शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
3
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
4
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
5
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
6
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
7
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
8
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
9
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
10
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
11
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
12
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
13
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
14
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
15
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
16
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
17
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
18
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
19
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
20
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

कोल्हापूर विभागात विक्रमी ऊस गाळप

By admin | Updated: April 19, 2016 00:52 IST

सरासरी १२.४१ उतारा : दोन कोटी ७८ लाख २५ हजार २४० क्विंटल उत्पादन; गाळपात ‘जवाहर’, तर उताऱ्यात ‘गुरुदत्त’ आघाडीवर

प्रकाश पाटील -- कोपार्डे --कोल्हापूर विभागातील ३८ साखर कारखान्यांनी हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला असून, या हंगामात दोन कोटी २४ लाख २७ हजार ४३० मे. टन विक्रमी उसाचे गाळप केले आहे. १२.४१ च्या सरासरी साखर उताऱ्यासह दोन कोटी ७८ लाख २५ हजार २४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ऊस गाळपात जवाहर-हुपरीने १५ लाख १६ हजार १०० मे. टन उसाचे गाळप करत विभागात आघाडी घेतली आहे, तर गुरुदत्त-टाकळीने सरासरी १३.५३ टक्के साखर उतारा मिळवत उताऱ्यात आघाडी घेतली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ.आर.पी.च्या ८० टक्के पहिला हप्ता देण्यासाठी आघाडी घेतली आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही ती दिली आहे. चालू हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पैकी २१ साखर कारखान्यांनी आपले गाळप हंगाम पूर्ण करत एक कोटी ४४ लाख ७१ हजार ४५३ मे. टन उसाचे गाळप केले आहे. १२.६० च्या सरासरी साखर उताऱ्यासह एक कोटी ८२ लाख ४० हजार १५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथीलच जवाहर साखर कारखान्याने १५ लाख १६ हजार मे. टन उसाचे गाळप करून विभागात ऊस गाळपात आघाडी घेतली आहे, तर गुरुदत्त-टाकळीने १३.५३ चा सरासरी साखर उतारा मिळवत विभागातच नव्हे, तर पण राज्यात प्रथम क्रमांकाचा उतारा मिळविला आहे.सांगली जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ६३ लाख ६२ हजार ६८५ मे. टन उसाचे गाळप केले आहे. १२.१९ च्या सरासरी साखर उताऱ्यासह ७७ लाख ५७ हजार ५४० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. हुतात्मा किसन अहिर, वाळवा कारखान्याने १३.०२ चा साखर उतारा मिळवून सांगली जिल्ह्यात आघाडी घेतली आहे, तर रा. बा. पाटील साखराळे युनिट-१ ने १० लाख ५२ हजार ६०० मे. टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे.मागील हंगाम २०१४/१५ मध्ये कोल्हापूर विभागात दोन कोटी ११ लाख ९७ हजार ६०५ मे. टन उसाचे गाळप झाले होते. १२.५३ च्या सरासरी साखर उताऱ्यासह दोन कोटी ६५ लाख ७० हजार ११६ क्विंटल साखर उत्पादन झाले होते. चालू हंगामात १२ लाख ३० हजार मे. टन उसाचे गाळप जादा झाले असून, १२ लाख ५५ हजार १२४ क्विंटल साखर उत्पादन जादा झाले आहे. मागील हंगामापेक्षा ०.१० ने उतारा मात्र घसरला आहे. कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा साखर कारखाने२३ (सहकारी १७, खासगी ६)१८ (सहकारी १३, खासगी ५) हंगाम घेतलेले २११७बंद कारखाने ०२०१उसाचे एकूण गाळप१ कोटी ४४ लाख६३ लाख ६२ हजार ७१ हजार ४५३ मे. टन ६८५ मे. टन साखरेचे एकूण उत्पादन १ कोटी ८२ लाख ७७ लाख ५७ हजार ४० हजार १५ क्विंटल५४० क्विंटलसरासरी साखर उतारा१२.६०१२.१९५० हजार टन ऊस शिल्लक कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर, दत्त-शिरोळ, शाहू-कागल, कुंभी-कासारी कुडित्रे, हमीदवाडा हे पाच साखर कारखाने सुरू आहेत, तर सांगली जिल्ह्यातील हुतात्मा किसन अहिर व सोनहिरा हे दोन कारखाने अद्याप सुरू आहेत. साधारण ५० हजार टन ऊस गाळप शिल्लक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, २० एप्रिलपर्यंत सर्व कारखान्यांचे गाळप हंगाम संपणार आहेत.