शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

विद्यापीठ लोकाभिमुख व्हावे

By admin | Updated: April 25, 2015 00:46 IST

सी. विद्यासागर राव : शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोसायन्स स्कूल, ग्रंथालय विस्तार इमारतीचे उद्घाटन

कोल्हापूर : विद्यापीठ, महाविद्यालये ही समाजापासून अलिप्त असू नयेत. ती समाजासाठी आहेत, समाजासाठी उभी आहेत आणि सार्वजनिक निधीमधून चालविली जातात. त्यामुळे विद्यापीठ, महाविद्यालयांनी सामाजिक बांधीलकी जपायलाच हवी. त्यांनी लोकाभिमुख व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोसायन्स व तंत्रज्ञान स्कूलची नूतन इमारत आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाची दुमजली विस्तारित इमारत यांचे उद्घाटन राज्यपाल राव यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विद्यापीठात विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिविभाग प्रमुख यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा प्रमुख उपस्थित होते. राज्यपाल राव म्हणाले, दक्षिण महाराष्ट्राची गरज ओळखून शिवाजी विद्यापीठाने सुरू केलेले शुगर टेक्नॉलॉजी, तसेच नॅनो टेक्नॉलॉजी सारखे काळाशी सुसंगत अभ्यासक्रम उपयुक्त ठरणारे आहेत. आंतर विद्याशाखीय अभ्यासक्रमांना मिळणारे वाढते प्राधान्य हा २१ व्या शतकातील स्वागतार्ह बदल आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने राबविलेली चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अभ्यासक्रम पद्धती सुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल. श्री गणेशाला ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कलांचे ज्ञान अवगत होते, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सर्व विद्या, कलांचे ज्ञान, नवतंत्रज्ञान अवगत करून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. ते म्हणाले, प्रशासन हा विद्यापीठाचा चेहरा असून, तो अधिक कार्यक्षम होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जागृती व आवड निर्माण होण्याच्यादृष्टीने विद्यापीठांनी विज्ञान महोत्सव आयोजित करावेत. शिवाय सामाजिक शास्त्रे, अभियांत्रिकी, कला आणि वाणिज्य शाखांमध्ये रुची वाढविण्यासाठी महोत्सव घ्यावेत. कला व वस्तुसंग्रहालये प्रस्थापित करण्यात आपण मागे आहोत. विद्यापीठांनी समाजापर्यंत संशोधन पोहोचविण्यासाठी विज्ञान संग्रहालये, पुरातन वस्तुसंग्रहालये, तसेच नैसर्गिक विज्ञान संग्रहालये स्थापन करावीत. विद्यापीठातील कृषिविषयक संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. बैठकीच्या प्रारंभी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. यावेळी विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. आर. एम. कांबळे, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, बीसीयूडी संचालक डॉ. आर. बी. पाटील, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)