शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

गावाकडच्या भोंग्यांचा आवाज झाला गायब.... लाखोंचे साहित्य भंगारात : संस्कारवाहिनी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:21 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने मागील काही वर्षांपूर्वी गावोगावी खेड्यापाड्यातील गावकऱ्यांना रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून तातडीने माहिती मिळावी, या मुख्य उद्देशाने ‘संस्कारवाहिनी’च्या रूपाने प्रत्येक गाव ग्रामपंचायतींना जवळपास पंधरा हजार रुपये निधी खर्च करून लाऊडस्पीकर वाटप करण्यात आले होते. परंतु काही मोजक्या ग्रामपंचायती वगळता

विक्रम पाटील ।करंजफेण : जिल्हा परिषदेच्या वतीने मागील काही वर्षांपूर्वी गावोगावी खेड्यापाड्यातील गावकऱ्यांना रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून तातडीने माहिती मिळावी, या मुख्य उद्देशाने ‘संस्कारवाहिनी’च्या रूपाने प्रत्येक गाव ग्रामपंचायतींना जवळपास पंधरा हजार रुपये निधी खर्च करून लाऊडस्पीकर वाटप करण्यात आले होते. परंतु काही मोजक्या ग्रामपंचायती वगळता अनेक ग्रामपंचायतींनी या संकल्पनेला नव्याचे नऊ दिवस वाजवत ठेऊन साहित्याला इमारतींच्या अडगळीतील जागेमध्ये भंगाराचा रस्ता दाखविला असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी लोकांना सकाळच्या प्रहरी जनावरांची धार काढण्यापासून ते वैरण गोळा करण्यापर्यंतच्या लगबगीमध्ये तसेच शेतामध्ये काम करत असताना माहिती प्रसारणाद्वारे भक्तिगीतांच्या माध्यमातून सुप्रभात मंगलमय होण्याबरोबर प्रादेशिक बातम्या, शेतीविषयक माहिती, रोजचे शेतीमालाचे बाजारभाव, रोजचे पंचांग, व्याख्याने तसेच इतर निवडक माहितीसह हातामधील काम करता करता माहितीचा खजाना लोकांच्या कानी पडावा व ग्रामीण लोकांच्या विचारामध्ये अधिक भर व्हावी या उदात्त हेतूने गावोगावी संस्कारवाहिनी संच बहाल करण्यात आले होते.या महत्त्वाकांक्षी योजनेच्या आवाजाच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी गीतांच्या तालावर गाणी वाजवून घरफाळा वसुली, पाणीपट्टी वसुली अशाप्रकारे ग्रामपंचायतीच्या अर्थकारणातील महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी उपयोग होत असल्याचे आपल्याला दिसून येत होते.

तसेच गल्लोगल्ली आरोळी देत परंपरागत चालत आलेली दवंडी पद्धत काळानुरूप लोप पावल्यामुळे संस्कारवाहिनीच्या माध्यमातून स्पीकरवरून एकाचवेळी सूचना अगर शासनाच्या अनेक योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी या वाहिनीचा प्रामुख्याने मोठा फायदा होत होता. परंतु हे शासनाने दिलेले लाखोंचे साहित्य कित्येक ग्रामपंचायतींनी अनेक वर्षांपासून दुरूस्तीविना भंगारात टाकले आहे, तर मोजक्याचं ग्रामपंचायती याचा नियमित वापर करून लोकांना लाभ देत आहेत. तर अनेक ग्रामपंचायती याचा वापर स्वातंत्र्यदिन अन् प्रजासत्ताक दिनादिवशीच करून साहित्य जैसे थे गुंडाळून ठेवत आहेत.

त्यामुळे शासनाची योजना जरी चांगली असली तरी अनेक पंचायतींनी तिचा अमल योग्य प्रकारे केला नसल्यामुळे त्यामध्ये बिघाड झालेला दुरूस्ती करण्याची तस्ती देखील अनेक ग्रामपंचायतीने घेतलेली नाही. शेकडो ग्रामपंचायतींचे लाखोंचे सामान भंगारात पडले असल्याने संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्ष करून योजना पुनरुज्जीवित न केल्यास वापराविना साहित्य गायब होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

संस्कारवाहिनीच्या भोंग्यांद्वारे प्रसन्न वातावरण तयार होत असून, कामाच्या धावपळीतसुद्धा रेडीओतून दिली जाणारी वेगवेगळी माहिती व ग्रामपंचायतमधून सरकारी योजनांची पुकारलेली माहिती मिळण्यास मदत होते. त्यामुळे गावोगावी बंद असलेल्या या वाहिन्या तातडीने सुरू व्हाव्यात.- सरदार पाटील, तिरपण, ग्रामस्थ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRural Developmentग्रामीण विकास