शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

अशांतता हेच आजच्या अंधारयुगाचे लक्षण : अतुल पेठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 1:02 AM

समाजाला आज वैचारिक आंधळेपणा आणि बहिरेपणा आला आहे. धर्म, जात, देशाच्या नावाने नव्या पिढीला हिप्नोटाईज केले जात आहे. हिंसेची चटक लागल्यासारखा समाज बेभान झाला

ठळक मुद्देगोविंद पानसरे स्मृतिदिनी ‘२१ वे शतक; एक अंधारयुग’ या विषयावर व्याख्यान

कोल्हापूर : समाजाला आज वैचारिक आंधळेपणा आणि बहिरेपणा आला आहे. धर्म, जात, देशाच्या नावाने नव्या पिढीला हिप्नोटाईज केले जात आहे. हिंसेची चटक लागल्यासारखा समाज बेभान झाला असून ही सामाजिक अशांतताच आजच्या अंधारयुगाचे लक्षण आहे; पण देशाच्या पुरोगामी इतिहासाने अशी अनेक अंधारयुगे बदलली आहेत. म्हणून आपण गोविंद पानसरे यांच्या वैचारिक प्रवाहासोबत जगूया, हे युगही सरेल, असा आशावाद प्रसिद्ध नाटककार अतुल पेठे यांनी बुधवारी व्यक्त केला.

शाहू स्मारक भवनात कॉम्रेड गोविंद पानसरे संघर्ष समिती,श्रमिक प्रतिष्ठान व पुरोगामी संघटनांच्या वतीने गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते ‘२१ वे शतक : एक अंधारयुग’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे होते. व्यासपीठावर मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे, उमेश सूर्यवंशी, दिलीप पोवार, बाबूराव कदम, एस. बी. पाटील उपस्थित होते.पेठे म्हणाले, युती म्हणजे एकमेकांच्या हातात हात घालून केलेली मांडवली. अनिर्बंध सत्तेच्या लालसेपोटी ठेचा, घुसा, उडवा आणि नामशेष करण्याचे राजकारण सुरू आहे.

बहिरेपणा आला की बधिरता, एकटेपणा, निराशा, अविचार, अविवेक आणि शेवटी अतिरेक होतो. सेल्फी, लाईक, डिस्लाईक या पलीकडे जाऊन मानसिक, वैचारिक, बौद्धिक उन्नती कुणाला नको आहे. विचार, संवाद आणि दृष्टिकोनाला लागलेल्या या ओहोटीच्या युगात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा विचारवंतांचे खून पाडले जात आहेत; पण त्यांच्या विचारांच्या प्रवाहाचा स्पर्श झालेला प्रत्येकजण वैभवशाली इतिहास खांद्यावर घेऊन मिरवत आहे.

आ. ह. साळुंखे म्हणाले, पुलवामा घटनेनंतर आपण काश्मीर म्हणजे भारत आहे की पाकिस्तान याचं भान विसरतोय. काश्मीरशी व्यवहार तोडण्यापासून ते शिक्षणासाठी विखुरलेल्या विद्यार्थ्यांना धमकावण्यापर्यंतचे प्रकार होत आहेत. प्रत्येक काश्मिरी माणूस म्हणजे अतिरेकी असा विचार न करता नकार आणि द्वेषाचा अंधार सारण्यासाठी प्रकाशाच्या ज्योती घेऊन अनेक माणसे उभी आहेत. उंबऱ्याबाहेर आलेला अंधार घरात येणार नाही, यासाठी आपण निर्धाराने लढू या. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुक्ता दाभोलकर, दिलीप पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. उमेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.सांस्कृतिक कार्यक्रमात आदित्य खेबुडकर, रसिया पडळकर, समीर पंडितराव, रोहित पोतनीस, अक्षय पोकळे, कृष्णा भूतकर, रणजित कांबळे, सुहास लकडे, मल्हार महेकर यांनी नाटकाद्वारे स्थितीवर भाष्यकेले.विचारधारा संपणार नाहीकाही कारणांमुळे गीतकार जावेद अख्तर या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे ‘गोविंद पानसरे हे केवळ शरीर नव्हते; तर ते एक विचारधारा होते. त्यांना गोळी घालून ही विचारधारा संपणार नाही,’ असे विचार मांडले. 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर