शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

Kolhapur- विशाळगड जाळपोळ प्रकरण: श्रद्धेवर घाव, गजापूरवासीयांची मने घायाळ

By विश्वास पाटील | Updated: July 17, 2024 12:46 IST

संभाजीराजेंना नुसता हात वर केला असता तर..

विश्वास पाटील/सचिन पाटीलगजापूर (ता. शाहूवाडी) : मोडलेली घरे, डोळ्यादेखत झालेले वाहनांचे नुकसान, उघड्यावर आलेले संसार, प्रार्थनास्थळाची तोडफोड झाल्याने श्रद्धेवर बसलेला वर्मी घाव याबद्दलच्या संतप्त भावनांचा कल्लोळ मंगळवारी उफाळून आला. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आम्हाला पोटाशी धरले, जमिनी दिल्या, त्यांच्या वारसाने जमाव गोळा करावा आणि आमचा काहीच दोष नसताना, भीतीने गप्प घरात बसलो असताना आमचे जगणेच उद्ध्वस्त करावे याबद्दलचा उद्वेग मुस्लीम समाजाने व्यक्त केला. निमित्त होते खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीचे.. या भेटीदरम्यान स्वत: खासदार शाहू छत्रपतीही लोकांच्या भावना ऐकून काही क्षण गलबलून गेले.रविवारी दुपारी जे अनुभवले ते सांगताना महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. आमची घरेदारे फोडली, गाड्या फोडल्या, ती नव्याने उभी करू, परंतु मंदिर, मशिदीसह गिरिजा घराची तोडफोड करू नका.. त्यातून मनाला होणारी जखम लवकर भरून येत नाही. कोल्हापूरची हिंदू-मुस्लीम बंधुभावाची राजर्षी शाहूंनी घट्ट केलेली सामाजिक वीण तुटू देऊ नका.. अशीच भावनाही या समाजाने व्यक्त केली.विशाळगडावरील अतिक्रमण मोहिमेला हिंसक वळण लागले. त्यामध्ये गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये मुस्लीम समाजाच्या घरांची तोडफोड करण्यात आली. या लोकांना धीर देण्यासाठी आणि घडलेली नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने हा दौरा केला. परंतु, ही तोडफोड होईपर्यंत बघ्याची भूमिका घेणारे प्रशासन किती कर्तव्यतत्पर आहे याचा अनुभव पांढरेपाणी येथूनच आला. सुमारे तासभर पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर मग त्यांनी फक्त गजापूरपर्यंतच जाण्यास परवानगी दिली. दोनच्या सुमारास गावात पोहोचलो. जिथे मुस्लीम समाजाची घरे सुरू होतात, तिथूनच तोडफोड सुरू झाल्याचे दिसत होते. दारांत सगळीकडे काचा फोडलेल्या, टायर फुटलेल्या गाड्या, मोडलेली घरे, प्रापंचिक साहित्याची नासधूस, गॅस सिलिंडरपासून पाण्याच्या बाटल्याही फेकून दिलेल्या असे दृश्य सगळीकडे दिसले. आमचा गडावरील अतिक्रमणे काढण्यास कोणताच विरोध नव्हता. पोलिसांनी आम्हाला तुम्ही शांतपणे घरी बसा, अशा सूचना केल्या होत्या. तसे असताना अचानक ११ च्या सुमारास पाच-सहाशे जणांचा जमाव आला. तो पहिल्यांदा प्रार्थनास्थळात घुसला. त्याची तोडफोड केली. त्यांच्या हातात तलवारी होत्या, हातोडे होते. लोखंडी बार होते. त्यांनी जे दिसेल ते फोडले, गाड्या उलट्या करून टाकल्या. प्रार्थनास्थळातील साहित्याला आग लावली. आम्ही बायका-पोरांना घेऊन घरदार सोडून जंगलात पळालो, म्हणून वाचलो. ती आमची घरे फोडायला नव्हे तर आमच्यावर हल्ले करायला आले होते. म्हणून आम्ही जीव वाचवण्यासाठी पळून गेलो.आंदोलन होणार म्हणून आम्हाला आधार कार्ड बघितल्याशिवाय पोलिस गावात सोडत नव्हते आणि हा एवढा जमाव मग कसा आला..? पोलिसांना आधी सांगूनही पुरेसा बंदोबस्त त्यांनी ठेवला नाही.. तोडफोड सुरू झाल्यावर त्यांना रोखण्यासाठी एकही पोलिस नव्हता.. हा हल्ला अचानक झालेला नव्हता.. तो पूर्वनियोजितच होता..ग्रामस्थ भडाभडा संताप व्यक्त करत होते.. दोन दिवसांपासून घुसमटलेला श्वास मोकळा करत होते..आपले अश्रू पुसण्यासाठी स्वत: शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे लोक आलेत ही भावना त्यांना धीर देत होती.. आमचा काहीच दोष नसताना विशिष्ट समाजाचे आहे म्हणून आमची घरेदारे उद्ध्वस्त झाली, मने रक्तबंबाळ झाली, ही वेदनेची सल मात्र प्रत्येकाला टोचत होती.. त्यावर सद्भावनेची फुंकर घालण्याव्यतिरिक्त कोणच काही करू शकत नव्हते..

संभाजीराजेंना नुसता हात वर केला असता तर..गजापूरमधील घरांची तोडफोड सुरू होती तेव्हा संभाजीराजे गावात होते. त्यांनी नुसता हात वर केला असता तरी आम्हाला हात लावण्याची कुणाची हिंमत झाली नसती, परंतु त्यांनी हा शिवप्रेमींचा आक्रोश आहे म्हणत तसे केले नाही.. राजेसाहेबांनी हे योग्य केले नाही, असे सांगताना ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले.

जुजबी पोलिस..विशाळगडावर जाताना रस्त्याला लागूनच प्रार्थनास्थळ आहे. रविवारी मोहीम होती म्हटल्यावर पुरेसा बंदोबस्त ठेवायला हवा होता. शाहूवाडी पोलिसांनी १० अधिक १५ अशा तुकड्यांचा बंदोबस्त लावतो असे सांगितले होते, परंतु प्रत्यक्षात जुजबीच पोलिस होते. विशाळगडावर तोडफोड होईल म्हणून सगळे पोलिस तिकडे गेले आणि जमावाच्या हल्ल्याचे आम्ही बळी ठरलो, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली.

शाहू छत्रपतींनी काढून दिले जॅकेट..हल्ला झालेल्या प्रत्येक घरात अगदी चुलीपर्यंत जाऊन शाहू छत्रपती, सतेज पाटील यांनी पाहणी केली. पाऊस कोसळत होता, परंतु त्यातूनच ते लोकांच्या भावनांना फुंकर घालत होते. एका कुटुंबात थंडीने गारठलेली चिमुकली पाहून शाहू छत्रपती यांचे मन गहिवरलं.. त्यांनी आपल्या अंगातील राकट रंगाचे जॅकेट चटकन काढले आणि तिला घातले..मायेची ऊब देऊन ते पुढे गेले..

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती