शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

इचलकरंजीसाठी भुयारी गटार योजना

By admin | Updated: November 28, 2014 23:45 IST

९७ कोटी रुपये खर्च : सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघणार; ३८ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया

राजाराम पाटील- इचलकरंजी --शहराच्या वाढीव वसाहतींसह सुमारे ६० टक्के शहरासाठी भुयारी गटार योजना राबविण्यात येणार असल्याने घरगुती सांडपाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. ९७ कोटी रुपये खर्चाच्या योजनेमुळे आणखी १८ दशलक्ष लिटर म्हणजे एकूण ३८ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे.शहरात सध्या २० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी भुयारी गटार योजना कार्यान्वित आहे. सुमारे ४० टक्के मूळ गावठाणासह शहरातील वसाहतींचा समाविष्ट या योजनेत आहे. भुयारी गटारीतून जमा होणारे सांडपाणी टाकवडे वेस येथील काळ्या ओढ्यालगत असलेल्या एका विहिरीत जमा होते आणि हे पाणी विद्युत पंपाच्या साहाय्याने आसरानगर येथे असलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्रात नेऊन तेथे प्रक्रिया केली जाते. ही भुयारी गटार योजना साधारणत: २५ वर्षांपूर्वीची आहे.२५ वर्षांत शहराच्या औद्योगिक विकासाबरोबर लोकसंख्येत आणि वसाहतींमध्ये वाढ झाली. तसेच कबनूरची वाढीव वसाहत आणि शहापूरचा समावेश इचलकरंजी पालिका हद्दीत झाला. परिणामी या वाढीव वसाहतींना भुयारी गटार योजनेची गरज भासू लागली. उर्वरित ६० टक्के वसाहतींचा समावेश असणारी नवीन भुयारी गटार योजना तयार केली. तिची तीन वर्षांपूर्वीची किंमत ८२ कोटी रुपये होती.नवीन भुयारी गटार योजनेत १११ कि.मी. अंतराच्या नलिका टाकण्यात येणार आहेत. भुयारी गटारीतून नैसर्गिकरीत्या सांडपाणी जमा होणाऱ्या दोन वेगवेगळ्या उपयोजना आहेत. त्यापैकी एका उपयोजनेत शहापूर गावठाणाची पूर्व बाजू, तोरणानगर, आर. के. नगर, सांगली रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या परिसराचा समावेश आहे. हे सांडपाणी काळ्या ओढ्यावर एकत्रित करून तेथे ८ दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जाईल. उर्वरित उपयोजनेमध्ये शहापूरमधील गावठाण, डेक्कन परिसर, जवाहरनगर, भोनेमाळ, यशवंत कॉलनी, पुजारी मळा, कलानगर, जुना चंदूर रोड, कुडचे मळा अशा परिसरातील वसाहतींचे सांडपाणी चंदूर नाल्यावर एकत्रित केले जाईल आणि तेथे १० दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रक्रिया केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. काळा ओढा येथील प्रक्रिया केंद्राला ११ कोटी रुपये आणि चंदूर नाल्यावरील प्रक्रिया केंद्राला १२.४१ कोटी रुपये खर्च येणार आहे. अ‍ॅडव्हान्स देऊनही कामाला सुरूवात नाहीनवीन भुयारी गटार योजनेची निविदा विस्टाकोर नावाच्या मक्तेदाराला देण्यात आली असून, या निविदेसाठी या मक्तेदाराला १७ कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्सही देण्यात आला आहे. याला दोन महिने उलटून गेले तरी अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नाही. त्याबाबत सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीकडूनसुद्धा कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला जात नाही, याचेच आश्चर्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.वाढीव सांडपाण्याचा प्रश्न अनुत्तरितशहरास कृष्णा नदी व पंचगंगा नदीतून ५४ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यापैकी ४० दशलक्ष लिटर पाणी गटारीतून सांडपाणी म्हणून वाहत येते. सध्याच्या भुयारी गटार योजनेमार्फत २० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होते. नवीन भुयारी गटार योजनेतून १८ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. तरीसुद्धा उर्वरित दोन दशलक्ष लिटर सांडपाण्याचे काय, हा प्रश्न आहे. याशिवाय शहराच्या आणखीन लोकसंख्या वाढीबरोबर वसाहतीही वाढणार, पर्यायाने वाढीव सांडपाण्याचे काय करणार, हा प्रश्न नगरपालिकेसमोर आ वासून उभा आहे.नवीन सीईटीपीची मागणीइचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाबरोबर येथे उत्पादित होणाऱ्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांच्या संख्येतही वाढ होणार. या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या आणखीन एका ‘सीईटीपी’ची आवश्यकता आहे. त्याचाही विचार उद्योजक, व्यावसायिक व लोकप्रतिनिधींनी करावा, अशी मागणी जाणकारांतून होत आहे.