शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

ग्रामपंचायतींसाठी २२ एप्रिलला मतदान

By admin | Updated: March 25, 2015 00:42 IST

आचारसंहिता लागू : जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर; ४२ ठिकाणी पोटनिवडणुका

कोल्हापूर : ‘ग्रामीण भागातील राजकारणाची पहिली पायरी’ म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते अशा जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. या सर्व ग्रामपंचायतींसह ४२ ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील जवळपास निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींत निवडणुका होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक होत आहे तेथे मंगळवारी रात्रीपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ३१ मार्च ते ७ एप्रिलअखेर उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. ८ एप्रिलला छाननी होणार आहे. १० एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेतले जातील. त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. २२ एप्रिलला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान घेतले जाणार आहे तर २३ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरतानाच जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करायचे आहे. प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी तेथील तहसीलदार निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने नुकतीच जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी प्रत्येक तालुकानिहाय पर्यवेक्षक व समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे असून कंसातील तालुक्यासाठी ही नियुक्ती आहे. प्रशांत पाटील (करवीर), रवींद्र खाडे (पन्हाळा), मोनिकासिंग (राधानगरी) कीर्ती नलवडे (भुदरगड), कुणाल खेमनार (गडहिंग्लज), अश्विनी जिरंगे (हातकणंगले), विद्युत वरखेडकर (शाहूवाडी), संगीता चौगुले (कागल), स्वाती देशमुख (गगनबाबडा), विवेक आगवणे (चंदगड), शैलेश सूर्यवंशी (आजरा), संजय पवार (शिरोळ) यांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणारग्रामपंचायतीची निवडणूक घराघरांपर्यंत पोहोचलेली असते. निवडणुकीमुळे प्रत्येक गावातील वातावरण राजकीयदृष्ट्या ढवळून निघणार आहे. या निवडणुका गावातीलच गटांतर्गत लढविण्यात येतात. त्यामुळे गावा-गावांतील राजकीय इर्ष्या, गटबाजी शिगेला पोहोचलेली पाहायला मिळणार आहे. तालुकानिहाय ग्रामपंचायती अशामतदान होत असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती अशा - करवीर ५४, कागल ५३, पन्हाळा ४१, शाहूवाडी ३७, शिरोळ ३४, हातकणंगले २०, राधानगरी २०, भुदरगड ४२, गगनबावडा ८, आजरा २६, चंदगड ३९, गडहिंग्लज ४८.