शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अशोकअण्णांच्या ‘चाली’ने राष्ट्रवादीत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 00:38 IST

आजरा साखर कारखाना निवडणूक : भाजप-शिवसेना-स्वाभिमानी शेतकरी संघटना-रवींद्र आपटे गट एकत्र येणार

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा  येथे झालेल्या मेळाव्यात अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी आजरा साखर कारखाना निवडणुकीत आपणाला आघाडीचे सर्व अधिकार दिल्याचे कार्यकर्त्यांकडून वधवून घेतले. मात्र, त्याचबरोबर विजयासाठी आपण एखाद्या मोठ्या गटाशी आघाडी करण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचे जाहीर करून जी गुगली टाकली आहे त्यामुळे राष्ट्रवादीत मात्र अस्वस्थता दिसत आहे.अशोकअण्णांच्या व्यासपीठावर जिल्हा दूध संघाचे संचालक रवींद्र आपटे व कारखान्याचे विद्यमान ९ संचालक उपस्थित होते. अण्णा-भाऊ संस्था समूहाचे सर्व कार्यकर्तेही होतेच. जोडीला शिवसेनेचे संभाजी पाटील, भाजपचे बाबूराव कुंभार, स्वाभिमानीचे तानाजी देसाई ही मंडळी असल्यामुळे सध्यातरी अशोक अण्णा भाजप - शिवसेना - स्वाभिमानी संघटना-रवींद्र आपटे गट अशी राष्ट्रवादीविरोधी दिशा स्पष्ट होत आहे.जयवंतराव शिंपी, विष्णूपंत केसरकर, अंजना रेडेकर हे राष्ट्रवादी व अशोकअण्णा वगळता प्रबळ गट समजले जातात. पैकी जयवंतराव शिंपी राष्ट्रवादीसोबत दिसत असले तरी जिल्हा बँक निवडणुकीत झालेला पराभव व जनता बँक निवडणुकीत जयवंतरावांना झालेले मतदान पाहता जयवंतरावांचे कार्यकर्तेच राष्ट्रवादीची संगत करू नका अशी भूमिका घेऊ लागले आहेत. नकळतपणे अशोकअण्णा परवडले पण राष्ट्रवादीतील काही मंडळी नकोत, असाच संदेश कार्यकर्ते देऊ लागले आहेत. सद्य:स्थितीत जयवंतरावांसारखा एखादा गट अशोकअण्णांच्या हाताला लागला तर अनेक धक्कादायक गोष्टी घडू शकतात. अशोकअण्णांच्या कायकर्त्यांचीही जयवंतरावांसोबत जाण्यात हरकत दिसत नाही.राहता राहिला प्रश्न विष्णूपंत केसरकर व श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचा. विष्णुपंतांची नेहमीप्रमाणे अद्याप तरी सावध भूमिका आहे. राष्ट्रवादीतील काही मंडळींचा त्यांना विरोध असला तरी बेरजेचे राजकारण करावयाचे ठरल्यास विष्णूपंतांना राष्ट्रवादीमध्येच सामावून घेतले जाईल. अंजनाताई या आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या असल्याने त्यादेखील राष्ट्रवादीसोबत राहण्याची शक्यता आहे.अशोकअण्णांनी सर्वांना दरवाजे खुले असल्याचे सांगितले असले तरी जयवंतरावांशी हातमिळवणी करून आमदार मुश्रीफांची गडहिंग्लज कारखान्यातील खेळी अशोकअण्णांकडून खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.जयवंतराव व अशोकअण्णा एकत्र येण्याची शक्यता बळावल्याने राष्ट्रवादीमध्ये मात्र अस्वस्थता वाढू लागली आहे. अशोकअण्णा, जयवंतराव, स्वाभिमानी, सेना, भाजप अशी आघाडी झाल्यास राष्ट्रवादी- काँगे्रसलाही काही नेटकी व्यूहरचना करावी लागणार हे निश्चित.