शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

ऊसदराची कोंडी कायम, बैठक फिस्कटली : सदाभाऊंचा आग्रह नडला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:41 IST

मुंबई / कोल्हापूर : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अट्टहासापोटी ऊसदर ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली.

ठळक मुद्देसरकार ‘एफआरपी’वर, संघटना जादा उचलीवर ठामशेतकºयांच्या प्रश्नावर आपणच तोडगा काढू शकतो, असे खोत यांना खा. राजू शेट्टी यांच्यासह त्यांच्या विरोधकांना दाखवून द्यायचे होते. महाराष्ट्रात तो कमी सांगितला जातो. आम्ही हक्काचे पैसे मागत आहोत. ऊस शेतकºयांना आत्महत्या करायला लावू नका, असे रघुनाथ पाटील

अतुल कुलकर्णी/ विश्वास पाटील।मुंबई / कोल्हापूर : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अट्टहासापोटी ऊसदर ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली. ऊसदरासंबंधी मुख्य सचिवांची बैठक होण्याआधीच ही बैठक का घेतली, अशी विचारणा मुख्यमंत्री कार्यालयाने केल्याचे समजते.

‘एफआरपी’ हीच पहिली उचल, अशी राज्य सरकारची ठाम भूमिका आहे. त्यामुळे वाढीव उचल देता येणार नसल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत स्पष्ट केले, तर वाढीव उचल दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला. त्यामुळे राज्यातील ऊसदर आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.या बैठकीस साखर संघाचे प्रतिनिधी जयप्रकाश दांडेगावकर, संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ, साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील, वजन-काटे विभागाचे महासंचालक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, सकल ऊस परिषदेचे दादा काळे, अनिल घनवट, आदी उपस्थित होते.

मागच्या हंगामातील ऊसदराचाअंतिम बिलाचा निर्णय घेण्यासाठीऊसदर नियंत्रण समितीची बैठक  येत्या बुधवारी (दि. ८) मुंबईत होत आहे. मात्र तत्पूर्वीच बैठक घेण्याच्या राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या आग्रहामुळे सरकार पुन्हा तोंडघशी पडले. शेतकरी संपातही खोत यांनी केलेली हातघाई सरकारच्या अंगलट आली होती. शेतकºयांच्या प्रश्नावर आपणच तोडगा काढू शकतो, असे खोत यांना खा. राजू शेट्टी यांच्यासह त्यांच्या विरोधकांना दाखवून द्यायचे होते. आज झालेल्या बैठकीत खा. शेट्टी यांनी उसउत्पादक शेतकºयांना ३४०० रुपयांची पहिली उचल दिलीच पाहिजे, असा आग्रह कायम ठेवला. तर राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी बँका जर शेतकºयांना २९०० ते ३००० ची उचल देत असतील तर शेतकºयांना ३५०० रुपये कसे देणार? असा सवाल उपस्थित केला.गुजरात आणि इतर राज्यात तुमच्या पक्षाचे सरकार असताना एफआरपीला चांगला भाव मिळतो. महाराष्ट्रात तो कमी सांगितला जातो. आम्ही हक्काचे पैसे मागत आहोत. ऊस शेतकºयांना आत्महत्या करायला लावू नका, असे रघुनाथ पाटीलप्राप्तीकरवाल्यांना आवरा!जे साखर कारखाने एफआरपीपेक्षा जास्त भाव देतात, त्या जास्तीच्या रकमेला नफा समजून प्राप्तीकरवाले नोटीसा पाठवतात. गेल्यावर्षी राज्यातील कारखान्यांना ५ हजार कोटींचा टॅक्स भरण्याच्या नोटीसा दिल्या गेल्या. त्यापोटी ‘अंडरप्रोटेस्ट’ १ हजार कोटी रुपये कारखान्यांनी भरले. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे ,अशी मागणी दांडेगावकर यांनी केली.एफआरपी नुसार दर दिला पाहिजे हे कायद्याचे बंधन आहे. यावर्षी ९.५ टक्के उतारा असणाºयांना २५५० व नंतरच्या प्रत्येकी १ टक्क्याला २६८ रुपये भाव आहे. ज्या ठिकाणी जसा उतारा तशी एफआरपी होईल. गेल्यावर्षी हाच दर ९.५ टक्क्याला २३०० रुपये व नंतरच्या प्रत्येकी १ टक्क्याला २४२ रुपये होता.

तो निर्णय मुख्यमंत्री घेतील!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत आपल्या राज्यातील ऊस परराज्यात पाठविण्यावर बंदी घातली आहे. जर अन्य राज्यात आम्हाला चांगला भाव मिळत असेल तर त्यासाठी राज्यबंदी घालून अडवणूक का करता? असा सवाल खा. राजू शेट्टी यांनी केला. त्यावर ही मागणी मुख्यमंत्र्यांशी बोलून सोडवू, असे आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिले. 

यंदाच्या गळीत हंगामात उसाची पहिली उचल शासनाच्या हमीभावानुसार दिली जाईल. शेतकरी व साखर कारखानदार यांच्यामध्ये समन्वय ठेवून हिताचे निर्णय घेण्यात येतील. दुसºया उचलपासून परिस्थिती पाहून कारखानदारांकडून भाव दिला जाईल. कारखान्यांच्या वजनकाटे तपासणीसाठी जिल्हास्तरावर नेमण्यात येत असलेल्या समितीमध्ये शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा सुध्दा समावेश करण्यात येईल.- सुभाष देशमुख, सहकारमंत्री