली नाहीत. सत्ता स्थापन करण्यात राजकीय पक्ष अपयशी ठरले. त्यामुळेच राज्यपालांना राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी लागली. ही राजवट लागू झाली असली तरी तिची धास्ती वाटण्याचे कारण नाही; कारण पुन्हा सत्तेची गणिते जुळून आल्यास सत्ता स्थापन होऊ शकते व ही राजवट जाऊ शकते.- उदय रसाळ, लॉँड्री व्यावसायिक

राज्यातील सर्व पक्षांकडून लोकांचा अपमान सुरू आहे. वास्तविक ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहे. पूरग्रस्तांनाही मदत देणे बाकी आहे. अशा परिस्थितीत हेवेदावे बाजूला ठेवून तातडीने सरकार स्थापन करण्याची गरज आहे.- मोहन बागडी, कोल्हापूर जिल्हा रिक्षा व्यावसायिक संघटना

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर