शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

अशोकअण्णांच्या ‘चाली’ने राष्ट्रवादीत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 00:38 IST

आजरा साखर कारखाना निवडणूक : भाजप-शिवसेना-स्वाभिमानी शेतकरी संघटना-रवींद्र आपटे गट एकत्र येणार

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा  येथे झालेल्या मेळाव्यात अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी आजरा साखर कारखाना निवडणुकीत आपणाला आघाडीचे सर्व अधिकार दिल्याचे कार्यकर्त्यांकडून वधवून घेतले. मात्र, त्याचबरोबर विजयासाठी आपण एखाद्या मोठ्या गटाशी आघाडी करण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचे जाहीर करून जी गुगली टाकली आहे त्यामुळे राष्ट्रवादीत मात्र अस्वस्थता दिसत आहे.अशोकअण्णांच्या व्यासपीठावर जिल्हा दूध संघाचे संचालक रवींद्र आपटे व कारखान्याचे विद्यमान ९ संचालक उपस्थित होते. अण्णा-भाऊ संस्था समूहाचे सर्व कार्यकर्तेही होतेच. जोडीला शिवसेनेचे संभाजी पाटील, भाजपचे बाबूराव कुंभार, स्वाभिमानीचे तानाजी देसाई ही मंडळी असल्यामुळे सध्यातरी अशोक अण्णा भाजप - शिवसेना - स्वाभिमानी संघटना-रवींद्र आपटे गट अशी राष्ट्रवादीविरोधी दिशा स्पष्ट होत आहे.जयवंतराव शिंपी, विष्णूपंत केसरकर, अंजना रेडेकर हे राष्ट्रवादी व अशोकअण्णा वगळता प्रबळ गट समजले जातात. पैकी जयवंतराव शिंपी राष्ट्रवादीसोबत दिसत असले तरी जिल्हा बँक निवडणुकीत झालेला पराभव व जनता बँक निवडणुकीत जयवंतरावांना झालेले मतदान पाहता जयवंतरावांचे कार्यकर्तेच राष्ट्रवादीची संगत करू नका अशी भूमिका घेऊ लागले आहेत. नकळतपणे अशोकअण्णा परवडले पण राष्ट्रवादीतील काही मंडळी नकोत, असाच संदेश कार्यकर्ते देऊ लागले आहेत. सद्य:स्थितीत जयवंतरावांसारखा एखादा गट अशोकअण्णांच्या हाताला लागला तर अनेक धक्कादायक गोष्टी घडू शकतात. अशोकअण्णांच्या कायकर्त्यांचीही जयवंतरावांसोबत जाण्यात हरकत दिसत नाही.राहता राहिला प्रश्न विष्णूपंत केसरकर व श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचा. विष्णुपंतांची नेहमीप्रमाणे अद्याप तरी सावध भूमिका आहे. राष्ट्रवादीतील काही मंडळींचा त्यांना विरोध असला तरी बेरजेचे राजकारण करावयाचे ठरल्यास विष्णूपंतांना राष्ट्रवादीमध्येच सामावून घेतले जाईल. अंजनाताई या आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या असल्याने त्यादेखील राष्ट्रवादीसोबत राहण्याची शक्यता आहे.अशोकअण्णांनी सर्वांना दरवाजे खुले असल्याचे सांगितले असले तरी जयवंतरावांशी हातमिळवणी करून आमदार मुश्रीफांची गडहिंग्लज कारखान्यातील खेळी अशोकअण्णांकडून खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.जयवंतराव व अशोकअण्णा एकत्र येण्याची शक्यता बळावल्याने राष्ट्रवादीमध्ये मात्र अस्वस्थता वाढू लागली आहे. अशोकअण्णा, जयवंतराव, स्वाभिमानी, सेना, भाजप अशी आघाडी झाल्यास राष्ट्रवादी- काँगे्रसलाही काही नेटकी व्यूहरचना करावी लागणार हे निश्चित.