शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाजीपाल्याच्या दरात वाढ, मेथी, पालकही कडाडली : कडधान्य, साखर तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 14:00 IST

महापूर, श्रावणाचा शेवट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गवार, श्रावण घेवडा, कारली, भेंडी ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली असून, गेल्या आठवड्यापेक्षा त्यात दीडपट वाढ झाली आहे. कडधान्यांच्या दरातील तेजी कायम असून, साखरेनेही उचल खाण्यास सुरुवात केली आहे. तुलनेत फळमार्केट शांत असून, दर स्थिर आहेत.

ठळक मुद्देभाजीपाल्याच्या दरात वाढ, मेथी, पालकही कडाडली कडधान्य, साखर तेजीत

कोल्हापूर : महापूर, श्रावणाचा शेवट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गवार, श्रावण घेवडा, कारली, भेंडी ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली असून, गेल्या आठवड्यापेक्षा त्यात दीडपट वाढ झाली आहे. कडधान्यांच्या दरातील तेजी कायम असून, साखरेनेही उचल खाण्यास सुरुवात केली आहे. तुलनेत फळमार्केट शांत असून, दर स्थिर आहेत.महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात भाजीपाला उद्ध्वस्त झाला आहे. त्याचा परिणाम कोल्हापुरातील आवकेवर झाल्याने दरात वाढ झाली; पण कर्नाटकातून भाजीपाल्याची आवक झाल्याने दर थोडेफार आवाक्यात आले असताना या आठवड्यात भाजीपाल्याने आणखी उसळी घेतली आहे.

श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याची मागणी वाढली आहे; त्यामुळे दरात वाढ झाली आहे. घेवड्याची आवक श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात होते. पावसामुळे ती कमी झाल्याने घेवड्याचे दर वाढले असून, किरकोळ बाजारात ८० रुपये किलो आहे.

गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचेही दर ६० पासून १०० रुपयांपर्यंत आहेत. वांगी ७५ रुपये, तर ओला वाटाणा १२० रुपये किलो आहे. एरव्ही १0-१५ रुपये असणारा टोमॅटो रविवारी ३0 रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. कोथिंबिरीची पेंढी २० रुपये, मेथी २५ रुपये, तर पालक २० रुपये पेंढी आहे.महापुरानंतर कडधान्यांची आवक मंदावली असून, किरकोळ बाजारात दर वाढले आहेत. ज्वारी ३५ ते ५० रुपये किलोपर्यंत आहे. तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरात थोडी थोडी वाढ होत आहे. साखरेचे दरही वाढले असून, किरकोळ बाजारात ते ३६ रुपये किलो आहे. सरकी तेल, शाबूसह इतर किराणा वस्तूंचे दर स्थिर आहेत.फळ मार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल सुरू असली, तरी दर स्थिर राहिले आहेत. गणेशोत्सवासाठी फळमार्केट सज्ज झाले असून, सफरचंद, डाळिंब, मोसंबी, सीताफळाची आवक बऱ्यापैकी आहे. कांद्याची आवक मंदावल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा २७ रुपये किलो आहे. बटाट्याचे दर मात्र स्थिर आहेत.गूळ ५० रुपये किलो!गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या दरात वाढ झाली आहे. गुळाचा हंगाम संपल्यापासून ४० रुपये किलो दर होता; मात्र किलोमागे १0 रुपयांची वाढ झाली असून, किरकोळ बाजारात ५० रुपये किलो आहे.

‘ड्रायगन’, ‘किव्ही’ची मागणी वाढलीजिल्ह्यात महापुरानंतर पावसाने एकदम उघडीप दिल्याने साथीच्या आजारांचा फैलाव झाला आहे. रक्तातील प्लेटलेटची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असून, त्यासाठी ‘ड्रायगन’, ‘किव्ही’ फळांची मागणी वाढली आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर