शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आंबा सामान्यांच्या आवाक्यात, भाजीपाल्याचे दर भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 12:31 IST

वाढत्या उन्हामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने आठवडी बाजारात किलोमागे भाजीचे दर १० ते ३० रुपयांनी वाढले आहेत; त्यामुळे गृहिणींची चिंता वाढली असून, उन्हामुळे महागाईची झळ सोसावी लागत आहे. मात्र आंब्याची आवक वाढल्याने तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.

ठळक मुद्देआंबा सामान्यांच्या आवाक्यातभाजीपाल्याचे दर भडकले : वाढत्या उन्हाचा फटका

कोल्हापूर : वाढत्या उन्हामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने आठवडी बाजारात किलोमागे भाजीचे दर १० ते ३० रुपयांनी वाढले आहेत; त्यामुळे गृहिणींची चिंता वाढली असून, उन्हामुळे महागाईची झळ सोसावी लागत आहे. मात्र आंब्याची आवक वाढल्याने तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.पाऊस सुरू झाल्याशिवाय ही स्थिती बदलणार नसल्याने, आणखी काही दिवस तरी महागडी भाजीच खावी लागणार आहे. तापमानवाढीसोबतच महागाईच्या झळांमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांची पावसाच्या सरींमुळेच यातून सुटका होणार आहे. काही मोजक्या भाज्यांचे दर स्थिर असले तरी नेहमीच्या वापरातील भाज्यांचे दर कडाडले आहेत.गेल्या आठवड्यात ४० रुपये किलो असणारा टोमॅटोचा दर या आठवड्यात ६० रुपये किलोवर गेला. त्यात १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. अन्य फळभाज्या या ६० रुपये किलो झाल्या आहेत. मेथीचा दर २० रुपये पेंढी झाला, तर १५ रुपये किलोने मिळणारी वांगी आज ६० रुपये प्रतिकिलो झाली आहेत.

दरांत मोठी वाढगेल्या आठवड्यात असलेल्या ४० रुपयांच्या भाज्या व फळभाज्यांत या आठवड्यात २० रुपयांची दरवाढ झाली आहे. यामध्ये टोमॅटो, वांगी, गवार, कारले, हिरवा वाटाणा, हिरव्या मिरचीचा दर प्रतिकिलो ६० रुपये झाला आहे.

किलोचा दर कोबी (१५), फ्लॉवर (२०), काकडी (३०), गाजर (४०), पोकळा (१० रुपये पेंढी), दुधी भोपळा (१०), काटेभेंडी (५०), आले (६० ते ८०), करडई (१० रुपये पेंढी), तोंदली (४०), मुळा (१० रुपये पेंढी), भोपळा (४०), दोडका (५०), ढबू मिरची / सिमला मिरची (४०), कोबी (१० रुपये गड्डा), फ्लॉवर (१० रुपये गड्डा), बीट (१० रुपये नग), शेपू (१० रुपये नग).आंब्याची आवक वाढलीगेल्या महिन्यात आंबा पेटीचा दर एक ते दीड हजार रुपयांच्या घरात होता. या आठवड्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. रत्नागिरी हापूस, देवगड, कर्नाटक हापूस स्वस्त झाला आहे.

आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने आंब्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे बाजारपेठांसह उपनगरांतही टेम्पोतून आंबापेट्यांची विक्री होत आहे. सध्या बाजारपेठेत कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ व गुजरातमधील आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यांचे दर १०० ते ४०० रुपये प्रतिडझनपर्यंत आहेत.

 

टॅग्स :MangoआंबाMarketबाजारkolhapurकोल्हापूर