शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

पंचायत अभियंत्यांवर बेकारीची कुऱ्हाड

By admin | Updated: May 21, 2015 00:03 IST

वर्षभरातच योजनेचा गाशा गुंडाळला : राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान बंद करण्याचा शासनाचा निर्णय--लोकमत विशेष

प्रमोद सुकरे - कऱ्हाड- राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ‘राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण’ अभियानाअंंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात आणण्याबाबतचा निर्णय मंगळवार, दि. १९ मे रोजी घेतला आहे. त्यामुळे या अंतर्गत काम करणाऱ्या शेकडो पंचायत अभियंत्यावर बेकारीची वेळ येणार आहे. दि. १३ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार ‘राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान’ ही योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली. या शासन निर्णयामध्ये अंशत: बदल करून अनुक्रमे दि. १ आॅगस्ट २०१४, दि. ६ आॅगस्ट २०१४, दि. १९ आॅक्टोबर २०१४ व दि. ३ फेब्रुवारी २०१५ अन्वये सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आले. वरील निर्णयानुसार राजयस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर, पेसा कर्मचारी, गट अभियंता व पंचायत अभियंता ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात आली होती. मात्र, दि. २८ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने या योजनेस सन २०१५-१६ या वित्तीय वर्षापासून केंद्र शासनाच्या आर्थिक सहाय्यतेमधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दि. ८ मे २०१५ रोजी शासनाने आयोजित केलेल्या बैठकीत या योजनेस केंद्र सरकारचा निधी उपलब्ध होणार नाही, अशा स्पष्ट सूचना केल्या. त्यामुळे सद्य:स्थितीत कंत्राटी तत्त्वावर गट व पंचायत अभियंता पदावर नियुक्त केलेल्या ७५७ कर्मचाऱ्यांच्या सेवा मे २०१५ अखेर संपुष्टात येणार आहेत. राज्य शासनाचे उपसचिव गिरीश भालेराव यांनी याबाबतचे पत्र सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यामुळे गट अभियंत्यांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. ग्रामविकास निधी, तेरावा वित्तआयोग निधी, पर्यावरण संतुलित समृध्दी योजना, केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांची कामे गावोगावी होत असताना तांत्रिक देखभाल करण्यात यावी, होणारी विकासकामे दर्जेदार व्हावीत, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. यासाठी कंत्राटी अभियंते नेमण्यात आले. त्यांच्याशी अकरा महिन्यांचा करार करण्यात आला. त्या बदल्यात पंचायत अभियंत्याला प्रतिमहिना १६ हजार तर गट अभियंत्याला प्रतिमहिना १८ हजार मानधन देण्याचे निश्चित करण्यात आले. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी व पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अनेक अभियंत्यांनी यासाठी अर्ज दाखल केले होते. जिल्हा परिषद स्तरावर त्यांची लेखी व तोंडी परीक्षा घेऊन नेमणुका निश्चित करण्यात आल्या. मात्र, एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच ही योजना गुंडाळण्यात आल्याने कंत्राटदाराचा भ्रमनिरास झाला.पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीतील एक पंचायत अभियंता तर त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला गट अभियंता अशी नेमणूक करण्यात आली होती. वास्तविक राज्यभरात सुमारे २,०७५ पदे अशा स्वरूपात भरायची होती. त्यापैकी फक्त ७५७ पदे प्रत्यक्षात भरली गेली. त्यानंतर केंद्राबरोबरच राज्यातही सत्तांतर झाले. पुढील पदे तर भरली गेली नाहीतच; मात्र आहे त्या अभियंत्यांच्या नोकरीवरही कुऱ्हाड मारली गेली. ‘यशदा’तर्फे प्रशिक्षणही दिले ‘राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण’ अभियानांतर्गत कंत्राटी पध्दतीवरती नेमणूक दिलेल्या अभियंत्यांनी चांगल्या पध्दतीने काम करावे, यासाठी त्यांना ‘यशदा’ संस्थेतर्फे पाच दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. त्यासाठी शासनाने मोठा खर्चही केला होता. परिणामी गावोगावच्या विकास कामात या अभियंत्यांची मदत होत होती. पण, अचानक शासनाने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शासनाने ‘राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण’ अभियानांतर्गत मुलाखती घेऊन आमच्या नेमणुका केल्या आहेत. सातारा जिल्ह्यात पंचवीस पंचायत अभियंता गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत आहेत. पण, शासनाचा हा निर्णय आमच्यावर अन्यायकारक आहे. ही योजना पूर्ववत सुरू ठेवावी अथवा शासनाच्या इतर नोकऱ्यांमध्ये आम्हा अभियंत्यांचा प्राधान्याने विचार करावा. - गणेश कोळी, पंचायत अभियंता, विंग, ता कऱ्हाड