शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

असुरक्षित विद्यार्थी वाहतुकीला आता चाप, उच्च न्यायालवाचे कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:55 IST

क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी वाहतूक रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने अशी असुरक्षित वाहतूक रोखण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयास दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शिक्षणाधिकाऱ्यांनाही पत्र दिले आहे. या निर्णयानुसार १६ वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी  दिली.

ठळक मुद्देअसुरक्षित विद्यार्थी वाहतुकीला आता चाप, उच्च न्यायालवाचे कारवाईचे आदेशप्रादेशिक परिवहनकडून शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र; रिक्षातून विद्यार्थी वाहतूक बेकायदेशीर

कोल्हापूर : क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी वाहतूक रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने अशी असुरक्षित वाहतूक रोखण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयास दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शिक्षणाधिकाऱ्यांनाही पत्र दिले आहे. या निर्णयानुसार १६ वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी  दिली.राज्यात सुरू असलेल्या असुरक्षित विद्यार्थी वाहतुकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल आहे. याची सुनावणी काही वर्षांपासून सुरू आहे. याचिकेतील एका निर्णयाची माहिती देताना डॉ. अल्वारिस म्हणाले, केंद्र सरकारने स्कूल बससाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार एका छोट्या मिनी बससाठी १३ विद्यार्थीक्षमता आहे. बसचे आवरण टणक असावे, विद्यार्थ्यांना घरापासून बसमध्ये घ्यावे, त्यांना शाळेच्या आवारात सोडावे, बसमध्ये शाळेचा कर्मचारी असावा, अशा अटी व शर्ती लागू केल्या आहेत.केंद्र सरकारने रिक्षांसाठी विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे २०१७ पासून राज्यात आरटीओ विभागाने एकाही रिक्षाला विद्यार्थी वाहतुकीचा परवाना दिलेला नाही. मात्र, राज्यात सर्वत्र रिक्षांमधून असुरक्षित विद्यार्थी वाहतूक सुरू असल्याने न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, गेल्या चार दिवसांत १६ असुरक्षित वाहनांवर कारवाई दंडात्मक केली. ती यापुढेही सुरू राहणार आहे. यापुढील सुनावणी १७ डिसेंबरला होणार आहे. त्यात काय कारवाई केली याचा अहवाल देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.प्रादेशिक परिवहन कार्यालयाने यासंबंधी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करू देऊ नये. शाळांनी स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींची मदत घेऊन सुरक्षित स्कूल बसची व्यवस्था करावी, अशा सूचना पत्राद्वारे दिल्या आहेत.

याची अंमलबजावणी न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने इशारा दिला आहे. त्यामुळे रिक्षासह अन्य असुरक्षित वाहनांमधून विद्यार्थी वाहतूक करण्याचा विषय शाळा व्यवस्थापन, पालक आणि वाहनधारकांसाठी चिंतेचा बनला आहे. यासंबंधी उद्या, शनिवारी जिल्हा रस्ते सुरक्षासंबंधी पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.प्रबोधनाबरोबर कारवाईचा बडगाअशी वाहतूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहनकडून वाहनधारकांचे प्रबोधन केले जात आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत तीनशेहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात १६ वाहने दोषी आढळली. त्यांच्याकडून तीन लाख ३६ हजार दंड वसूल केला, अशी माहितीही डॉ. अल्वारिस यांनी दिली.जिल्ह्यात दोन हजार रिक्षांमधून विद्यार्थ्यांची ने-आणजिल्ह्यात सुमारे १५ हजारांहून अधिक रिक्षांची नोंद आहे. त्यांतील दोन हजार रिक्षांमधून विद्यार्थी वाहतूक केली जात आहे. स्कूल बस पालकांच्या खिशाला परवडत नसल्याने पालक अशा रिक्षांना प्राधान्य देत आहेत. विशेषत: गतीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक केल्याने समतोल साधता येत नाही. ही वाहतूक असुरक्षित असून, कधीही विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकते; म्हणूनच या वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर