शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

हत्या करून विवेकाचा आवाज संपत नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 19:03 IST

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर आता प्रबोधनाचे काम करणाºया महिला पत्रकारांनाही गोळ््यांचे लक्ष्य बनवण्यात आले आहे. पण विवेकाचा आवाज हत्येने कधीच मरत नसतो, अशाी प्रतिक्रिया कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.

कोल्हापूर : दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर आता प्रबोधनाचे काम करणाºया महिला पत्रकारांनाही गोळ््यांचे लक्ष्य बनवण्यात आले आहे. पण विवेकाचा आवाज हत्येने कधीच मरत नसतो. या घटनांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे अन्यथा देशात अशी अराजकता माजेल ती थांबवणे शासनाच्याही हातात राहणार नाही अशाी प्रतिक्रिया कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.

बेंगलोर येथील पत्रकार व डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. याबाबत कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते व डाव्या विचारसरणीच्या लोकांनी लोकशाहीबाबत चिंता व्यक्त केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही आणि सत्याच्या बाजूने बोलणाºयांना एक एक करुन मारले जात आहे. मात्र अशा गोळ््या झाडून सत्याला कोणी झाकून ठेवू शकत नाही. गेल्या चार पाच वर्षात झालेल्या या हत्यांबाबत सरकारने गांभीर्याने पाऊले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कलबुर्गींच्या मारेकºयांना पकडण्याला सरकारला अद्याप यश मिळालेले नाही या घटनेचा आम्ही काही दिवसांपूर्वी निषेध केला. याविषयावर २६ तारखेला मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर गौरी लंकेश यांच्याशी दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येविषयी चर्चा झाली व निषेध सभा आयोजित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बेंगलोरमध्ये भेटणार होतो. पण त्याआधीच एक निर्भीड पत्रकार अशारितीने मारली गेली. त्यांचे मारेकरी कोण आहेत, त्यांची विचारसरणी कोणती हे अद्याप स्पष्ट नसले तरी एखाद्याचे विचार पटत नाहीत म्हणून त्यांना मारणे ही निषेधार्हच बाब आहे.मेघा पानसरे ,सामाजिक कार्यकर्त्या

आपण एकतर भित्रे झालो आहोत, स्वत:मध्ये मग्न आहोत किंवा आळशी झालो आहोत असे म्हणावे लागेल. सध्याच्या शासनाला हेच करायचे होते म्हणून सत्तेची अभिलाषा बाळगली होती असे खेदाने म्हणावे लागेल. लोकशाहीत पत्रकारिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचे असते. पत्रकार समाजात घडत असलेल्या गैर आणि चुकीच्या गोष्टी प्रकाशात आणून त्यावर अंकुश ठेवण्याचे काम करत असतो. गौरी लंकेश सारख्या पत्रकाराची अशी हत्या होणे म्हणजे लांछनास्पद गोष्ट आहे. शासनाने याकडे अतिशय गांभीर्याने पाहून दोषींना शिक्षा करावी अन्यथा देशात निर्माण होणारी अराजकता रोखण्यापलिक़डे जाईल.सीमा पाटील,अंधश्रद्धा निर्मूलन समिती

बेंगलोर, धारवाड, कोल्हापूर, सांगली, सातरा हा भाग जातीयवादी धर्मांध शक्तींच्या टार्गेटवर आहे. पानसरे आणि दाभोलकरांच्या हत्याप्रकरणातील लोकांना सोडल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. समाजसुधारणेचे काम करणाºया पूरुषांसोबत महिलांनीही हत्या करण्यापर्यंत याची मजल गेली आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. या विरोधात आम्ही देशभर इंडिया अगेन्स्ट फॅसीझम ही चळवळ उभी करणार आहोत.गिरीष फोंडे,एआयवायएफ