शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अनुदानाशिवाय साखर कारखान्यांचा हंगाम अशक्यच : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 15:30 IST

साखरेचा उठाव ठप्प झाल्याने यंदा साखर उद्योग पुरता संकटात सापडला असून आता राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. कारखान्यांना कर्जे नको अनुदान दिल्याशिवाय येणारा हंगाम सुरू होणे अशक्य आहे. ‘जीएसटी’पोटी केंद्र सरकारने घेतलेले पोत्यामागे १५५ रुपये अनुदान म्हणून परत करावेत, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

ठळक मुद्देअनुदानाशिवाय साखर कारखान्यांचा हंगाम अशक्यच : हसन मुश्रीफकमी दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई कराच

कोल्हापूर : साखरेचा उठाव ठप्प झाल्याने यंदा साखर उद्योग पुरता संकटात सापडला असून आता राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. कारखान्यांना कर्जे नको अनुदान दिल्याशिवाय येणारा हंगाम सुरू होणे अशक्य आहे. ‘जीएसटी’पोटी केंद्र सरकारने घेतलेले पोत्यामागे १५५ रुपये अनुदान म्हणून परत करावेत, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बँकेकडील ११ साखर कारखान्यांच्या साखर विक्री आदेशानुसार १२५ ते १५० कोटी रुपये येत होते, पण साखरेला मागणीच नसल्याने त्यातून ५ टक्केही पैसे आलेले नाहीत. याचा फटका केवळ कारखान्यांना नाही, तर बॅँकांनाही बसत आहे. जिल्ह्यातील ८ कारखान्यांनी एक कणही साखरेची विक्री अद्याप केलेली नाही, कसा व्यवसाय करायचा? येणाऱ्या हंगामापर्यंत देशात १८५ लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. नवीन साखर उत्पादन सुरू झाले तर ठेवायचे कोठे? इथेनॉलचा पर्याय चांगला असला तरी त्या मशिनरी उभारण्यासाठी कर्जे कोण देणार? त्यामुळेच सरकारने आता हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे.यापूर्वीच्या तीन हंगामातील कर्जाचे हप्ते द्यायचे आहेत, त्याशिवाय आगामी हंगामाच्या तयारीसाठी कर्जे घ्यावी लागणार आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा कर्जे घेणे शक्य नसून आता अनुदान म्हणूनच पैसे द्यावे.

कमी दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई कराचकाही कारखाने कमी दराने साखर विक्री करतातच त्याशिवाय कोट्यापेक्षा अधिक विक्री करत असल्याने बाजार अस्थिर झाला आहे. अशा कारखान्यांना गाळप परवाना देऊच नये, अशी मागणी साखर आयुक्तांकडे केल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफ