शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धड तयारीही करता येईना अन् शांतही बसता येईना, महापालिका निवडणूक लांबणीमुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 11:46 IST

प्रथमच लढविणाऱ्या मंडळींनी निवडणूक होईल, या अपेक्षेने त्यांचे हात सैल सोडले; परंतु आता निवडणूक लांबत चालल्याने तसेच खर्चही परवडत नसल्याने त्यांचे दर्शन दुर्मीळ झाले

कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ लांबल्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक मंडळींची प्रचंड कोंडी झाली आहे. निवडणूक नेमकी कधी होणार? याची स्पष्टता नसल्याने ‘धड तयारीही करता येईना आणि शांतही बसता येईना’ अशी अवस्था इच्छुकांची झाली आहे. पालिकेची निवडणूक प्रथमच लढविणाऱ्या मंडळींनी निवडणूक होईल, या अपेक्षेने त्यांचे हात सैल सोडले; परंतु आता निवडणूक लांबत चालल्याने तसेच खर्चही परवडत नसल्याने त्यांचे दर्शन दुर्मीळ झाले आहे.कोल्हापूर महानगरपालिकेसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० ला संपली. मुदत संपून दोन वर्षे होऊन गेली. निवडणूक होणार या अपेक्षेने जानेवारी २०२० पासून माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनी जोरदार पेरणी सुरू केली होती; परंतु कोरोनाची महामारी आली आणि निवडणूक बेमुदत लांबली. त्याही परिस्थितीत इच्छुक मंडळीनी मतदारांना हरप्रकारे मदत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. वर्षभर संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र इच्छुकांनी सामाजिक काम करणे सोडून दिले.निवडणूक लढवायची म्हटले की, भागातील मंडळांच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यापासून ते वैयक्तिक अडीअडचणीला धावून जाण्यापर्यंत प्रयोग करावे लागतात. नव्याने निवडणूक लढविणाऱ्यांनी शक्य होईल तेवढे काम केले. कोणतेही काम करायचे म्हटले, उपक्रम राबवायचा म्हटला की त्याला पैसे लागतात; पण पैसे घालूनही निवडणूक लागत नाही म्हटल्यावर मात्र त्यांनी आपले हात आखडते घेतले आहेत. अनेक इच्छुकांनी आता निवडणूक लागू दे, प्रभाग जाहीर होऊ देत, मग पुढचं बघू, असे म्हणून गप्प बसणे पसंत केले आहे.दैनंदिन कामासाठी ससेमिरा..वर्षानुवर्षे निवडणूक लढविणाऱ्या माजी नगरसेवक आणि ज्यांचा प्रभागातून सततचा संपर्क आहे, अशा मंडळींना मात्र नागरिक शांत बसून देत नाहीत. त्यांच्याकडे पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता यासंबंधीच्या तक्रारी केल्या जात आहेत. मंडळांना वर्गणी मागितली जात आहे. नगरसेवक नसतानाही त्यांना ही कामे मुकाट्याने करावी लागत आहेत. कारण उद्या भविष्यात कधी निवडणूक जाहीर झालीच तर पुन्हा त्यांच्या दारात जावे लागणार आहे. म्हणून मतदारांना दुखावण्याचा कोणी प्रयत्न करताना दिसत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक