शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसाठी २२ एप्रिलला मतदान

By admin | Updated: March 25, 2015 00:42 IST

आचारसंहिता लागू : जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर; ४२ ठिकाणी पोटनिवडणुका

कोल्हापूर : ‘ग्रामीण भागातील राजकारणाची पहिली पायरी’ म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते अशा जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. या सर्व ग्रामपंचायतींसह ४२ ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील जवळपास निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींत निवडणुका होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक होत आहे तेथे मंगळवारी रात्रीपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ३१ मार्च ते ७ एप्रिलअखेर उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. ८ एप्रिलला छाननी होणार आहे. १० एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेतले जातील. त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. २२ एप्रिलला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान घेतले जाणार आहे तर २३ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरतानाच जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करायचे आहे. प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी तेथील तहसीलदार निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने नुकतीच जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी प्रत्येक तालुकानिहाय पर्यवेक्षक व समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे असून कंसातील तालुक्यासाठी ही नियुक्ती आहे. प्रशांत पाटील (करवीर), रवींद्र खाडे (पन्हाळा), मोनिकासिंग (राधानगरी) कीर्ती नलवडे (भुदरगड), कुणाल खेमनार (गडहिंग्लज), अश्विनी जिरंगे (हातकणंगले), विद्युत वरखेडकर (शाहूवाडी), संगीता चौगुले (कागल), स्वाती देशमुख (गगनबाबडा), विवेक आगवणे (चंदगड), शैलेश सूर्यवंशी (आजरा), संजय पवार (शिरोळ) यांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणारग्रामपंचायतीची निवडणूक घराघरांपर्यंत पोहोचलेली असते. निवडणुकीमुळे प्रत्येक गावातील वातावरण राजकीयदृष्ट्या ढवळून निघणार आहे. या निवडणुका गावातीलच गटांतर्गत लढविण्यात येतात. त्यामुळे गावा-गावांतील राजकीय इर्ष्या, गटबाजी शिगेला पोहोचलेली पाहायला मिळणार आहे. तालुकानिहाय ग्रामपंचायती अशामतदान होत असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती अशा - करवीर ५४, कागल ५३, पन्हाळा ४१, शाहूवाडी ३७, शिरोळ ३४, हातकणंगले २०, राधानगरी २०, भुदरगड ४२, गगनबावडा ८, आजरा २६, चंदगड ३९, गडहिंग्लज ४८.