शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

अशांतता हेच आजच्या अंधारयुगाचे लक्षण : अतुल पेठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:03 IST

समाजाला आज वैचारिक आंधळेपणा आणि बहिरेपणा आला आहे. धर्म, जात, देशाच्या नावाने नव्या पिढीला हिप्नोटाईज केले जात आहे. हिंसेची चटक लागल्यासारखा समाज बेभान झाला

ठळक मुद्देगोविंद पानसरे स्मृतिदिनी ‘२१ वे शतक; एक अंधारयुग’ या विषयावर व्याख्यान

कोल्हापूर : समाजाला आज वैचारिक आंधळेपणा आणि बहिरेपणा आला आहे. धर्म, जात, देशाच्या नावाने नव्या पिढीला हिप्नोटाईज केले जात आहे. हिंसेची चटक लागल्यासारखा समाज बेभान झाला असून ही सामाजिक अशांतताच आजच्या अंधारयुगाचे लक्षण आहे; पण देशाच्या पुरोगामी इतिहासाने अशी अनेक अंधारयुगे बदलली आहेत. म्हणून आपण गोविंद पानसरे यांच्या वैचारिक प्रवाहासोबत जगूया, हे युगही सरेल, असा आशावाद प्रसिद्ध नाटककार अतुल पेठे यांनी बुधवारी व्यक्त केला.

शाहू स्मारक भवनात कॉम्रेड गोविंद पानसरे संघर्ष समिती,श्रमिक प्रतिष्ठान व पुरोगामी संघटनांच्या वतीने गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते ‘२१ वे शतक : एक अंधारयुग’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे होते. व्यासपीठावर मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे, उमेश सूर्यवंशी, दिलीप पोवार, बाबूराव कदम, एस. बी. पाटील उपस्थित होते.पेठे म्हणाले, युती म्हणजे एकमेकांच्या हातात हात घालून केलेली मांडवली. अनिर्बंध सत्तेच्या लालसेपोटी ठेचा, घुसा, उडवा आणि नामशेष करण्याचे राजकारण सुरू आहे.

बहिरेपणा आला की बधिरता, एकटेपणा, निराशा, अविचार, अविवेक आणि शेवटी अतिरेक होतो. सेल्फी, लाईक, डिस्लाईक या पलीकडे जाऊन मानसिक, वैचारिक, बौद्धिक उन्नती कुणाला नको आहे. विचार, संवाद आणि दृष्टिकोनाला लागलेल्या या ओहोटीच्या युगात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा विचारवंतांचे खून पाडले जात आहेत; पण त्यांच्या विचारांच्या प्रवाहाचा स्पर्श झालेला प्रत्येकजण वैभवशाली इतिहास खांद्यावर घेऊन मिरवत आहे.

आ. ह. साळुंखे म्हणाले, पुलवामा घटनेनंतर आपण काश्मीर म्हणजे भारत आहे की पाकिस्तान याचं भान विसरतोय. काश्मीरशी व्यवहार तोडण्यापासून ते शिक्षणासाठी विखुरलेल्या विद्यार्थ्यांना धमकावण्यापर्यंतचे प्रकार होत आहेत. प्रत्येक काश्मिरी माणूस म्हणजे अतिरेकी असा विचार न करता नकार आणि द्वेषाचा अंधार सारण्यासाठी प्रकाशाच्या ज्योती घेऊन अनेक माणसे उभी आहेत. उंबऱ्याबाहेर आलेला अंधार घरात येणार नाही, यासाठी आपण निर्धाराने लढू या. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुक्ता दाभोलकर, दिलीप पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. उमेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.सांस्कृतिक कार्यक्रमात आदित्य खेबुडकर, रसिया पडळकर, समीर पंडितराव, रोहित पोतनीस, अक्षय पोकळे, कृष्णा भूतकर, रणजित कांबळे, सुहास लकडे, मल्हार महेकर यांनी नाटकाद्वारे स्थितीवर भाष्यकेले.विचारधारा संपणार नाहीकाही कारणांमुळे गीतकार जावेद अख्तर या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे ‘गोविंद पानसरे हे केवळ शरीर नव्हते; तर ते एक विचारधारा होते. त्यांना गोळी घालून ही विचारधारा संपणार नाही,’ असे विचार मांडले. 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर