शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई-त्र्यंबोली देवीची भेट

By admin | Updated: October 7, 2016 00:43 IST

यात्रा उत्साहात : कोहळा मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला (गुरुवारी) ललिता पंचमीनिमित्त त्र्यंबोली टेकडी येथील मंदिरात श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवी या सखींची भेट घडविण्यात आली. खासदार युवराज संभाजीराजे व यशराजराजे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. मयूरी संतोष गुरव या कुमारिकेचे पूजन झाल्यानंतर तिच्या हस्ते कोहळा भेदन विधी पार पडला. कोहळा घेण्यासाठी कोणताही गोंधळ-गडबड न होता ही यात्रा शांततेत पार पडली. त्र्यंबोली यात्रेनिमित्त पहाटे अडीच वाजता देवीचा महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर त्र्यंबोली देवीची सिंहासनस्थ पूजा बांधण्यात आली. ही पूजा शिवप्रसाद गुरव, सदानंद गुरव, रोहित गुरव, संतोष गुरव यांनी बांधली. अंबाबाई मंदिरात सकाळी १० वाजता अंबाबाईचे धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. तोफेच्या सलामीनंतर अंबाबाई तसेच जुना राजवाड्यातील तुळजाभवानीदेवी, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, तुळजाभवानी देवीच्या पादुका असलेल्या व गुरुमहाराजांच्या पालख्यांनी त्र्यंबोली टेकडीकडे प्रस्थान केले. कोटीतीर्थ, टाकाळा येथील तीर्थांचे पूजन करण्यात आले. भाविकांकडून आरती स्वीकारत दुपारी सव्वाबारा वाजता सर्व पालख्यांचे त्र्यंबोली टेकडीवर आगमन झाले. येथे देवीसाठी रांगोळींचा आणि फुलांचा गालिचा तयार करण्यात आला होता. बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर देवतांच्या उत्सवमूर्ती त्र्यंबोली देवीच्या गाभाऱ्यात नेण्यात आल्या. खासदार युवराज संभाजीराजे व यशराजराजे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. कोहळा भेदन विधीचा परंपरागत मान धोंडिराम महादेव गुरव घराण्याकडे आहे. या घराण्यातील मयूरी संतोष गुरव या दहा वर्षांच्या कुमारिकेचे पूजन करण्यात आले. तिच्या हस्ते त्रिशुळाने कोहळा भेदन विधी झाला. त्यानंतर त्र्यंबोली व अंबाबाईची भेट घडविण्यात आली. यावेळी श्रीपूजक अजित ठाणेकर, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव, पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, अंबाबाई मंदिर, तुळजाभवानी मंदिर, गुरुमहाराज वाड्यातील सर्व मानकरी व सेवेकरी उपस्थित होते. कोहळा भेदन विधी झाल्यानंतर त्याचा तुकडा घेण्यासाठी दरवर्षी भाविकांची पळापळ होत असते. काही वेळा पोलिसांना लाठीमार करावा लागतो. यंदा मात्र असा कोणताही प्रकार न होता यात्रा शांततेत पार पडली. एक भाविक किरकोळ जखमी झाला; तर दुसऱ्या एकाने कोहळा गिळल्याने त्याला त्रास झाला. पंचोपचार पूजा, आरती, आहेराची देवघेव झाली. त्यानंतर सर्व पालख्या परतीच्या मार्गाला लागल्या. दुपारी चारनंतर अंबाबाईची पालखी पुन्हा मंदिरात आली. (प्रतिनिधी)भाविकांकडून जल्लोषी स्वागत अंबाबाई मंदिर ते त्र्यंबोली टेकडी या पालखी मार्गावर कोल्हापूरकरांकडून अंबाबाईच्या पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत होते. आकर्षक रांगोळी, फुलांचा गालिचा देवीसाठी तयार करण्यात आला होता. देवीची पालखी आली की भाविकांकडून औक्षण केले जात होते. फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. बागल चौक मित्रमंडळ, राजारामपुरी, समाजसेवा मित्र मंडळ, इंडियन फ्रेंड्स सर्कल, न्यू कमांडो फ्रेंड्स सर्कल, टाकाळा मित्र मंडळ, अचानक मित्र मंडळ यांच्याकडून पालखीचे जल्लोषी स्वागत केले जात होते. तसेच पालखीसोबतच्या मानकऱ्यांसाठी फराळ, पाणी, सरबताचीही सोय करण्यात आली होती. यायला लागतंय...येत्या १५ तारखेला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाचा ज्वर त्र्यंबोली यात्रेतही दिसून आला. येथे काढण्यात आलेल्या रांगोळीत १५ आॅक्टोबरला ‘यायला लागतंय...’ असा संदेश देणारी रांगोळी काढण्यात आली होती.