शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

भाजीपाल्याच्या दरात वाढ, मेथी, पालकही कडाडली : कडधान्य, साखर तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 14:00 IST

महापूर, श्रावणाचा शेवट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गवार, श्रावण घेवडा, कारली, भेंडी ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली असून, गेल्या आठवड्यापेक्षा त्यात दीडपट वाढ झाली आहे. कडधान्यांच्या दरातील तेजी कायम असून, साखरेनेही उचल खाण्यास सुरुवात केली आहे. तुलनेत फळमार्केट शांत असून, दर स्थिर आहेत.

ठळक मुद्देभाजीपाल्याच्या दरात वाढ, मेथी, पालकही कडाडली कडधान्य, साखर तेजीत

कोल्हापूर : महापूर, श्रावणाचा शेवट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गवार, श्रावण घेवडा, कारली, भेंडी ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली असून, गेल्या आठवड्यापेक्षा त्यात दीडपट वाढ झाली आहे. कडधान्यांच्या दरातील तेजी कायम असून, साखरेनेही उचल खाण्यास सुरुवात केली आहे. तुलनेत फळमार्केट शांत असून, दर स्थिर आहेत.महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात भाजीपाला उद्ध्वस्त झाला आहे. त्याचा परिणाम कोल्हापुरातील आवकेवर झाल्याने दरात वाढ झाली; पण कर्नाटकातून भाजीपाल्याची आवक झाल्याने दर थोडेफार आवाक्यात आले असताना या आठवड्यात भाजीपाल्याने आणखी उसळी घेतली आहे.

श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याची मागणी वाढली आहे; त्यामुळे दरात वाढ झाली आहे. घेवड्याची आवक श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात होते. पावसामुळे ती कमी झाल्याने घेवड्याचे दर वाढले असून, किरकोळ बाजारात ८० रुपये किलो आहे.

गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचेही दर ६० पासून १०० रुपयांपर्यंत आहेत. वांगी ७५ रुपये, तर ओला वाटाणा १२० रुपये किलो आहे. एरव्ही १0-१५ रुपये असणारा टोमॅटो रविवारी ३0 रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. कोथिंबिरीची पेंढी २० रुपये, मेथी २५ रुपये, तर पालक २० रुपये पेंढी आहे.महापुरानंतर कडधान्यांची आवक मंदावली असून, किरकोळ बाजारात दर वाढले आहेत. ज्वारी ३५ ते ५० रुपये किलोपर्यंत आहे. तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरात थोडी थोडी वाढ होत आहे. साखरेचे दरही वाढले असून, किरकोळ बाजारात ते ३६ रुपये किलो आहे. सरकी तेल, शाबूसह इतर किराणा वस्तूंचे दर स्थिर आहेत.फळ मार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल सुरू असली, तरी दर स्थिर राहिले आहेत. गणेशोत्सवासाठी फळमार्केट सज्ज झाले असून, सफरचंद, डाळिंब, मोसंबी, सीताफळाची आवक बऱ्यापैकी आहे. कांद्याची आवक मंदावल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा २७ रुपये किलो आहे. बटाट्याचे दर मात्र स्थिर आहेत.गूळ ५० रुपये किलो!गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या दरात वाढ झाली आहे. गुळाचा हंगाम संपल्यापासून ४० रुपये किलो दर होता; मात्र किलोमागे १0 रुपयांची वाढ झाली असून, किरकोळ बाजारात ५० रुपये किलो आहे.

‘ड्रायगन’, ‘किव्ही’ची मागणी वाढलीजिल्ह्यात महापुरानंतर पावसाने एकदम उघडीप दिल्याने साथीच्या आजारांचा फैलाव झाला आहे. रक्तातील प्लेटलेटची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असून, त्यासाठी ‘ड्रायगन’, ‘किव्ही’ फळांची मागणी वाढली आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर