शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

Maharashtra Election 2019 : कोल्हापुरात उत्साहाने मतदानास प्रारंभ, ११ वाजेपर्यंत २0 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 11:50 IST

विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २0.५३ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहरनगर हायस्कूल येथील मतदान केंद्रातील एव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेस विलंब झाला. दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुरात उत्साहाने मतदानास प्रारंभ, ११ वाजेपर्यंत २0 टक्के मतदान पावसामुळे सकाळीच लावल्या रांगा

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २0.५३ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहरनगर हायस्कूल येथील मतदान केंद्रातील एव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेस विलंब झाला. दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या आहेत.कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहर नगर हायस्कूलमधील मतदान यंत्र जवळपास सव्वा तास बंद होते. हे मतदान यंत्र बदलण्याची प्रक्रिया सुरू राहिल्यामुळे मतदारांना रांगेतच तिष्ठत उभे रहावे लागले.महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ताराबाई पार्क येथील केंद्रीय जी.एस.टी. कार्यालयातील मतदान केंद्रावर आज सकाळी ८.३0 वाजता मतदान केले. दक्षिण मतदारसंघातील उमेदवार अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांनी सकाळीच मतदान केले, मात्र त्यांना स्वत:ला मतदान करता आले नाही. या दोन्ही उमेदवारांचे मतदान अनुक्रमे हातकणंगले आणि कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात आहे.ताराबाई पार्क येथील मतदान केंद्रावर मालती माधव फाटक या ८० वर्षांच्या वृध्देने तर दिव्यांग केंद्रावर सुलोचना कृष्णाजी कुलकर्णी या ८३ वर्षांच्या वृध्देने मतदान केले. दिव्यांग मतदारांसाठी बहुतेक मतदान केंद्रावर व्हील चेअरची सोय करण्यात आली होती. दीपलक्ष्मी विश्वंभर सावंत या दिव्यांग मतदाराने ताराबाई पार्क येथील मतदानकेंद्रावर मतदान केले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात कसबा बावडा येथील उलपे सभागृहात मतदारांनी पावणेसात वाजल्यापासूनच रांग लावली होती. येथे महिलांनी प्रथम मतदानाचा हक्क बजावला. पाचगाव येथेही मतदारांची रांग होती. प्रकाश बासराणी यांनी कुटुंबासह मतदान केले.सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूल आणि महानगरपालिकेच्या सदगुरु गाडगे महाराज विद्यामंदिर येथील मतदान केंद्रांवर तसेच अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पाचगाव परिसरामध्ये पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी भेट देवून पाहणी केली. मुक्त सैनिक वसाहत वालावलकर हायस्कुलमध्ये मतदानासाठी मतदारांची गर्दी होती. पाचगावसह मोरेवाडी परिसरात मतदानासाठी मतदारांची रिघ लागलेली होती.कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील २१ आणि २२ क्रमांकाच्या सखी आणि आदर्श मतदान केंद्रातही महिलांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात रांगा लावून मतदान केले. पूर्वा घाटगे, अंकिता माळी, प्रतिक्षा खासनीस, ऐश्वर्या भोगावकर, किरण वाघे या नवमतदारांनीही या मतदानकेंद्रात सकाळीच रांगेत उभे राहून आपले पहिलेवहिले मतदान करण्याची संधी साधली.सकाळी ९ वाजल्यापासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडत आहेत. हातकणंगले राखिव विधानसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.२६ टक्के मतदारांनी मतदान केले. यामध्ये १४, २०१ पुरुषांनी, ५,६९७ स्त्रियांनी असे एकूण १९, ८९८ मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले.माजी आमदार के. पी. पाटील यांनी मुदाळ (ता.भुदरगड) येथील मतदान केंद्रात मतदान केले. कागल मतदारसंघातील उमेदवार आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल -लिंगनूर दुमाला येथे मतदान केले, त्यानंतर त्यांनी कसबा सांगाव येथील मतदान केंद्राला भेट दिली. या मतदार केंद्रात दिव्यांग मतदार लक्ष्मी श्रीपती कांबळे यांनी व्हीलचेअरवरुन मतदान केले. त्यांना आमदार हसन मुश्रीफ यांनी मतदान केंद्रापर्यंत नेले. समरजितसिंह घाटगे हे शिंदेवाडी येथे, संजयब् घाटगे यांनी व्हन्नाळी येथे तर खासदार संजय मंडलिक यांनी चिमगाव मध्ये मतदान केले. आमदार सतेज पाटील यांनी सकाळी शाळा नं ११ येथे मतदान केले.सकाळी ११ वाजेपर्यंत २0.५३ टक्के मतदान झाले. चंदगड येथे १६.६३, राधानगरी येथे २४.१0, कागल येथे २८.२0, कोल्हापूर दक्षिणमध्ये १९, करवीरमध्ये २१.१५, कोल्हापूर उत्तर मध्ये १८.२५, शाहूवाडीत २१, हातकणंगले येथे १९, इचलकरंजी येथे १८, आणि शिरोळ येथे २0 टक्के मतदान झाले. तत्पूर्वी सकाळी ९ वाजेपर्यंत ७.९३ टक्के मतदान झाले. चंदगड येथे ८.२५, राधानगरी येथे ६.४0, कागल येथे ८.१0, कोल्हापूर दक्षिणमध्ये ९, करवीरमध्ये १२.२२, कोल्हापूर उत्तर मध्ये ६.२७, शाहूवाडीत ९.३0, हातकणंगले येथे ७, इचलकरंजी येथे ७.0७, आणि शिरोळ येथे ७.0२ टक्के मतदान झाले होते.दरम्यान, पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी सकाळच्या सत्रात बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सकाळीच मतदान केंद्रांची पाहणी केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kolhapurकोल्हापूर