शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडच्या भोंग्यांचा आवाज झाला गायब.... लाखोंचे साहित्य भंगारात : संस्कारवाहिनी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:21 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने मागील काही वर्षांपूर्वी गावोगावी खेड्यापाड्यातील गावकऱ्यांना रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून तातडीने माहिती मिळावी, या मुख्य उद्देशाने ‘संस्कारवाहिनी’च्या रूपाने प्रत्येक गाव ग्रामपंचायतींना जवळपास पंधरा हजार रुपये निधी खर्च करून लाऊडस्पीकर वाटप करण्यात आले होते. परंतु काही मोजक्या ग्रामपंचायती वगळता

विक्रम पाटील ।करंजफेण : जिल्हा परिषदेच्या वतीने मागील काही वर्षांपूर्वी गावोगावी खेड्यापाड्यातील गावकऱ्यांना रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून तातडीने माहिती मिळावी, या मुख्य उद्देशाने ‘संस्कारवाहिनी’च्या रूपाने प्रत्येक गाव ग्रामपंचायतींना जवळपास पंधरा हजार रुपये निधी खर्च करून लाऊडस्पीकर वाटप करण्यात आले होते. परंतु काही मोजक्या ग्रामपंचायती वगळता अनेक ग्रामपंचायतींनी या संकल्पनेला नव्याचे नऊ दिवस वाजवत ठेऊन साहित्याला इमारतींच्या अडगळीतील जागेमध्ये भंगाराचा रस्ता दाखविला असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी लोकांना सकाळच्या प्रहरी जनावरांची धार काढण्यापासून ते वैरण गोळा करण्यापर्यंतच्या लगबगीमध्ये तसेच शेतामध्ये काम करत असताना माहिती प्रसारणाद्वारे भक्तिगीतांच्या माध्यमातून सुप्रभात मंगलमय होण्याबरोबर प्रादेशिक बातम्या, शेतीविषयक माहिती, रोजचे शेतीमालाचे बाजारभाव, रोजचे पंचांग, व्याख्याने तसेच इतर निवडक माहितीसह हातामधील काम करता करता माहितीचा खजाना लोकांच्या कानी पडावा व ग्रामीण लोकांच्या विचारामध्ये अधिक भर व्हावी या उदात्त हेतूने गावोगावी संस्कारवाहिनी संच बहाल करण्यात आले होते.या महत्त्वाकांक्षी योजनेच्या आवाजाच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी गीतांच्या तालावर गाणी वाजवून घरफाळा वसुली, पाणीपट्टी वसुली अशाप्रकारे ग्रामपंचायतीच्या अर्थकारणातील महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी उपयोग होत असल्याचे आपल्याला दिसून येत होते.

तसेच गल्लोगल्ली आरोळी देत परंपरागत चालत आलेली दवंडी पद्धत काळानुरूप लोप पावल्यामुळे संस्कारवाहिनीच्या माध्यमातून स्पीकरवरून एकाचवेळी सूचना अगर शासनाच्या अनेक योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी या वाहिनीचा प्रामुख्याने मोठा फायदा होत होता. परंतु हे शासनाने दिलेले लाखोंचे साहित्य कित्येक ग्रामपंचायतींनी अनेक वर्षांपासून दुरूस्तीविना भंगारात टाकले आहे, तर मोजक्याचं ग्रामपंचायती याचा नियमित वापर करून लोकांना लाभ देत आहेत. तर अनेक ग्रामपंचायती याचा वापर स्वातंत्र्यदिन अन् प्रजासत्ताक दिनादिवशीच करून साहित्य जैसे थे गुंडाळून ठेवत आहेत.

त्यामुळे शासनाची योजना जरी चांगली असली तरी अनेक पंचायतींनी तिचा अमल योग्य प्रकारे केला नसल्यामुळे त्यामध्ये बिघाड झालेला दुरूस्ती करण्याची तस्ती देखील अनेक ग्रामपंचायतीने घेतलेली नाही. शेकडो ग्रामपंचायतींचे लाखोंचे सामान भंगारात पडले असल्याने संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्ष करून योजना पुनरुज्जीवित न केल्यास वापराविना साहित्य गायब होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

संस्कारवाहिनीच्या भोंग्यांद्वारे प्रसन्न वातावरण तयार होत असून, कामाच्या धावपळीतसुद्धा रेडीओतून दिली जाणारी वेगवेगळी माहिती व ग्रामपंचायतमधून सरकारी योजनांची पुकारलेली माहिती मिळण्यास मदत होते. त्यामुळे गावोगावी बंद असलेल्या या वाहिन्या तातडीने सुरू व्हाव्यात.- सरदार पाटील, तिरपण, ग्रामस्थ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRural Developmentग्रामीण विकास