शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

ऊसदराची कोंडी कायम, बैठक फिस्कटली : सदाभाऊंचा आग्रह नडला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:41 IST

मुंबई / कोल्हापूर : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अट्टहासापोटी ऊसदर ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली.

ठळक मुद्देसरकार ‘एफआरपी’वर, संघटना जादा उचलीवर ठामशेतकºयांच्या प्रश्नावर आपणच तोडगा काढू शकतो, असे खोत यांना खा. राजू शेट्टी यांच्यासह त्यांच्या विरोधकांना दाखवून द्यायचे होते. महाराष्ट्रात तो कमी सांगितला जातो. आम्ही हक्काचे पैसे मागत आहोत. ऊस शेतकºयांना आत्महत्या करायला लावू नका, असे रघुनाथ पाटील

अतुल कुलकर्णी/ विश्वास पाटील।मुंबई / कोल्हापूर : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अट्टहासापोटी ऊसदर ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली. ऊसदरासंबंधी मुख्य सचिवांची बैठक होण्याआधीच ही बैठक का घेतली, अशी विचारणा मुख्यमंत्री कार्यालयाने केल्याचे समजते.

‘एफआरपी’ हीच पहिली उचल, अशी राज्य सरकारची ठाम भूमिका आहे. त्यामुळे वाढीव उचल देता येणार नसल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत स्पष्ट केले, तर वाढीव उचल दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला. त्यामुळे राज्यातील ऊसदर आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.या बैठकीस साखर संघाचे प्रतिनिधी जयप्रकाश दांडेगावकर, संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ, साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील, वजन-काटे विभागाचे महासंचालक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, सकल ऊस परिषदेचे दादा काळे, अनिल घनवट, आदी उपस्थित होते.

मागच्या हंगामातील ऊसदराचाअंतिम बिलाचा निर्णय घेण्यासाठीऊसदर नियंत्रण समितीची बैठक  येत्या बुधवारी (दि. ८) मुंबईत होत आहे. मात्र तत्पूर्वीच बैठक घेण्याच्या राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या आग्रहामुळे सरकार पुन्हा तोंडघशी पडले. शेतकरी संपातही खोत यांनी केलेली हातघाई सरकारच्या अंगलट आली होती. शेतकºयांच्या प्रश्नावर आपणच तोडगा काढू शकतो, असे खोत यांना खा. राजू शेट्टी यांच्यासह त्यांच्या विरोधकांना दाखवून द्यायचे होते. आज झालेल्या बैठकीत खा. शेट्टी यांनी उसउत्पादक शेतकºयांना ३४०० रुपयांची पहिली उचल दिलीच पाहिजे, असा आग्रह कायम ठेवला. तर राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी बँका जर शेतकºयांना २९०० ते ३००० ची उचल देत असतील तर शेतकºयांना ३५०० रुपये कसे देणार? असा सवाल उपस्थित केला.गुजरात आणि इतर राज्यात तुमच्या पक्षाचे सरकार असताना एफआरपीला चांगला भाव मिळतो. महाराष्ट्रात तो कमी सांगितला जातो. आम्ही हक्काचे पैसे मागत आहोत. ऊस शेतकºयांना आत्महत्या करायला लावू नका, असे रघुनाथ पाटीलप्राप्तीकरवाल्यांना आवरा!जे साखर कारखाने एफआरपीपेक्षा जास्त भाव देतात, त्या जास्तीच्या रकमेला नफा समजून प्राप्तीकरवाले नोटीसा पाठवतात. गेल्यावर्षी राज्यातील कारखान्यांना ५ हजार कोटींचा टॅक्स भरण्याच्या नोटीसा दिल्या गेल्या. त्यापोटी ‘अंडरप्रोटेस्ट’ १ हजार कोटी रुपये कारखान्यांनी भरले. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे ,अशी मागणी दांडेगावकर यांनी केली.एफआरपी नुसार दर दिला पाहिजे हे कायद्याचे बंधन आहे. यावर्षी ९.५ टक्के उतारा असणाºयांना २५५० व नंतरच्या प्रत्येकी १ टक्क्याला २६८ रुपये भाव आहे. ज्या ठिकाणी जसा उतारा तशी एफआरपी होईल. गेल्यावर्षी हाच दर ९.५ टक्क्याला २३०० रुपये व नंतरच्या प्रत्येकी १ टक्क्याला २४२ रुपये होता.

तो निर्णय मुख्यमंत्री घेतील!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत आपल्या राज्यातील ऊस परराज्यात पाठविण्यावर बंदी घातली आहे. जर अन्य राज्यात आम्हाला चांगला भाव मिळत असेल तर त्यासाठी राज्यबंदी घालून अडवणूक का करता? असा सवाल खा. राजू शेट्टी यांनी केला. त्यावर ही मागणी मुख्यमंत्र्यांशी बोलून सोडवू, असे आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिले. 

यंदाच्या गळीत हंगामात उसाची पहिली उचल शासनाच्या हमीभावानुसार दिली जाईल. शेतकरी व साखर कारखानदार यांच्यामध्ये समन्वय ठेवून हिताचे निर्णय घेण्यात येतील. दुसºया उचलपासून परिस्थिती पाहून कारखानदारांकडून भाव दिला जाईल. कारखान्यांच्या वजनकाटे तपासणीसाठी जिल्हास्तरावर नेमण्यात येत असलेल्या समितीमध्ये शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा सुध्दा समावेश करण्यात येईल.- सुभाष देशमुख, सहकारमंत्री