शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

वळिवडेकरांची एक साथ; महापुरावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:18 IST

कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठाशेजारील आणि गांधीनगरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या बाजारपेठेलगत असणाऱ्या ‘वळिवडे’ (ता. करवीर) या गावालाही पुराचा प्रचंड मोठा ...

कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठाशेजारील आणि गांधीनगरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या बाजारपेठेलगत असणाऱ्या ‘वळिवडे’ (ता. करवीर) या गावालाही पुराचा प्रचंड मोठा फटका बसला. ऊस शेती आणि धनधान्यांनी भरलेली घरे पाण्यात गेली. संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. गावकऱ्यांपुढे ‘त्या’ आठ दिवसांत जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. पूर ओसरल्यानंतर गावात परतलेल्या गावकºयांनी डोळ्यांतील आसवांना थांबविले. लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून ग्रामस्थांनी गेल्या चार दिवसांत गावगाडा पुन्हा सुरळीत आणला.पंचगंगाकाठी १३ हजार लोकसंखा असलेल्या या गावाला १९८९ व २००५ या दोन वेळेला पुराचा तडाखा बसला होता. त्यानंतर या गावात महापूर काय असतो, याची अनुभूती २०१९ साली आली. ग्रामपंचायतीसह बहुतांश गावांत १० ते १२ फूट पाणी होते. वेगाने वाढणाºया पाण्यामुळे १५०० कुटुंबांना फटका बसला. त्यातील निम्म्याहून अधिक गावकºयांना संजय चव्हाण यांच्या अपार्टमेंटमध्ये, तर काहीजणांना जवळील शाळांचा आधार घ्यावा लागला. याशिवाय काही नागरिकांची सिंधी समाजाने निरंकारी मंडळ, प्रेम प्रकाश मंदिर, आदी ठिकाणी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती. पुरामुळे कुमार विद्यामंदिर व कन्या विद्यामंदिर या शाळाही पाण्यात राहिल्या. एवढे सगळे होऊनदेखील गावकºयांनी काही हार मानली नाही.घरे पडली : पिके कुजलीवळिवडेतील ५७१ हेक्टर जमीन शेतीखाली आहे. मुख्य पीक ऊसच आहे. शेतीबरोबर पशुपालन हा व्यवसाय आहे. दूध व गांधीनगरच्या व्यापारपेठेमुळे या गावाला काही प्रमाणात सुबत्ता आली आहे. गावातील बहुतांश युवक शेतीबरोबर गांधीनगर येथील दुकानांमध्ये कामगार म्हणून कार्यरत आहेत. गावची लोकसंख्या १३००० इतकी आहे; तर जनावरे ६००हून अधिक आहेत. ५७१ पैकी ४०० हून हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने उसासह सोयाबीन कुजले आहे. त्यामुळे यंदा आर्थिक फटका मोठा बसणार हे गृहीत धरून येथील अनेक कुटुंबे कामाला लागली आहेत. गावातील १५० वर्षांपूर्वीच्या राम मंदिरातही प्रथमच पाणी भरले होते. शेजारीच राहणाºया पिंटू गुरव, बबन गुरव, बापूसो गुरव यांचे तर संपूर्ण घर अतिवृष्टीत पडले आहे. त्यामुळे पुन्हा उभारणी करण्यासाठी या गुरव कुटुंबातील सर्वच उरलेसुरले साहित्य बाहेर काढण्यात दिवसभर मग्न झाल्याचे दृष्टीस पडले.अंदाज चुकलायापूर्वी आलेल्या पुरात केवळ दोन ते चार फुटांपर्यंत पाणी आले होते. यावेळी मात्र, दहा ते बारा फूट पाणी गेल्याने अनेक ज्येष्ठांचा अंदाज चुकला. परिणामी उंचावर असलेले साहित्य, धान्य भिजून गेले. यात तांदूळ, गहू, मका, आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.अनेकजण मंदिराच्या आश्रयालावळिवडे गावातील दिगंबर जैन मंदिरात अद्यापही चार कुटुंब आश्रयाला आहेत. त्यांना आमदार अमल महाडिक, ग्रामपंचायतीतर्फे जेवणाची व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय अनेकजण शहरातील पाहुण्यांकडे राहण्यास गेले आहेत.गांधीनगरचाकाही भाग बाधितगांधीनगर सिंधी सेंट्रल पंचायतीमधील कोयना कॉलनी, माळवाडी परिसरातील काही घरे पूरबाधित झाली होती. यात ६० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. किमान १२५ कुटुंबे बाधित, तर ६०० लोकांना स्थलांतरित म्हणून हेमू कलाणी प्रायमरी स्कूल, निरंकारी मंडळ, प्रेम प्रकाश मंदिर, साईबाबा मंदिर, सिंधी बांधवांच्या मदतीने आसरा घ्यावा लागला. बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले. पंचनाम्याचे काम सुरू आहे.