शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वळिवडेकरांची एक साथ; महापुरावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:18 IST

कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठाशेजारील आणि गांधीनगरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या बाजारपेठेलगत असणाऱ्या ‘वळिवडे’ (ता. करवीर) या गावालाही पुराचा प्रचंड मोठा ...

कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठाशेजारील आणि गांधीनगरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या बाजारपेठेलगत असणाऱ्या ‘वळिवडे’ (ता. करवीर) या गावालाही पुराचा प्रचंड मोठा फटका बसला. ऊस शेती आणि धनधान्यांनी भरलेली घरे पाण्यात गेली. संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. गावकऱ्यांपुढे ‘त्या’ आठ दिवसांत जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. पूर ओसरल्यानंतर गावात परतलेल्या गावकºयांनी डोळ्यांतील आसवांना थांबविले. लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून ग्रामस्थांनी गेल्या चार दिवसांत गावगाडा पुन्हा सुरळीत आणला.पंचगंगाकाठी १३ हजार लोकसंखा असलेल्या या गावाला १९८९ व २००५ या दोन वेळेला पुराचा तडाखा बसला होता. त्यानंतर या गावात महापूर काय असतो, याची अनुभूती २०१९ साली आली. ग्रामपंचायतीसह बहुतांश गावांत १० ते १२ फूट पाणी होते. वेगाने वाढणाºया पाण्यामुळे १५०० कुटुंबांना फटका बसला. त्यातील निम्म्याहून अधिक गावकºयांना संजय चव्हाण यांच्या अपार्टमेंटमध्ये, तर काहीजणांना जवळील शाळांचा आधार घ्यावा लागला. याशिवाय काही नागरिकांची सिंधी समाजाने निरंकारी मंडळ, प्रेम प्रकाश मंदिर, आदी ठिकाणी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती. पुरामुळे कुमार विद्यामंदिर व कन्या विद्यामंदिर या शाळाही पाण्यात राहिल्या. एवढे सगळे होऊनदेखील गावकºयांनी काही हार मानली नाही.घरे पडली : पिके कुजलीवळिवडेतील ५७१ हेक्टर जमीन शेतीखाली आहे. मुख्य पीक ऊसच आहे. शेतीबरोबर पशुपालन हा व्यवसाय आहे. दूध व गांधीनगरच्या व्यापारपेठेमुळे या गावाला काही प्रमाणात सुबत्ता आली आहे. गावातील बहुतांश युवक शेतीबरोबर गांधीनगर येथील दुकानांमध्ये कामगार म्हणून कार्यरत आहेत. गावची लोकसंख्या १३००० इतकी आहे; तर जनावरे ६००हून अधिक आहेत. ५७१ पैकी ४०० हून हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने उसासह सोयाबीन कुजले आहे. त्यामुळे यंदा आर्थिक फटका मोठा बसणार हे गृहीत धरून येथील अनेक कुटुंबे कामाला लागली आहेत. गावातील १५० वर्षांपूर्वीच्या राम मंदिरातही प्रथमच पाणी भरले होते. शेजारीच राहणाºया पिंटू गुरव, बबन गुरव, बापूसो गुरव यांचे तर संपूर्ण घर अतिवृष्टीत पडले आहे. त्यामुळे पुन्हा उभारणी करण्यासाठी या गुरव कुटुंबातील सर्वच उरलेसुरले साहित्य बाहेर काढण्यात दिवसभर मग्न झाल्याचे दृष्टीस पडले.अंदाज चुकलायापूर्वी आलेल्या पुरात केवळ दोन ते चार फुटांपर्यंत पाणी आले होते. यावेळी मात्र, दहा ते बारा फूट पाणी गेल्याने अनेक ज्येष्ठांचा अंदाज चुकला. परिणामी उंचावर असलेले साहित्य, धान्य भिजून गेले. यात तांदूळ, गहू, मका, आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.अनेकजण मंदिराच्या आश्रयालावळिवडे गावातील दिगंबर जैन मंदिरात अद्यापही चार कुटुंब आश्रयाला आहेत. त्यांना आमदार अमल महाडिक, ग्रामपंचायतीतर्फे जेवणाची व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय अनेकजण शहरातील पाहुण्यांकडे राहण्यास गेले आहेत.गांधीनगरचाकाही भाग बाधितगांधीनगर सिंधी सेंट्रल पंचायतीमधील कोयना कॉलनी, माळवाडी परिसरातील काही घरे पूरबाधित झाली होती. यात ६० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. किमान १२५ कुटुंबे बाधित, तर ६०० लोकांना स्थलांतरित म्हणून हेमू कलाणी प्रायमरी स्कूल, निरंकारी मंडळ, प्रेम प्रकाश मंदिर, साईबाबा मंदिर, सिंधी बांधवांच्या मदतीने आसरा घ्यावा लागला. बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले. पंचनाम्याचे काम सुरू आहे.