शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जागतिक वारसा यादीत पन्हाळगडाचा समावेश नको, ग्रामस्थांचा विरोध; सर्वोच्च न्यायालयात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:10 IST

पन्हाळा : मे महिन्यात पन्हाळा गड जागतिक वारसा स्थळांच्या यादीत घेण्याचा अंतिम निर्णय होणार असल्याचे पन्हाळ्यावरील १३ डी लघुपट ...

पन्हाळा : मे महिन्यात पन्हाळागड जागतिक वारसा स्थळांच्या यादीत घेण्याचा अंतिम निर्णय होणार असल्याचे पन्हाळ्यावरील १३ डी लघुपट लोकार्पणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र, जागतिक वारसा होण्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जात शासनावर दबाव आणण्याचा निर्णय पन्हाळा ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचे नाव निश्चित झाले, तरी ग्रामस्थांना कसलीही माहिती न देता शासकीय अधिकारी परस्पर निर्णय घेत आहे. ग्रामस्थांचा विरोध विचारात न घेता सर्व शासकीय निर्णय मान्य केले जात आहेत, असेच भासवत आहेत. पण अलीकडे तटबंदीपासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या घरांची मालकी व माहिती जागतिक वारसा स्थळाचे अभियंता गोळा करत असून कोणत्याही क्षणी ते जागा रिकामी करण्यास सांगणार आहेत.

तर, दूरध्वनी व आकाशवाणीचे मनोरे (टाॅवर) उंची जास्त होत असल्याने त्यांना जोतिबा डोंगरावर प्रत्येकी दहा गुंठे जागा देण्यात आली आहे. तसेच, पन्हाळगडावरून त्यांना स्थलांतर करण्यास सांगितले आहे. पाठोपाठ पन्हाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उंच पाण्याची टाकी पाडण्यासाठी सांगितले आहे.

पन्हाळ्यावरील सर्व शासकीय कार्यालये वाघबीळ येथे स्थलांतरित करण्याचे निश्चित झाले असून, त्यासाठी तयार इमारत घेण्यासाठी निर्णय अंतिम टप्प्यात आहे. शासकीय कार्यालये व ऑनलाइन सुविधा पन्हाळगडावर उपलब्ध नसतील, तर पन्हाळगडावर राहणारे लोक राहतील का, त्यांचा उदरनिर्वाह चालेल का, या सर्वच प्रश्नांची उत्तरे शासकीय अधिकारी देत नाहीत. त्यामुळे तातडीने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे

पन्हाळा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जात असताना पन्हाळा ग्रामस्थांच्या मुळे येथील ऐतिहासिक इमारती टिकून आहेत, याची कोणतीही जाणीव शासनकर्ते ठेवत नाहीत. छत्रपतींची उपराजधानी म्हणून पन्हाळगड जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जात असताना ऋषी मुनींच्या काळापासून राहणाऱ्या पन्हाळा ग्रामस्थांची होणारी ससेहोलपट थांबणार नाही. कारण, शासनकर्त्यांना येथील वारेमाप निधी व प्रसिद्धी पाहिजे आहे. त्यासाठी पन्हाळगडावरील ग्रामस्थांना येथून हटवले जात असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगड