शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागात विक्रमी ऊस गाळप

By admin | Updated: April 19, 2016 00:52 IST

सरासरी १२.४१ उतारा : दोन कोटी ७८ लाख २५ हजार २४० क्विंटल उत्पादन; गाळपात ‘जवाहर’, तर उताऱ्यात ‘गुरुदत्त’ आघाडीवर

प्रकाश पाटील -- कोपार्डे --कोल्हापूर विभागातील ३८ साखर कारखान्यांनी हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला असून, या हंगामात दोन कोटी २४ लाख २७ हजार ४३० मे. टन विक्रमी उसाचे गाळप केले आहे. १२.४१ च्या सरासरी साखर उताऱ्यासह दोन कोटी ७८ लाख २५ हजार २४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ऊस गाळपात जवाहर-हुपरीने १५ लाख १६ हजार १०० मे. टन उसाचे गाळप करत विभागात आघाडी घेतली आहे, तर गुरुदत्त-टाकळीने सरासरी १३.५३ टक्के साखर उतारा मिळवत उताऱ्यात आघाडी घेतली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ.आर.पी.च्या ८० टक्के पहिला हप्ता देण्यासाठी आघाडी घेतली आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही ती दिली आहे. चालू हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पैकी २१ साखर कारखान्यांनी आपले गाळप हंगाम पूर्ण करत एक कोटी ४४ लाख ७१ हजार ४५३ मे. टन उसाचे गाळप केले आहे. १२.६० च्या सरासरी साखर उताऱ्यासह एक कोटी ८२ लाख ४० हजार १५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथीलच जवाहर साखर कारखान्याने १५ लाख १६ हजार मे. टन उसाचे गाळप करून विभागात ऊस गाळपात आघाडी घेतली आहे, तर गुरुदत्त-टाकळीने १३.५३ चा सरासरी साखर उतारा मिळवत विभागातच नव्हे, तर पण राज्यात प्रथम क्रमांकाचा उतारा मिळविला आहे.सांगली जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ६३ लाख ६२ हजार ६८५ मे. टन उसाचे गाळप केले आहे. १२.१९ च्या सरासरी साखर उताऱ्यासह ७७ लाख ५७ हजार ५४० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. हुतात्मा किसन अहिर, वाळवा कारखान्याने १३.०२ चा साखर उतारा मिळवून सांगली जिल्ह्यात आघाडी घेतली आहे, तर रा. बा. पाटील साखराळे युनिट-१ ने १० लाख ५२ हजार ६०० मे. टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे.मागील हंगाम २०१४/१५ मध्ये कोल्हापूर विभागात दोन कोटी ११ लाख ९७ हजार ६०५ मे. टन उसाचे गाळप झाले होते. १२.५३ च्या सरासरी साखर उताऱ्यासह दोन कोटी ६५ लाख ७० हजार ११६ क्विंटल साखर उत्पादन झाले होते. चालू हंगामात १२ लाख ३० हजार मे. टन उसाचे गाळप जादा झाले असून, १२ लाख ५५ हजार १२४ क्विंटल साखर उत्पादन जादा झाले आहे. मागील हंगामापेक्षा ०.१० ने उतारा मात्र घसरला आहे. कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा साखर कारखाने२३ (सहकारी १७, खासगी ६)१८ (सहकारी १३, खासगी ५) हंगाम घेतलेले २११७बंद कारखाने ०२०१उसाचे एकूण गाळप१ कोटी ४४ लाख६३ लाख ६२ हजार ७१ हजार ४५३ मे. टन ६८५ मे. टन साखरेचे एकूण उत्पादन १ कोटी ८२ लाख ७७ लाख ५७ हजार ४० हजार १५ क्विंटल५४० क्विंटलसरासरी साखर उतारा१२.६०१२.१९५० हजार टन ऊस शिल्लक कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर, दत्त-शिरोळ, शाहू-कागल, कुंभी-कासारी कुडित्रे, हमीदवाडा हे पाच साखर कारखाने सुरू आहेत, तर सांगली जिल्ह्यातील हुतात्मा किसन अहिर व सोनहिरा हे दोन कारखाने अद्याप सुरू आहेत. साधारण ५० हजार टन ऊस गाळप शिल्लक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, २० एप्रिलपर्यंत सर्व कारखान्यांचे गाळप हंगाम संपणार आहेत.