शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

वीरशैव बँकेला २१ कोटींचा नफा : अनिल सोलापुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वीरशैव को-ऑप. बँकेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात तरतूदपूर्व २१ कोटींचा नफा झाल्याची माहिती बँकेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वीरशैव को-ऑप. बँकेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात तरतूदपूर्व २१ कोटींचा नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे यांनी पत्रकातून दिली. गुंतवणुकीसह एकत्रित व्यवसाय दोन हजार कोटींचा झाला असून निव्वळ एनपीए शून्य टक्के झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या काळातही बँकेने चांगली भरारी घेतली असून, पहिल्या सहामाहीत १२०० कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. मात्र, त्यानंतर संचालक, कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून उद्दिष्ट गाठले. बँकेच्या मार्च २०२१ अखेर ९६४ कोटी ठेवी, ६३२ कोटी कर्जे व ४१४ कोटींची गुंतवणूक आहे. बँकेच्या तीस शाखांपैकी लक्ष्मीपुरी, गडहिंग्लज, मंडई, गांधीनगर व बेळगाव या पाच शाखांचा ढोबळ एनपीएन शून्य टक्के आहे. अहवाल सालात कोरोनामुळे बँक आर्थिक अडचणीत येऊ नये म्हणून सेवकांनी स्वेच्छेने पगारवाढ, महागाई भत्ता घेतला नव्हता, हेही कौतुकास्पद असल्याचे अध्यक्ष सोलापुरे यांच्यासह उपाध्यक्ष रंजना तिवटे, ज्येष्ठ संचालक नानासाहेब नष्टे, बाबासाहेब देसाई, राजेश पाटील-चंदूरकर, गणपतराव पाटील, सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, शकुंतला बनछोडे, चंद्रकांत स्वामी, डॉ. दिलीप चाैगुले, महादेव साखरे, राजेंद्र शेटे, राजेंद्र लकडे, अनिल स्वामी, सदानंद हत्तरकी, चंद्रकांत सांगावकर, सतीश घाळी, वैभव सावर्डेकर, राजेंद्र माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मांगलेकर, सरव्यवस्थापक अविनाश खोत यांनी पत्रकात म्हटले आहे.