शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदानाच्या संकल्पनेला उदासीनतेची दृष्ट

By admin | Updated: June 10, 2015 00:27 IST

मृत्यूनंतर नातेवाईकांकडून विरोध : नेत्रदात्यांची संख्या २५ वर्षांत हजाराच्या आतच, नेत्रदान नगण्यच

संदीप खवळे- कोल्हापूर -आधुनिकीकरणाच्या वाटेवर वेगाने चालणारा समाज आजही नेत्रदान करण्याबाबत उदासीन आहे़ नेत्रदानासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने नोंदणी होते़ परंतु, हा संकल्प करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानासाठी नातेवाइकांकडून आणि नागरिकांकडूनच विरोध होत असल्यामुळे नेत्रदानाचा आकडा गेल्या २५ वर्षांत हजाराच्या आतच घुटमळत असल्याचे चित्र आहे़ शहरातील नेत्रपेढ्यांमध्ये दृष्टिप्राप्तीसाठी प्रतीक्षा यादी आहे़ आज, बुधवारी ‘जागतिक नेत्रदान दिन’ आहे़ या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख नेत्रपेढ्यांशी संपर्क साधला असता, नेत्रदानाचा संकल्प उदासीनतेच्या दृष्टीत अडकल्याची माहिती संबंधितांनी दिली़ मृत्यूनंतर अग्नीसोबत डोळेही भस्मसात होतात; पण हेच नेत्र दान केले तर दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना या सृष्टीचे दर्शन होईल़ अंध व्यक्तींना सृष्टीच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार घडवण्यासाठी मृत व्यक्तींचे नेत्र उपयुक्त ठरतात़ हे नेत्र चार तासांच्या आत काढले, तर अंध व्यक्तींसाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो़ परंतु, नेत्र काढणे म्हणजे मृतदेहाची विटंबनाच, ही भावना आजही समाजामध्ये आहे़ अंधश्रद्धेपोटी नेत्रदानाला विरोध केला जातो़ परिणामी, आज नेत्रांची मागणी आणि पुरवठा यात प्रचंड तफावत आहे़ येथील कोल्हापूर नेत्रदान पेढीमध्ये दर महिन्याला सरासरी दहाजण प्रतीक्षा यादीमध्ये असतात; पण दोघांनाच नेत्र उपलब्ध होतात़ दरवर्षी हजारोंच्या संख्येने नोंदणी होते; पण नेत्रदानाचा संकल्प केलेली व्यक्ती मृत झाल्यानंतर डॉक्टर तेथे गेल्यास कुटुंबीयांकडून विरोध होतो़ कुटुंबातील सदस्यांची तयारी असते; मात्र अन्य नातलगांकडून विरोध होतो. नोंदणीच्या तुलनेत नेत्रदानासाठी नगण्य प्रतिसाद आहे़ २५ वर्षांत आमच्याकडे सुमारे सहा हजारांची नोंदणी झाली़ पैकी अंदाजे ८५० नेत्रदान झाले आहे़ मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे, अशी माहिती सर्वमंगल सेवा संस्था संचलित कोल्हापूर नेत्रपेढीचे सचिव चंद्रकांत मेहता यांनी दिली़ डॉ़ अतुल जोगळेकर म्हणाले, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे नेत्र अंध व्यक्तीला पूर्वी २४ तासांत बसवणे आवश्यक होते़ परंतु, ‘एमकेमेडिया’ या तंत्रज्ञानामुळे मृतदेहाचे नेत्र काढल्यानंतर ते चार दिवसांपर्यंत अन्य अंध व्यक्तीला बसवले जाऊ शकतात़ कॅन्सर, एचआयव्ही आणि कावीळ हे आजार असलेल्या व्यक्तींचे नेत्र घेतले जात नाहीत़ अपघातामध्ये डोळ्याला इजा होऊन दृष्टी गेलेल्या व्यक्तींना किंवा कॉर्निया अपारदर्शक झालेल्या व्यक्तींना नेत्रदानामुळे दृष्टी प्राप्त होते़ त्यासाठी मेंदू आणि डोळा यामधील शिरा कार्यरत असणे आवश्यक आहे़ नेत्ररोपणानंतर २४ तासांनी दिसू लागते़लहानपणापासून मला कमी दिसत होते़ कॉर्निया अपारदर्शी झाल्यामुळे ही समस्या होती़ वयाची साठी ओलांडल्यानंतर खूपच अंधुक दिसू लागले़ त्यामुळे २०११ मध्ये कोल्हापुरात नेत्ररोपण करून घेतले़ नेत्ररोपणानंतर डोळ्यांवरची पट्टी काही तासांनी उघडताच सभोवतालचे स्पष्ट दिसू लागले अन् एक वेगळे समाधान अनुभवले़ कुणीतरी केलेल्या नेत्रदानामुळे मला हा आनंद अनुभवता आला़ नेत्रदानाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.- विद्या गोखले, मालवण.