शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रशिक्षण मंडळाच्या गोंधळात विद्यार्थ्यांचा बळी

By admin | Updated: July 31, 2015 01:00 IST

अर्धवट पेपर तपासणी : पुरवण्या गायब होण्याचे प्रकार

संदीप खवळे / कोल्हापूर अर्धवट पेपर तपासणी, अख्खी पुरवणीच गायब, निकालपत्रक वेळेत नाही असा सावळा गोंधळ महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या कारभारात आढळून येत आहेत. गारगोटी येथील इन्स्टिट्यूट आॅफ सिव्हील अँड रूरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यांत्रिकी शाखेत पदविकेच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘इंजिनिअरिंग ड्रॉर्इंग’ या पेपरची एक पुरवणीच गायब झाली आहे. बोर्डाने पाठविलेल्या उत्तरपत्रिकेच्या फोटो कॉपीमध्ये ही पुरवणीच नाही. इंजिनिअरिंग ड्रॉर्इंग विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ४० गुणांची आवश्यकता आहे. संबंधित विद्यार्थ्यांला ३० गुण मिळाले आहेत. बोर्डाने न पाठविलेल्या पुरवणीमधील प्रश्नासाठी १६ गुण होते, पण पुरवणीच गहाळ झाल्यामुळे संबंधित प्रश्न तपासला गेलेला नाही. उलट एकाच प्रश्नाची पुरवणी दोनदा जोडल्याची तक्रार या विद्यार्थ्याच्या पालकाने केली आहे. याच कॉलेजमध्ये आयटी शाखेत शिकणाऱ्या निशिगंधा चौगले ह्या विद्यार्थिनीचा ‘अ‍ॅप्लाईड मॅथ्स्’ या विषयातील चार गुणांचा प्रश्न परीक्षकाने न तपासल्यामुळे ही विद्यार्थिंनी अनुत्तीर्ण झाली होती. तिला शंभरपैकी २९ गुण मिळाले. उत्तीर्ण होण्यासाठी किमान ३० गुणांची आवश्यकता आहे. तंत्रशिक्षण मंडळाच्या ‘अ‍ॅन्सर की’प्रमाणे या प्रश्नाचे उत्तर निशिगंधा हिने अचूकपणे सोडविले होते. हा प्रश्न तपासला असता तर तिला ३३ गुण मिळाले असते. निशिगंधा हिच्या वडिलांनी बोर्डाकडून संबंधित पेपरच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागवून घेतली असता, प्रश्नक्रमांक ६-सी तपासला नसल्याचे आढळले. फेरतपासणीमध्येही ही चूक बोर्डाच्या लक्षात आली नाही पण पालकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे निशिगंधा हिला न तपासलेल्या प्रश्नांसाठी दोन गुण देण्यात आले व ती उत्तीर्ण झाली. गुणपत्रिका देण्यासही तंत्रशिक्षण खात्याने आठ दिवस घालवले. या सावळा-गोंधळात अभियांत्रिकीच्या पदवीच्या प्रवेशासाठी शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीला गुणपत्रक मिळाले. प्रवेशास अर्ज भरण्यासाठी पालक-विद्यार्थिनीची प्रचंड धावपळ उडाली. तंत्रशिक्षण मंडळाच्या या सावळा-गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जागरूक पालकांचा अपवाद सोडला तर बोर्डाच्या या कारभारापुढे हात टेकल्याशिवाय पर्याय नाही. तंत्रशिक्षण मंडळाच्या कार्यालयाकडूनही उडवाउडवीचे उत्तरेच मिळतात अन् महाविद्यालये बोर्डाकडे बोट दाखवितात. अनेक पालकांनी तंत्रशिक्षण खात्याच्या या कारभाराला कंटाळून फेरतपासणीचा नाद सोडला आहे, अशी माहिती या प्र्रकरणात तंत्रशिक्षण मंडळाच्या मुंबई कार्यालयापर्यंत पाठपुरावा केलेले पालक निवास चौगले यांनी दिली.