शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

विनय कोरे भाजपच्या संपर्कात

By admin | Updated: July 20, 2014 23:20 IST

मतदारसंघात जोरदार चर्चा : कार्यकर्त्यांकडूनही वाढता दबाव

विश्वास पाटील -कोल्हापूरपन्हाळा-शाहूवाडीचे आमदार व जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत; परंतु भाजपमध्ये प्रवेशाबाबत कोणताच निर्णय झाला नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्यावर काहीतरी निर्णय घ्या, असा मोठा दबाव आहे. त्यांनी असा निर्णय घेतल्यास एकाच दगडात अनेक पक्षी मारले जाऊ शकतात. कोरे यांनी त्यासंदर्भात भाजपचे नेते व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. भाजपने त्यांना प्रवेश दिल्यास विधानसभेचा गुंताही सुटू शकतो. एकाचवेळी भारत पाटील व सत्यजित पाटील यांचा शिवसेना उमेदवारीचा पत्ता कट होऊ शकतो.विकासाची दृष्टी, नेतृत्वगुण, चांगले संघटन असूनही कोरे यांचे नेतृत्व सध्या अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे. पक्ष चालविणे हे आर्थिकदृष्ट्या न झेपणारे बनले आहेच, शिवाय स्वत: त्यांनाही पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघात विधानसभेला संघर्ष करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. त्यांच्याच पक्षाचे खंदे कार्यकर्ते भारत पाटील हे स्वाभिमानी किंवा शिवसेनेकडून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. माजी आमदार सत्यजित पाटील हेदेखील शिवसेनेतूनच प्रयत्नशील आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर राज्यात शिवसेना-भाजपचे वारे आहे. राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध असल्याने कोरे यांना शिवसेनेत जाण्यात अडचणी आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादीच्या संगतीने झाली; परंतु त्या पक्षानेही त्यांचा सोयीने व गरजेपुरता वापर करून घेतला. आता राष्ट्रवादीचे नाव नको, असे जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांनाही वाटते. स्वतंत्र राहून राजकारण करणे सोपे नाही. काँग्रेसमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी तर त्यांना काँग्रेसमध्ये येऊ नका, असाच सल्ला दिला आहे. अशा स्थितीत त्यांच्यापुढे भाजपशिवाय दुसरा कोणताच पर्याय राहात नाही. नितीन गडकरी व कोरे यांचे १९९५पासून घनिष्ट संबंध आहेत. मुंबईत एकाच अपार्टमेंटमध्ये या दोघांचे फ्लॅट असल्याने त्यांची अनेकदा भेट होते. आर्इंची प्रकृती बरी नसल्याने कोरे गेली दीड महिने मुंबईत होते. या काळात त्यांच्या दोन-तीन वेळा भेटी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही कोरे यांचे जुने संबंध आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यातील एखादा खमक्या नेता पक्षात येत असेल, तर भाजपल्-भाजपला ग्रामीण महाराष्ट्रात पाया घट्ट करण्यासाठी कोरे यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे; परंतु लोकसभेला आकारास आलेल्या महायुतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी आहे. -स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी व कोरे यांचे हाडवैर आहे. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत कोरे यांनी शेट्टी यांना टोकाचा विरोध केला आहेच, शिवाय ऊसदराच्या आंदोलनावेळीही पहिली उचल जाहीर न करताच वारणा सुरू केल्याचा राग शेट्टी यांच्या मनात आहे. -त्यामुळे कोरे यांना शेट्टी यांचा विरोध होऊ शकतो; परंतु ते जर भाजपमध्येच प्रवेश करणार असतील, तर मात्र शेट्टी यांना विरोध करण्यात अडचणी आहेत.ााही ते हवेच आहे. विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे चार आमदार निवडून आले. गेल्या निवडणुकीत ही संख्या दोनवर आली. त्यातीलही मालेगावचे आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जनसुराज्यकडे पन्हाळा पंचायत समिती व नगरपालिकेची सत्ता आहे. परवाच्या नगराध्यक्ष निवडणुकीत सत्ता राखताना कोरे कधी नव्हे ते घामाघूम झाले. जिल्हा परिषद व महापालिकेतही पक्षाचे अस्तित्व जेमतेम आहे. राज्याच्या राजकारणात वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा ध्यास घेऊन स्थापन झालेला हा पक्ष सध्या अस्तित्वासाठीच झगडत आहे.