शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

मोटारसायकल दुरुस्त करताना शब्द लागले सुचू, मेकॅनिक विजय पाटील बनले कादंबरीकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 16:26 IST

मेकॅनिक म्हणून काम करणारे विजय शहाजी पाटील यांची आता लेखक म्हणून ओळख दृढ होऊ लागली

समीर देशपांडे

कोल्हापूर : मोटारसायकल दुरुस्त करताना कथेचा विषय त्यांच्या डोक्यात येऊ लागला. हातात पाना घेऊन नटबोल्ट निखळताना त्यांना शब्द सुचू लागले आणि यातूनच मग एका कादंबरीकाराचा जन्म झाला. इथल्या शाहू स्टेडियमच्या गाळ्यात मेकॅनिक म्हणून काम करणारे विजय शहाजी पाटील यांची आता लेखक म्हणून ओळख दृढ होऊ लागली आहे.

राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे हे पाटील यांचे मूळ गाव. तेथील रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे १२ वी कॉमर्सपर्यंतचे शिक्षण झाले. कोल्हापूर टेक्निकलमध्ये मोटर रिवायडिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्राॅनिक्सचे शिक्षण त्यांनी घेतले. १९९४ पासून त्यांनी दुसऱ्याच्या गॅरेजमध्ये उमेदवारी सुरू केली. तीन वर्षात यातील कौशल्य शिकून घेतल्यानंतर उद्यमनगरमध्ये तीन वर्षे भाड्याच्या काळात वर्कशॉप सुरू केले. आता शाहू स्टेडियमच्या मालकीच्या गाळ्यात त्यांचे वर्कशॉप सुरू आहे.

एकीकडे चरितार्थासाठी पाटील यांची धडपड सुरू असताना दुसरीकडे अनेक विषय त्यांना डोक्यात घोळत होते. त्यांनी ते शब्दांच्या माध्यमातून कागदावर आणले. शिक्षण संपल्यानंतर अनेक मित्रांना त्यांनी आपल्या कथा दाखवल्या. शेतकऱ्याच्या आयुष्यावर त्यांनी ‘आम्ही जगाचे कैवारी’ ही कादंबरी लिहिली. वाचन कट्टाचे युवराज कदम यांनी ती प्रकाशित केली आणि मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या पाटील यांना लेखक म्हणून ओळख मिळाली.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी .शिर्के आणि प्रेरणादायी वक्ते इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते या कादंबरीचे चार महिन्यांपूर्वी प्रकाशन झाले. अनेक महाविद्यालयांमध्ये, वाचनालयांमध्ये त्यांची ही कादंबरी पोहोचली आहे. त्यांना कादंबरी आवडल्याची पत्रेही येत आहेत. लिखाणाची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या पाटील यांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून शेतकऱ्याचे दुखणे मांडत असताना आपली एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे.

माझ्या ‘आम्ही जगाचे कैवारी’ या कादंबरीला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझा ‘अंश’ हा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असून लवकरच दुष्काळग्रस्तांचे दुख मांडणारी ‘ऊर्मी आणि दिशा’ ही कादंबरी प्रकाशित होणार आहे. या शब्दांच्या माध्यमातून मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला लेखक म्हणून एक वेगळी ओळख मिळू लागली आहे याचे समाधान आहे. -विजय पाटील, कसबा वाळवे

टॅग्स :kolhapurकोल्हापूर