शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

रेशन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे; कोल्हापुरात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

By संदीप आडनाईक | Updated: September 20, 2022 16:02 IST

''दिल्लीत बसलेल्या पांढऱ्या दाढीवाल्या माेदीला अन् राज्यात सत्तेत बसलेल्या काळ्या दाढीवाल्याला सत्तेतून बाहेर खेचा खेचा''

कोल्हापूर : रेशन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, शिवसेना झिंदाबाद, रेशनवर गहू तांदूळ मिळालेच पाहिजे, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, एकनाथ शिंदे मुर्दाबाद अशा घोषणा देत आज, मंगळवारी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर रेशनकार्डधारक महिलांनी भव्य मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.केंद्र आणि राज्य सरकारमार्फत केशरी कार्डावरील ग्राहकांनाही स्वेच्छेने अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडण्याची सक्ती केली जात आहे. याविरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात रेशन कार्ड धारक महिलांना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दुपारी बारा वाजता दसरा चौकातून व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोड, असेंम्बली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत निघालेल्या या मोर्चात सामान्य कुटूंबातील रेशनकार्डधारक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना विजय देवणे यांनी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे यांच्यासह नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, विराज पाटील, अभिषेक देवणे आदी उपस्थित होते.रेशनचा अधिकार कायम करा, रेशनसाठी उत्पन्नाची किमान मर्यादा वार्षिक दोन लाख रुपये करा, उत्पन्नावर आधारित रेशनकार्ड बंद करु नका, केशरी रेशन कार्डवर गहू-तांदूळ-डाळ द्या, अन्न-धान्यावरील जीएसटी कर रद्द करा, गॅस सिलिंडरची किंमत ५०० रुपये करा, दसरा दिवाळीकरीता रेशनवर खाद्यतेल, डाळ आणि साखर द्या, बायोमेट्रीक पध्दत रद्द करा, जिल्हातीलअन्नसुरक्षा योजनेचा इष्टांक वाढवा, रेशनवरील प्रशासनाचा भ्रष्टाचार थांबवा, कर्जासाठी इन्कमटॅक्स नंबर काढलेला असेल, तर अशा केवळ तांत्रिक कारणासाठी रेशन बंद करु नका, दुचाकी, तीनचाकी, रिक्षा, टेम्पो असणाऱ्यांचे रेशन चालू ठेवा, शासन योजनेतून घरकुल अथवा इतर योजनेतून स्लॅबचे घर बांधले असेल तर रेशन चालू ठेवा, अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर टीका केली. सरकारकडून सामान्य कुटूंबाला किमान ३५ किलो धान्य मिळाले पाहिजे, यामध्ये २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू दिले पाहिजे, दिवाळीत रेशनवर गहू, डाळ आणि तेल दिले पाहिजे, तसेच डिझेल, पेट्रोल राहू द्या पण गॅस सिलेंडरची किंमत कायमस्वरुपी ५०० रुपये करा अशी मागणी केली. १९६७ मध्ये माझ्या आईचा पदर धरुन मी अशाचप्रकारच्या मोर्चाला सामोरा गेलो होतो, त्यावेळी लोकांनी दुकाने लुटली होती. आताच्या सरकारनेही असाच निर्णय कायम ठेवला तर लोकं दुकानं लुटण्यास कमी करणार नाहीत, असा इशारा देवणे यांनी दिला.

पांढऱ्या दाढीवाल्या मोदीला सत्तेतून खेचादिल्लीत बसलेल्या पांढऱ्या दाढीवाल्या माेदीला अन् राज्यात सत्तेत बसलेल्या काळ्या दाढीवाल्याला सत्तेतून बाहेर खेचा खेचा, अशा शब्दात नेत्यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी सरकारविरोधातील आपला रोष या मोर्चात प्रकट केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना