शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

देशाप्रती मूलभूत ज्ञानाबाबतही अनभिज्ञ लोकमत सर्वेक्षणातील निष्कर्ष : प्रजासत्ताकदिनाबाबत जागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 01:16 IST

दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिन कोठे आणि कुणाच्या हस्ते साजरा होतो?, मुंबईमध्ये मुख्य ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते?, राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत?, अशा मूलभूत प्रश्नांचेही ज्ञान अनेक नागरिकांना नसल्याचा निष्कर्ष ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात निघाला आहे. ‘अशोकचक्र’चा प्रश्न वगळता अन्य कोणत्याही प्रश्नावर शंभर टक्के अचूक उत्तरे आलेली नाहीत.

- इंदुमती गणेश ।कोल्हापूर : दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिन कोठे आणि कुणाच्या हस्ते साजरा होतो?, मुंबईमध्ये मुख्य ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते?, राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत?, अशा मूलभूत प्रश्नांचेही ज्ञान अनेक नागरिकांना नसल्याचा निष्कर्ष ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात निघाला आहे. ‘अशोकचक्र’चा प्रश्न वगळता अन्य कोणत्याही प्रश्नावर शंभर टक्के अचूक उत्तरे आलेली नाहीत. यावरून देशाप्रतीच्या प्राथमिक माहितीचाही किती अभाव आहे, याची जाणीव या सर्व्हेवरून झाली.भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन आज, शनिवारी साजरा होत आहे. यानिमित्त प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’च्यावतीने विविध वयोगटांतील, तसेच शंभर नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला. यात दहा प्रश्न विचारण्यात आले होते.

प्रजासत्ताक दिन कसा साजरा करावा? या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी लावणे, जिलेबी खाणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणे म्हणजे देशाचा उत्सव असे त्याचे स्वरूप राहू नये, असे म्हटले आहे. स्वच्छता, भ्रष्टाचाराचा बीमोड, स्त्री सन्मान, आरोग्य, शिक्षण, सर्वधर्म समभाव, अशा देश व समाज हिताच्या गोष्टींचे कर्तव्य पार पाडावे. नव्या पिढीला राष्ट्राची माहिती मिळावी, निवृत्त जवान, शहीद जवान यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करावा, गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी, रस्त्यावरचे आयुष्य जगणाऱ्यांना मदत करावी, अशा संकल्पना मांडल्या आहेत.राजपथ, राष्ट्रपती आणि राज्यपालप्रजासत्ताक दिनाचा दिल्लीतील मुख्य सोहळा राजपथवर राष्ट्रपतींच्या हस्ते होतो. मुंबईतील कार्यक्रम राज्यपालांच्या हस्ते होतो, तर राष्ट्रध्वजामध्ये तीन रंग आहेत. सुट्टी आणि धम्माल यादृष्टीने या दिवसाचे नियोजन केले जात असल्याने ६० टक्क्यांहून अधिक लोक ध्वजारोहणाला उपस्थित नसतात.लोकमत सर्व्हेमधून मिळालेली उत्तरे अशी :प्रश्न : २६ जानेवारी हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातोउत्तर : प्रजासत्ताक दिन : ९७ टक्के, स्वातंत्र्यदिन : ३ टक्के.

प्रश्न : दिल्लीमध्ये २६ जानेवारीचा मुख्य सोहळा कोठे होतो?उत्तर : लाल किल्ला : ४५ टक्के, राजपथ ३५ टक्के, राष्ट्रपती भवन : २० टक्के.

प्रश्न : दिल्लीतील मुख्य सोहळ्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते? उत्तर : राष्ट्रपती : ३८ टक्के , पंतप्रधान : ६२ टक्के.प्रश्न : भारताच्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत?उत्तर : तीन : ६८ टक्के, चार : ३२ टक्के.

प्रश्न : मुंबईमध्ये २६ जानेवारीचे मुख्य ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते?उत्तर : राज्यपाल : ३० टक्के, मुख्यमंत्री : ७० टक्के.

प्रश्न : भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये कोणते चिन्ह वापरण्यात आले आहे?उत्तर : अशोक चक्र : शंभर टक्के.

प्रश्न : कोल्हापूरमध्ये २६ जानेवारीचा मुख्य शासकीय कार्यक्रम कोठे होतो?उत्तर : शाहू स्टेडियम : ५५ टक्के, पोलिस ग्राऊंड : २८ टक्के, शिवाजी स्टेडियम : १७ टक्के.

प्रश्न : कोल्हापूरमधील कार्यक्रमात ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होेते?उत्तर : पालकमंत्री : ५८ टक्के, जिल्हाधिकारी २८ टक्के, आयुक्त : १२ टक्के, विशेष पोलीस महानिरीक्षक : २ टक्के.ध्वजारोहण कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित असता का?होय : ४० टक्के, नाही : ६० टक्के.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनkolhapurकोल्हापूर