शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

corona virus-विद्यार्थ्यांना सुट्टी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 15:46 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याअंतर्गत उपाययोजना म्हणून शासनाच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयांतील वर्ग दि. ३१ मार्चपर्यंत भरणार नाहीत. मात्र, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना सुट्टी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना ड्युटीपालकांना कोरोनाची धास्ती; शाळा, महाविद्यालय परिसरात शांतता

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याअंतर्गत उपाययोजना म्हणून शासनाच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयांतील वर्ग दि. ३१ मार्चपर्यंत भरणार नाहीत. मात्र, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली.दोन दिवसांपूर्वीच याबाबतची सूचना विद्यार्थी, पालकांना शाळा, महाविद्यालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली होती. वर्ग भरले नसल्याने नेहमी गजबजलेल्या शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात सोमवारी शुकशुकाट पसरला होता.

दहावी आणि बारावीचे पेपर असणाऱ्या परीक्षा केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांत परीक्षार्थी दिसून आले. वार्षिक नोंदी करणे, चाचणी परीक्षा आणि दहावी, बारावीच्या झालेल्या पेपरची तपासणी, हजेरीपत्रक पूर्ण करणे, आदी स्वरूपातील कामे शिक्षकांकडून सुरू होती. स्वच्छतेसह अन्य स्वरूपातील कामे शिक्षकेतर कर्मचारी करत होते.

दि. २७ मार्चपासून विद्यापीठाच्यावतीने परीक्षा होणार आहेत. त्याच्यासाठी ग्रंथालय, अभ्यासिकांमध्ये काही विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. खासगी क्लासेसदेखील भरले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णत: सुट्टी मिळाली.गल्लींमध्ये क्रिकेट, फुटबॉल रंगलासुट्टी असल्याने गल्ली, कॉलनीतील रस्त्यांवर विद्यार्थ्यांचे क्रिकेट, फुटबॉल, आदी खेळ रंगले. मात्र, पालकांमध्ये कोरोनाबाबतची धास्ती आहे. त्यामुळे ते आपल्या पाल्यांना खेळण्यासाठी जाताना मास्क वापरण्याचे बंधनकारक करीत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मुले, मुली या मास्क घालून वावरत असल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्गांना सुट्टी देण्याचा चांगला निर्णय शासनाने घेतला आहे. कर्नाटक सरकारने वार्षिक परीक्षा घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसा विचार आपल्या शासनाने करावा. त्यासाठी सहामाही परीक्षा, अन्य चाचणींच्या आधारावर वार्षिक गुणदान करण्याचा विचार करावा.- संतोष आयरे, प्राथमिक शिक्षक

कोरोनाबाबतची सध्याची स्थिती लक्षात घेता वर्ग भरत नाहीत हे योग्य आहे. परीक्षा तोंडावर आल्या आहेत. ते लक्षात घेता विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये काही अडचण आल्यास शिक्षकांनी मोबाईलच्या माध्यमातून त्याचे निराकरण करावे.- अमृत खुपेरकर, महाविद्यालयीन विद्यार्थी 

निवासी शाळा सुरूचजिल्ह्यातील प्राथमिक शाळा ते महाविद्यालयांतील वर्ग दि. ३१ मार्चंपर्यंत भरणार नाहीत. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली. मात्र, जिल्ह्यातील काही निवासी शाळा अद्याप सुरूच आहेत. त्याबाबत असा निर्णय होणे आवश्यक आहे.आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • प्राथमिक शाळा : ३७०४ (विद्यार्थी : ६,९४,७१२)
  • माध्यमिक शाळा : ८६८ (विद्यार्थी : ४,०८,९७१)
  • उच्च माध्यमिक शाळा : २६२
  • इंग्रजी माध्यमाच्या शाळा : सुमारे ५००
  • कोल्हापूर महानगरपालिका शाळा : ५९
  • खासगी क्लासेस : सुमारे ५०० (विद्यार्थी : १० हजार)

 

 

 

टॅग्स :corona virusकोरोनाkolhapurकोल्हापूरSchoolशाळा