शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

भाजीपाल्याच्या दरात वाढ, मेथी, पालकही कडाडली : कडधान्य, साखर तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 14:00 IST

महापूर, श्रावणाचा शेवट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गवार, श्रावण घेवडा, कारली, भेंडी ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली असून, गेल्या आठवड्यापेक्षा त्यात दीडपट वाढ झाली आहे. कडधान्यांच्या दरातील तेजी कायम असून, साखरेनेही उचल खाण्यास सुरुवात केली आहे. तुलनेत फळमार्केट शांत असून, दर स्थिर आहेत.

ठळक मुद्देभाजीपाल्याच्या दरात वाढ, मेथी, पालकही कडाडली कडधान्य, साखर तेजीत

कोल्हापूर : महापूर, श्रावणाचा शेवट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गवार, श्रावण घेवडा, कारली, भेंडी ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली असून, गेल्या आठवड्यापेक्षा त्यात दीडपट वाढ झाली आहे. कडधान्यांच्या दरातील तेजी कायम असून, साखरेनेही उचल खाण्यास सुरुवात केली आहे. तुलनेत फळमार्केट शांत असून, दर स्थिर आहेत.महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात भाजीपाला उद्ध्वस्त झाला आहे. त्याचा परिणाम कोल्हापुरातील आवकेवर झाल्याने दरात वाढ झाली; पण कर्नाटकातून भाजीपाल्याची आवक झाल्याने दर थोडेफार आवाक्यात आले असताना या आठवड्यात भाजीपाल्याने आणखी उसळी घेतली आहे.

श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याची मागणी वाढली आहे; त्यामुळे दरात वाढ झाली आहे. घेवड्याची आवक श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात होते. पावसामुळे ती कमी झाल्याने घेवड्याचे दर वाढले असून, किरकोळ बाजारात ८० रुपये किलो आहे.

गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचेही दर ६० पासून १०० रुपयांपर्यंत आहेत. वांगी ७५ रुपये, तर ओला वाटाणा १२० रुपये किलो आहे. एरव्ही १0-१५ रुपये असणारा टोमॅटो रविवारी ३0 रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. कोथिंबिरीची पेंढी २० रुपये, मेथी २५ रुपये, तर पालक २० रुपये पेंढी आहे.महापुरानंतर कडधान्यांची आवक मंदावली असून, किरकोळ बाजारात दर वाढले आहेत. ज्वारी ३५ ते ५० रुपये किलोपर्यंत आहे. तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरात थोडी थोडी वाढ होत आहे. साखरेचे दरही वाढले असून, किरकोळ बाजारात ते ३६ रुपये किलो आहे. सरकी तेल, शाबूसह इतर किराणा वस्तूंचे दर स्थिर आहेत.फळ मार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल सुरू असली, तरी दर स्थिर राहिले आहेत. गणेशोत्सवासाठी फळमार्केट सज्ज झाले असून, सफरचंद, डाळिंब, मोसंबी, सीताफळाची आवक बऱ्यापैकी आहे. कांद्याची आवक मंदावल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा २७ रुपये किलो आहे. बटाट्याचे दर मात्र स्थिर आहेत.गूळ ५० रुपये किलो!गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या दरात वाढ झाली आहे. गुळाचा हंगाम संपल्यापासून ४० रुपये किलो दर होता; मात्र किलोमागे १0 रुपयांची वाढ झाली असून, किरकोळ बाजारात ५० रुपये किलो आहे.

‘ड्रायगन’, ‘किव्ही’ची मागणी वाढलीजिल्ह्यात महापुरानंतर पावसाने एकदम उघडीप दिल्याने साथीच्या आजारांचा फैलाव झाला आहे. रक्तातील प्लेटलेटची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असून, त्यासाठी ‘ड्रायगन’, ‘किव्ही’ फळांची मागणी वाढली आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर