शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

ग्रामपंचायतींसाठी २२ एप्रिलला मतदान

By admin | Updated: March 25, 2015 00:42 IST

आचारसंहिता लागू : जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर; ४२ ठिकाणी पोटनिवडणुका

कोल्हापूर : ‘ग्रामीण भागातील राजकारणाची पहिली पायरी’ म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते अशा जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. या सर्व ग्रामपंचायतींसह ४२ ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील जवळपास निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींत निवडणुका होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक होत आहे तेथे मंगळवारी रात्रीपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ३१ मार्च ते ७ एप्रिलअखेर उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. ८ एप्रिलला छाननी होणार आहे. १० एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेतले जातील. त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. २२ एप्रिलला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान घेतले जाणार आहे तर २३ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरतानाच जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करायचे आहे. प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी तेथील तहसीलदार निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने नुकतीच जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी प्रत्येक तालुकानिहाय पर्यवेक्षक व समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे असून कंसातील तालुक्यासाठी ही नियुक्ती आहे. प्रशांत पाटील (करवीर), रवींद्र खाडे (पन्हाळा), मोनिकासिंग (राधानगरी) कीर्ती नलवडे (भुदरगड), कुणाल खेमनार (गडहिंग्लज), अश्विनी जिरंगे (हातकणंगले), विद्युत वरखेडकर (शाहूवाडी), संगीता चौगुले (कागल), स्वाती देशमुख (गगनबाबडा), विवेक आगवणे (चंदगड), शैलेश सूर्यवंशी (आजरा), संजय पवार (शिरोळ) यांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणारग्रामपंचायतीची निवडणूक घराघरांपर्यंत पोहोचलेली असते. निवडणुकीमुळे प्रत्येक गावातील वातावरण राजकीयदृष्ट्या ढवळून निघणार आहे. या निवडणुका गावातीलच गटांतर्गत लढविण्यात येतात. त्यामुळे गावा-गावांतील राजकीय इर्ष्या, गटबाजी शिगेला पोहोचलेली पाहायला मिळणार आहे. तालुकानिहाय ग्रामपंचायती अशामतदान होत असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती अशा - करवीर ५४, कागल ५३, पन्हाळा ४१, शाहूवाडी ३७, शिरोळ ३४, हातकणंगले २०, राधानगरी २०, भुदरगड ४२, गगनबावडा ८, आजरा २६, चंदगड ३९, गडहिंग्लज ४८.