शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

धड तयारीही करता येईना अन् शांतही बसता येईना, महापालिका निवडणूक लांबणीमुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 11:46 IST

प्रथमच लढविणाऱ्या मंडळींनी निवडणूक होईल, या अपेक्षेने त्यांचे हात सैल सोडले; परंतु आता निवडणूक लांबत चालल्याने तसेच खर्चही परवडत नसल्याने त्यांचे दर्शन दुर्मीळ झाले

कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ लांबल्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक मंडळींची प्रचंड कोंडी झाली आहे. निवडणूक नेमकी कधी होणार? याची स्पष्टता नसल्याने ‘धड तयारीही करता येईना आणि शांतही बसता येईना’ अशी अवस्था इच्छुकांची झाली आहे. पालिकेची निवडणूक प्रथमच लढविणाऱ्या मंडळींनी निवडणूक होईल, या अपेक्षेने त्यांचे हात सैल सोडले; परंतु आता निवडणूक लांबत चालल्याने तसेच खर्चही परवडत नसल्याने त्यांचे दर्शन दुर्मीळ झाले आहे.कोल्हापूर महानगरपालिकेसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० ला संपली. मुदत संपून दोन वर्षे होऊन गेली. निवडणूक होणार या अपेक्षेने जानेवारी २०२० पासून माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनी जोरदार पेरणी सुरू केली होती; परंतु कोरोनाची महामारी आली आणि निवडणूक बेमुदत लांबली. त्याही परिस्थितीत इच्छुक मंडळीनी मतदारांना हरप्रकारे मदत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. वर्षभर संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र इच्छुकांनी सामाजिक काम करणे सोडून दिले.निवडणूक लढवायची म्हटले की, भागातील मंडळांच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यापासून ते वैयक्तिक अडीअडचणीला धावून जाण्यापर्यंत प्रयोग करावे लागतात. नव्याने निवडणूक लढविणाऱ्यांनी शक्य होईल तेवढे काम केले. कोणतेही काम करायचे म्हटले, उपक्रम राबवायचा म्हटला की त्याला पैसे लागतात; पण पैसे घालूनही निवडणूक लागत नाही म्हटल्यावर मात्र त्यांनी आपले हात आखडते घेतले आहेत. अनेक इच्छुकांनी आता निवडणूक लागू दे, प्रभाग जाहीर होऊ देत, मग पुढचं बघू, असे म्हणून गप्प बसणे पसंत केले आहे.दैनंदिन कामासाठी ससेमिरा..वर्षानुवर्षे निवडणूक लढविणाऱ्या माजी नगरसेवक आणि ज्यांचा प्रभागातून सततचा संपर्क आहे, अशा मंडळींना मात्र नागरिक शांत बसून देत नाहीत. त्यांच्याकडे पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता यासंबंधीच्या तक्रारी केल्या जात आहेत. मंडळांना वर्गणी मागितली जात आहे. नगरसेवक नसतानाही त्यांना ही कामे मुकाट्याने करावी लागत आहेत. कारण उद्या भविष्यात कधी निवडणूक जाहीर झालीच तर पुन्हा त्यांच्या दारात जावे लागणार आहे. म्हणून मतदारांना दुखावण्याचा कोणी प्रयत्न करताना दिसत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक