शहरं
Join us  
Trending Stories
1
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
2
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
3
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
4
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
5
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
6
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
7
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
8
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
9
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
10
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
11
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
12
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
13
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
14
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
15
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
16
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
17
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
18
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
19
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
20
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी

एकावर हल्लाः गल्ली बोळातून धावपळ, नानीबाई चिखलीत गव्याचा तब्बल सहा तास थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 19:24 IST

वेदगंगा नदीवरील बस्तवडे,आणूर दरम्यान असणाऱ्या बंधार्यावरून गव्यांचा कळप मंगळवारी रात्री ११च्या सुमारास जाताना नागरिकांनी पाहिला.यातीलच एक गवा कळप सोडून कौलगेमार्गे चिखलीकडे गेला असल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच सेनापती कापशी, गारगोटी वनविभागाचे अधिकारी तसेच,मुरगुड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गव्याला पकडण्यासाठी पथकाचे तब्बल चार तास अथक प्रयत्न सुरू होते.

ठळक मुद्दे नागरिकांची गर्दी

दत्ता पाटील   (म्हाकवे)

नानीबाई चिखली(ता.कागल)येथे भरदुपारी १वा. गव्याने चिखलीतील मगदूम, नुल्ले, आंबी गल्लीत हैदोस घातला.काही तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे तो भितरला होता.त्यांने रुद्ररूप धारण करत समोर येणाऱ्यांच्या दिशेने हल्ला चढविला होता. या गव्याच्या हल्ल्यात कृष्णात मारुती पोवार(वय५५) हे जखमी झाले.त्यांच्या कानाला दु:खापत झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करून त्यांना सीपीआर कडे हालविण्यात आले आहे.येथे तब्बल सहा तास गव्याचा थरार सुरू होता. त्याला पाहण्यासाठी चिखलीसह परिसरातील बघ्यांमुळे पथकाला गव्याला पकडण्यात अडचणी येत होत्या.वेदगंगा नदीवरील बस्तवडे,आणूर दरम्यान असणाऱ्या बंधार्यावरून गव्यांचा कळप मंगळवारी रात्री ११च्या सुमारास जाताना नागरिकांनी पाहिला.यातीलच एक गवा कळप सोडून कौलगेमार्गे चिखलीकडे गेला असल्याचा अंदाज आहे.घटनेची माहिती मिळताच सेनापती कापशी, गारगोटी वनविभागाचे अधिकारी तसेच,मुरगुड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गव्याला पकडण्यासाठी पथकाचे तब्बल चार तास अथक प्रयत्न सुरू होते.म्हाकवेतही गव्याचे दर्शनबुधवारी सकाळी९वा.म्हाकवे गावच्या पुर्वेकडील शिवारात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांनी गवे फिरताना पाहीले.त्यामुळे या महिला भयभीत होवून घरी परतल्या.तसेच,शेतकरी रात्रीअपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी तसेच,शेतीकामासाठी महिला शेतात जात असतात.परंतु, वारंवार गव्यांचे कळप दिसत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.....म्हणूनच गवे सैरभैरगत महिन्यात म्हाकवे आणूर मार्गावरून रात्रीचे मोटरसायकलने जाणाऱ्या युवकांवर कळपातील गव्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.जंगलात लावल्या जाणाऱ्या आगी आणि ऊसतोडीमुळे ऊसाचे क्षेत्र कमी होत आहे.त्यामुळे गव्यांना बसायला जागाच नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले असून रात्रंदिवस भरकटताना दिसत आहेत.त्यामुळे वेदगंगा व चिकोत्रा नदीकाठावरील गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग