शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

अर्जुनवाडाची एक गाव एक गणपतीची ७६ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:27 IST

राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर आणि पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी तरुण मंडळांना केलेल्या प्रबोधनाने आणखी चार गावांमध्ये एक गाव ...

राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर आणि पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी तरुण मंडळांना केलेल्या प्रबोधनाने आणखी चार गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना रुजली.

अर्जुनवाडा येथे पहिलवान नामदेव चौगुले, सरपंच संपदा चौगुले, माजी सरपंच शरद पाटील, शहाजी बरगे व ग्रामस्थांनी भक्तिभावाने गावातील सार्वजनिक तालमीमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू असलेल्या या परंपरेचा आदर्श आजही टिकून आहे. गावात अनेक गटातटाचे लोक असूनही ही मोहीम नवीन पिढीनेही जोपासली आहे. अनेक वेळा तालुका व जिल्ह्यातून या गावच्या उपक्रमांना विजेतेपद मिळाले आहे.

दूधगंगा नदीकाठावर वसलेले अर्जुनवाडा गाव ३५०० लोकवस्तीचे पहिलवानांचे गाव म्हणून राज्यात ओळख. महान भारतकेसरी व हिंदकेसरी दादु चौगले यांची जन्मभूमी असणाऱ्या गावातील काही जुन्याजाणत्या पहिलवान लोकांनी १९४४ मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात गावात एकच गणपती बसवण्याचा संकल्प केला. त्यावेळी पहिलवान भाऊसो यादव, गणपती तिकोडे, दत्तू वागरे, डॉ. दादासो यादव, दिनकर चौगले यांच्या पुढाकाराने श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. गावात एकच जुने तालीम मंडळ आहे. या तालमी शेजारील मंदिरात पहिलवान रूपातील श्री गणेशाची मूर्ती बसवली जाते. त्यावेळी तरुणांना एकत्र करून नामवंत मल्ल घडवण्याचे धडे देणे, गावात एकोपा वाढवणे, ब्रिटिश सरकारविरोधात आणि जुलमी राजवटीविरुद्ध हालचाली आदी खलबते येथे होऊ लागली. अनेक सामाजिक, प्रबोधनाचे उपक्रम राबवले जाऊ लागले. यातूनच पहिलवानांची जडणघडण झाली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक मंडळे आहेत. प्रत्येक गावांत सर्व तरुण मंडळे गणेशमूर्ती बसवतात. यातून इर्षा वाढते, वाद होतात; पण अर्जुनवाडा या सर्च गोष्टींना अपवाद आहे. आज गावांत तालीम मंडळे, तरुण मंडळे, विविध संस्था, राजकीय गटतट आहेत, इर्षा आहे; मात्र या उपक्रमावेळी बाकी सगळे बाजूला ठेवून सर्व गटाचे लोक एकत्र बांधले जातात. ग्रामस्थांच्या एकीमुळे आजही परंपरा शाबूत आहे.