शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

अशांतता हेच आजच्या अंधारयुगाचे लक्षण : अतुल पेठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:03 IST

समाजाला आज वैचारिक आंधळेपणा आणि बहिरेपणा आला आहे. धर्म, जात, देशाच्या नावाने नव्या पिढीला हिप्नोटाईज केले जात आहे. हिंसेची चटक लागल्यासारखा समाज बेभान झाला

ठळक मुद्देगोविंद पानसरे स्मृतिदिनी ‘२१ वे शतक; एक अंधारयुग’ या विषयावर व्याख्यान

कोल्हापूर : समाजाला आज वैचारिक आंधळेपणा आणि बहिरेपणा आला आहे. धर्म, जात, देशाच्या नावाने नव्या पिढीला हिप्नोटाईज केले जात आहे. हिंसेची चटक लागल्यासारखा समाज बेभान झाला असून ही सामाजिक अशांतताच आजच्या अंधारयुगाचे लक्षण आहे; पण देशाच्या पुरोगामी इतिहासाने अशी अनेक अंधारयुगे बदलली आहेत. म्हणून आपण गोविंद पानसरे यांच्या वैचारिक प्रवाहासोबत जगूया, हे युगही सरेल, असा आशावाद प्रसिद्ध नाटककार अतुल पेठे यांनी बुधवारी व्यक्त केला.

शाहू स्मारक भवनात कॉम्रेड गोविंद पानसरे संघर्ष समिती,श्रमिक प्रतिष्ठान व पुरोगामी संघटनांच्या वतीने गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते ‘२१ वे शतक : एक अंधारयुग’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे होते. व्यासपीठावर मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे, उमेश सूर्यवंशी, दिलीप पोवार, बाबूराव कदम, एस. बी. पाटील उपस्थित होते.पेठे म्हणाले, युती म्हणजे एकमेकांच्या हातात हात घालून केलेली मांडवली. अनिर्बंध सत्तेच्या लालसेपोटी ठेचा, घुसा, उडवा आणि नामशेष करण्याचे राजकारण सुरू आहे.

बहिरेपणा आला की बधिरता, एकटेपणा, निराशा, अविचार, अविवेक आणि शेवटी अतिरेक होतो. सेल्फी, लाईक, डिस्लाईक या पलीकडे जाऊन मानसिक, वैचारिक, बौद्धिक उन्नती कुणाला नको आहे. विचार, संवाद आणि दृष्टिकोनाला लागलेल्या या ओहोटीच्या युगात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा विचारवंतांचे खून पाडले जात आहेत; पण त्यांच्या विचारांच्या प्रवाहाचा स्पर्श झालेला प्रत्येकजण वैभवशाली इतिहास खांद्यावर घेऊन मिरवत आहे.

आ. ह. साळुंखे म्हणाले, पुलवामा घटनेनंतर आपण काश्मीर म्हणजे भारत आहे की पाकिस्तान याचं भान विसरतोय. काश्मीरशी व्यवहार तोडण्यापासून ते शिक्षणासाठी विखुरलेल्या विद्यार्थ्यांना धमकावण्यापर्यंतचे प्रकार होत आहेत. प्रत्येक काश्मिरी माणूस म्हणजे अतिरेकी असा विचार न करता नकार आणि द्वेषाचा अंधार सारण्यासाठी प्रकाशाच्या ज्योती घेऊन अनेक माणसे उभी आहेत. उंबऱ्याबाहेर आलेला अंधार घरात येणार नाही, यासाठी आपण निर्धाराने लढू या. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुक्ता दाभोलकर, दिलीप पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. उमेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.सांस्कृतिक कार्यक्रमात आदित्य खेबुडकर, रसिया पडळकर, समीर पंडितराव, रोहित पोतनीस, अक्षय पोकळे, कृष्णा भूतकर, रणजित कांबळे, सुहास लकडे, मल्हार महेकर यांनी नाटकाद्वारे स्थितीवर भाष्यकेले.विचारधारा संपणार नाहीकाही कारणांमुळे गीतकार जावेद अख्तर या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे ‘गोविंद पानसरे हे केवळ शरीर नव्हते; तर ते एक विचारधारा होते. त्यांना गोळी घालून ही विचारधारा संपणार नाही,’ असे विचार मांडले. 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर