शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन, ९० व्या वर्षी कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 11:51 IST

कोल्हापूर : मराठमोळ्या घरंदाज व ग्रामीण बाज असलेल्या अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीत ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता माधव तांबे ...

कोल्हापूर : मराठमोळ्या घरंदाज व ग्रामीण बाज असलेल्या अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीत ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता माधव तांबे (वय ९०) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. पंचगंगा स्मशनाभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या बुधवारी आहे.वृद्धापकाळातील व्याधींमुळे गेली काही महिने त्यांना सावली केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. कधी खाष्ट ग्रामीण स्त्री, पाटलीण तर कधी घरंदाज स्त्री, मायाळू आई, सासू अशा अनेक भूमिका त्यांनी निभावल्या. सहजसुंदर अभिनय आणि साधेपणामुळे त्या प्रेक्षकांना आपल्यातल्याच एक वाटायच्या. शांत, मायाळू स्वभावाच्या शांता तांबे या स्वत:ला भूमिकेत झोकून द्यायच्या. त्यांची दिवंगत अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्यासोबतची चहाची जाहिरात व प्रेमा तुझा रंग कसा या नाटकातील भूमिका गाजली होती.शांता तांबे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या. वडिलांच्या हॉटेलात नाटक मंडळीतील लोक येत असल्याने त्यांना या क्षेत्राची माहिती होती. त्या १५ वर्षांच्या असताना वडील वारले, घरची आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने आईने लग्न लावून द्यायचा निर्णय घेतला, पण अनोळखी व्यक्तींशी लग्न करणार नाही असे सांगून त्यांनी नात्यातील स्थळ शोधायला सांगितले. अखेर मामाशीच त्यांचा विवाह झाला.चरितार्थासाठी हे कुटुंब कोल्हापूरला आले. कोल्हापुरात त्या राम गल्लीत राहायच्या. नाटक मंडळीतील लोकांशी असलेल्या ओळखीने त्यांना नाटकात काम मिळाले. सुरुवातीला देशबंधू संगीत मंडळीत तसेच वेगवेगळ्या नाटकांमध्ये मॉबमध्ये काम केले. पुढे मराठी चित्रपटात लहानमोठ्या भूमिका करत त्यांनी आपला ठसा उमटवला. मानिनी चित्रपटातील भूमिकेने त्यांना ओळख दिली.त्यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने यांच्या दिग्दर्शनाखाली काम केले. मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, सुगंधी कट्टा, आई पाहिजे, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या, चांडाळ चौकडी, दोन बायका फजिती ऐका, मुंबईचा फौजदार, प्रतिकार, निर्मला मच्छिंद्र कांबळे, एक गाव बारा भानगडी, मर्दानी, आई पाहिजे हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.अलीकडे ‘तुझ्यात जीव गुंतला’ या मराठी मालिकेतही त्यांनी भूमिका केली होती. ‘सवाल माझा ऐका’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. काही काळ त्यांनी पती माधव यांच्यासाेबत मंगल कलामंदिर ही नाट्य संस्थादेखील चालवली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर