शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नेत्रदानाच्या संकल्पनेला उदासीनतेची दृष्ट

By admin | Updated: June 10, 2015 00:27 IST

मृत्यूनंतर नातेवाईकांकडून विरोध : नेत्रदात्यांची संख्या २५ वर्षांत हजाराच्या आतच, नेत्रदान नगण्यच

संदीप खवळे- कोल्हापूर -आधुनिकीकरणाच्या वाटेवर वेगाने चालणारा समाज आजही नेत्रदान करण्याबाबत उदासीन आहे़ नेत्रदानासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने नोंदणी होते़ परंतु, हा संकल्प करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानासाठी नातेवाइकांकडून आणि नागरिकांकडूनच विरोध होत असल्यामुळे नेत्रदानाचा आकडा गेल्या २५ वर्षांत हजाराच्या आतच घुटमळत असल्याचे चित्र आहे़ शहरातील नेत्रपेढ्यांमध्ये दृष्टिप्राप्तीसाठी प्रतीक्षा यादी आहे़ आज, बुधवारी ‘जागतिक नेत्रदान दिन’ आहे़ या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख नेत्रपेढ्यांशी संपर्क साधला असता, नेत्रदानाचा संकल्प उदासीनतेच्या दृष्टीत अडकल्याची माहिती संबंधितांनी दिली़ मृत्यूनंतर अग्नीसोबत डोळेही भस्मसात होतात; पण हेच नेत्र दान केले तर दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना या सृष्टीचे दर्शन होईल़ अंध व्यक्तींना सृष्टीच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार घडवण्यासाठी मृत व्यक्तींचे नेत्र उपयुक्त ठरतात़ हे नेत्र चार तासांच्या आत काढले, तर अंध व्यक्तींसाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो़ परंतु, नेत्र काढणे म्हणजे मृतदेहाची विटंबनाच, ही भावना आजही समाजामध्ये आहे़ अंधश्रद्धेपोटी नेत्रदानाला विरोध केला जातो़ परिणामी, आज नेत्रांची मागणी आणि पुरवठा यात प्रचंड तफावत आहे़ येथील कोल्हापूर नेत्रदान पेढीमध्ये दर महिन्याला सरासरी दहाजण प्रतीक्षा यादीमध्ये असतात; पण दोघांनाच नेत्र उपलब्ध होतात़ दरवर्षी हजारोंच्या संख्येने नोंदणी होते; पण नेत्रदानाचा संकल्प केलेली व्यक्ती मृत झाल्यानंतर डॉक्टर तेथे गेल्यास कुटुंबीयांकडून विरोध होतो़ कुटुंबातील सदस्यांची तयारी असते; मात्र अन्य नातलगांकडून विरोध होतो. नोंदणीच्या तुलनेत नेत्रदानासाठी नगण्य प्रतिसाद आहे़ २५ वर्षांत आमच्याकडे सुमारे सहा हजारांची नोंदणी झाली़ पैकी अंदाजे ८५० नेत्रदान झाले आहे़ मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे, अशी माहिती सर्वमंगल सेवा संस्था संचलित कोल्हापूर नेत्रपेढीचे सचिव चंद्रकांत मेहता यांनी दिली़ डॉ़ अतुल जोगळेकर म्हणाले, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे नेत्र अंध व्यक्तीला पूर्वी २४ तासांत बसवणे आवश्यक होते़ परंतु, ‘एमकेमेडिया’ या तंत्रज्ञानामुळे मृतदेहाचे नेत्र काढल्यानंतर ते चार दिवसांपर्यंत अन्य अंध व्यक्तीला बसवले जाऊ शकतात़ कॅन्सर, एचआयव्ही आणि कावीळ हे आजार असलेल्या व्यक्तींचे नेत्र घेतले जात नाहीत़ अपघातामध्ये डोळ्याला इजा होऊन दृष्टी गेलेल्या व्यक्तींना किंवा कॉर्निया अपारदर्शक झालेल्या व्यक्तींना नेत्रदानामुळे दृष्टी प्राप्त होते़ त्यासाठी मेंदू आणि डोळा यामधील शिरा कार्यरत असणे आवश्यक आहे़ नेत्ररोपणानंतर २४ तासांनी दिसू लागते़लहानपणापासून मला कमी दिसत होते़ कॉर्निया अपारदर्शी झाल्यामुळे ही समस्या होती़ वयाची साठी ओलांडल्यानंतर खूपच अंधुक दिसू लागले़ त्यामुळे २०११ मध्ये कोल्हापुरात नेत्ररोपण करून घेतले़ नेत्ररोपणानंतर डोळ्यांवरची पट्टी काही तासांनी उघडताच सभोवतालचे स्पष्ट दिसू लागले अन् एक वेगळे समाधान अनुभवले़ कुणीतरी केलेल्या नेत्रदानामुळे मला हा आनंद अनुभवता आला़ नेत्रदानाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.- विद्या गोखले, मालवण.