शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वर्षभर विनासुट्टी.. मल्लिनाथ कलशेट्टी ! राज्यभर ‘स्वच्छतादूत’ म्हणून परिचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:26 IST

विशेष म्हणजे ते स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यांवर, नाल्यांमध्ये स्वच्छतेसाठी उतरतात. पंचायत राजमध्ये तयार झाल्यामुळे लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकासाचा गाडा हाकण्यात त्यांचा हातखंडा आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरकरांच्या सेवेतील आयुक्त।

विनोद सावंत ।कोल्हापूर : नोकरदार असो, अधिकारी असो अथवा व्यापारी असो; आठवड्यातून एक दिवस तरी सुट्टी ठरलेलीच असते. या दिवशी विश्रांतीबरोबर कुटुंबासाठी वेळ दिला जातो. भारतीय प्रशासन सेवेत असणारे कोल्हापूरचेआयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी मात्र याला अपवाद आहेत. वर्षभरात त्यांनी एका दिवशीही सुट्टी घेतलेली नाही. कोल्हापूरला प्रथमच असे आयुक्त लाभले आहेत. कोल्हापूर महापालिकेत त्यांना रुजू होऊन वर्ष होत आले आहे.

शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी कामाचा ताण पडत असल्यामुळे राज्य सरकाराने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला असताना हे असे अधिकारी आहेत की त्यांना आठवडाही पुरत नाही. कोल्हापूर महापालिकेत रुजू झाल्यापासून त्यांनी एकाही दिवशी सुट्टी घेतलेली नाही.विशेष म्हणजे आजपर्यंतच्या सेवेत त्यांनी एकदाही वैद्यकीय रजा घेतलेली नसून ते अखंडपणे काम करीत आहेत. शहर स्वच्छ करण्याबरोबरच कोल्हापूर हे राज्यातील पहिले प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा त्यांचा निर्धार आहे. दर रविवारी ते ‘स्वच्छता अभियान’ राबवितात. गेल्या वर्षभरापासून त्यांनी अखंड ४३ रविवार स्वच्छता मोहीम राबविली.

विशेष म्हणजे ते स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यांवर, नाल्यांमध्ये स्वच्छतेसाठी उतरतात. पंचायत राजमध्ये तयार झाल्यामुळे लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकासाचा गाडा हाकण्यात त्यांचा हातखंडा आहे. स्वच्छता मोहीम, महापुरामध्ये लोकांच्या मदतीला धावून जाण्यात त्यांनी उल्लेखनीय काम केले.

सांगली पॅटर्न राज्यभरडॉ. कलशेट्टी सांगलीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी ‘संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान’ प्रभावीपणे राबविले. राज्य शासनाने त्याची दखल घेतली. ‘सांगली पॅटर्न’ राज्यभर राबविण्यासाठी या अभियानांतर्गत त्यांच्यासाठी ‘राज्य समन्वयक’ हे नवीन पद तयार केले.डॉ. कलशेट्टी यांचे उल्लेखनीय काम

  • - सरदार सरोवर बाधितांचे पुनर्वसन
  • - बालमृत्यू प्रमाण कमी करण्यात यश
  • -जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पाणी फौंडेशनचे काम
  • आदिवासींसाठी तयार केलेल्या नियमांचा ‘पेसा कायद्या’मध्ये समावेश.

 

एक दिवसही ‘ब्रेक’ नाहीप्रशासकीय सेवेत असणाऱ्यांना बदलीच्या काळात नऊ दिवस सुट्टी घेण्याची मुभा असते. डॉ. कलशेट्टी हे एक दिवसही विश्रांती न घेता दुसºयाच दिवशी नवीन जागेवर रुजू झाले.बदलीवेळी एक दिवसही सुट्टी न घेणारे अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. मुंबई, पुणे येथे कामानिमित्त गेल्यानंतर रात्री उशिरा कोल्हापुरात आल्यानंतरही सकाळी उठून ते कामावर हजर असतात.

 

कोल्हापूर महापालिकेला मी आई मानून काम करतो. त्यामुळेच सुट्टी दिवशीही सेवा बजावतो. शिवाजी विद्यापीठातील सेवा योजनेत घडलो असल्यामुळे माझे स्वच्छतेला नेहमी प्राधान्य असते. आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केले असून, पुढेही असेच काम करीत राहणार आहे. पुढील काळात महापालिकेच्या शाळा दर्जेदार करण्याचे लक्ष्य आहे.- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोल्हापूर महापालिका

टॅग्स :commissionerआयुक्तkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान