शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडूनच ‘गाव तिथे ग्रंथालय’ योजना बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 11:45 IST

वाचनसंस्कृतीचा उच्चरवामध्ये उदो-उदो करणाऱ्यांचे शासन सत्तेत असतानाही गेली पाच वर्षे राज्यात एकही नवे शासनमान्य वाचनालय स्थापन होऊ शकले नाही हे वास्तव आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारने नव्या ग्रंथालयांना मान्यता न देण्याचा पाच वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय नवे सरकार येऊन तीन वर्षे झाली तरी ‘जैसे थे’ असल्याने शासनाचीच ‘गाव तेथे ग्रंथालय’योजना बासनात गुंडाळली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देनव्या ग्रंथालयांना मान्यता न देण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वीचा नवे सरकार येऊन तीन वर्षे झाली तरी बंदी कायमशासनानेच गुंडाळली ‘गाव तेथे ग्रंथालय’ योजना बासनात

समीर देशपांडे

कोल्हापूर , दि. १९ :  वाचनसंस्कृतीचा उच्चरवामध्ये उदो-उदो करणाऱ्यांचे शासन सत्तेत असतानाही गेली पाच वर्षे राज्यात एकही नवे शासनमान्य वाचनालय स्थापन होऊ शकले नाही हे वास्तव आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारने नव्या ग्रंथालयांना मान्यता न देण्याचा पाच वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय नवे सरकार येऊन तीन वर्षे झाली तरी ‘जैसे थे’ असल्याने शासनाचीच ‘गाव तेथे ग्रंथालय’ योजना बासनात गुंडाळली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सन २०१२ मध्ये आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील बैठकीमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रंथालयांना अनुदान वाढविण्याचा प्रस्ताव आणला होता. मात्र, ग्रंथालय चळवळीला आलेली सूज पाहून अजित पवार यांनी या प्रस्तावाला विरोध करत मुळात आहेत ती वाचनालये जागेवर आहेत का ते पहा, असे सुनावले होेते. त्याचवेळी नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद करण्याचा निर्णय घेतानाच राज्यातील ग्रंथालयांची महसूल खात्याच्यावतीने तपासणी मोहीम हाती घेण्याचे ठरले.

त्यानुसार महसूल खात्याचे अधिकारी, कर्मचारी गावा-गावांत फिरले. अनेक ठिकाणी बाहेर ग्रंथालयाचा फलक आणि आत काहीच नसल्याचे दिसून आले तर गावात ग्रंथालय असल्याची माहिती ग्रामस्थांना नसल्याचे स्पष्ट झाले होते. अशा ६०० ग्रंथालयांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. या ग्रंथालयांचे अनुदानही बंद करण्यात आले.

त्यानंतर न्यायालयातही लढा उभारण्यात आला. त्यातूनही अनुदान सुरू झाले; परंतु भाजप, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे झाली तरी नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्याबाबत काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जे विनोद तावडे विरोधी पक्षात होते ते व्हा आक्रमक होत होते त्यांच्याच अखत्यारित आता हे संचालनालय आल्यानंतर त्यांनी आता ई-ग्रंथालयांवर भर दिला आहे.

महाराष्ट्रातील सर्वजण केवळ मोबाईलवर पुस्तके वाचतात असा सरकारचा गैरसमज झालेला दिसतो. अजूनही दुर्गम गावांमध्ये ग्रंथालय तेथे येणारी पाच, सहा दैनिके, तेथे असणारी पुस्तके, मासिके अनेकांना दिलासा देतात अशी परिस्थिती आहे. तावडे यांच्या नेतृत्वाखाली ‘भिलार पुस्तकांचा गाव’ हा उपक्रम देशभरातील पहिला उपक्रम ठरला असला तरी गावोगावी हे सांस्कृतिक केंद्र चांगल्या पद्धतीने स्थापन केले जावे आणि ते कार्यरत राहावे यासाठीही निर्णय घेण्याची गरज आहे.

अनेक गावांमध्ये युवा प्रतिनिधी हे या ग्रंथालयांच्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम राबवत असल्याचे विधायक चित्र दिसून येत आहे. महिलांनाही ग्रंथालय हे एक प्रोत्साहन देणारे केंद्र बनू शकते. याचा विचार करून या चळवळीला बळ देण्यासाठी, ‘गाव तेथे ग्रंथालय’ही शासनाचीच योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे.

इतर राज्ये महाराष्ट्राच्या पुढे

एकेकाळी ग्रंथालय चळवळीत महाराष्ट्राचा देशभरामध्ये दुसरा क्रमांक होता. मात्र, इतर राज्यांनी विविध निर्णय घेत ग्रंथालय चळवळ बळकट केली आणि आता पश्चिम बंगाल, केरळ, मध्यप्रदेश राज्यांनी महाराष्ट्राला मागे टाकले आहे. हल्ली कोण वाचतोय म्हणून ग्रंथालयांकडे दुर्लक्ष केल्यास आपणहूनच एक परंपरा मोडीत काढण्यासाठी सहाय्यभूत ठरू. त्यापेक्षा मोबाईल वेडाला लगाम घालण्यासाठीचा एक चांगला प्रयत्न म्हणून या चळवळीकडे पाहावे लागेल.

१२ हजार ग्रंथालये कार्यरतराज्यात सध्या ३० हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायती आणि त्याहूनही अधिक गावे असताना केवळ १२ हजार ग्रंथालये आहेत. यापुढच्या काळात केवळ ग्रंथालय हे पुस्तक देवाण-घेवाणीचे केंद्र न बनता ते माहिती आणि सेवा केंद्र बनवणे सहज शक्य आहे. मात्र, त्यासाठी शासनाची तशी मानसिकता तयार होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :libraryवाचनालयliteratureसाहित्य