शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागात विक्रमी ऊस गाळप

By admin | Updated: April 19, 2016 00:52 IST

सरासरी १२.४१ उतारा : दोन कोटी ७८ लाख २५ हजार २४० क्विंटल उत्पादन; गाळपात ‘जवाहर’, तर उताऱ्यात ‘गुरुदत्त’ आघाडीवर

प्रकाश पाटील -- कोपार्डे --कोल्हापूर विभागातील ३८ साखर कारखान्यांनी हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला असून, या हंगामात दोन कोटी २४ लाख २७ हजार ४३० मे. टन विक्रमी उसाचे गाळप केले आहे. १२.४१ च्या सरासरी साखर उताऱ्यासह दोन कोटी ७८ लाख २५ हजार २४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ऊस गाळपात जवाहर-हुपरीने १५ लाख १६ हजार १०० मे. टन उसाचे गाळप करत विभागात आघाडी घेतली आहे, तर गुरुदत्त-टाकळीने सरासरी १३.५३ टक्के साखर उतारा मिळवत उताऱ्यात आघाडी घेतली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ.आर.पी.च्या ८० टक्के पहिला हप्ता देण्यासाठी आघाडी घेतली आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही ती दिली आहे. चालू हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पैकी २१ साखर कारखान्यांनी आपले गाळप हंगाम पूर्ण करत एक कोटी ४४ लाख ७१ हजार ४५३ मे. टन उसाचे गाळप केले आहे. १२.६० च्या सरासरी साखर उताऱ्यासह एक कोटी ८२ लाख ४० हजार १५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथीलच जवाहर साखर कारखान्याने १५ लाख १६ हजार मे. टन उसाचे गाळप करून विभागात ऊस गाळपात आघाडी घेतली आहे, तर गुरुदत्त-टाकळीने १३.५३ चा सरासरी साखर उतारा मिळवत विभागातच नव्हे, तर पण राज्यात प्रथम क्रमांकाचा उतारा मिळविला आहे.सांगली जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ६३ लाख ६२ हजार ६८५ मे. टन उसाचे गाळप केले आहे. १२.१९ च्या सरासरी साखर उताऱ्यासह ७७ लाख ५७ हजार ५४० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. हुतात्मा किसन अहिर, वाळवा कारखान्याने १३.०२ चा साखर उतारा मिळवून सांगली जिल्ह्यात आघाडी घेतली आहे, तर रा. बा. पाटील साखराळे युनिट-१ ने १० लाख ५२ हजार ६०० मे. टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे.मागील हंगाम २०१४/१५ मध्ये कोल्हापूर विभागात दोन कोटी ११ लाख ९७ हजार ६०५ मे. टन उसाचे गाळप झाले होते. १२.५३ च्या सरासरी साखर उताऱ्यासह दोन कोटी ६५ लाख ७० हजार ११६ क्विंटल साखर उत्पादन झाले होते. चालू हंगामात १२ लाख ३० हजार मे. टन उसाचे गाळप जादा झाले असून, १२ लाख ५५ हजार १२४ क्विंटल साखर उत्पादन जादा झाले आहे. मागील हंगामापेक्षा ०.१० ने उतारा मात्र घसरला आहे. कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा साखर कारखाने२३ (सहकारी १७, खासगी ६)१८ (सहकारी १३, खासगी ५) हंगाम घेतलेले २११७बंद कारखाने ०२०१उसाचे एकूण गाळप१ कोटी ४४ लाख६३ लाख ६२ हजार ७१ हजार ४५३ मे. टन ६८५ मे. टन साखरेचे एकूण उत्पादन १ कोटी ८२ लाख ७७ लाख ५७ हजार ४० हजार १५ क्विंटल५४० क्विंटलसरासरी साखर उतारा१२.६०१२.१९५० हजार टन ऊस शिल्लक कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर, दत्त-शिरोळ, शाहू-कागल, कुंभी-कासारी कुडित्रे, हमीदवाडा हे पाच साखर कारखाने सुरू आहेत, तर सांगली जिल्ह्यातील हुतात्मा किसन अहिर व सोनहिरा हे दोन कारखाने अद्याप सुरू आहेत. साधारण ५० हजार टन ऊस गाळप शिल्लक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, २० एप्रिलपर्यंत सर्व कारखान्यांचे गाळप हंगाम संपणार आहेत.