शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

देशाप्रती मूलभूत ज्ञानाबाबतही अनभिज्ञ लोकमत सर्वेक्षणातील निष्कर्ष : प्रजासत्ताकदिनाबाबत जागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 01:16 IST

दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिन कोठे आणि कुणाच्या हस्ते साजरा होतो?, मुंबईमध्ये मुख्य ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते?, राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत?, अशा मूलभूत प्रश्नांचेही ज्ञान अनेक नागरिकांना नसल्याचा निष्कर्ष ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात निघाला आहे. ‘अशोकचक्र’चा प्रश्न वगळता अन्य कोणत्याही प्रश्नावर शंभर टक्के अचूक उत्तरे आलेली नाहीत.

- इंदुमती गणेश ।कोल्हापूर : दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिन कोठे आणि कुणाच्या हस्ते साजरा होतो?, मुंबईमध्ये मुख्य ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते?, राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत?, अशा मूलभूत प्रश्नांचेही ज्ञान अनेक नागरिकांना नसल्याचा निष्कर्ष ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात निघाला आहे. ‘अशोकचक्र’चा प्रश्न वगळता अन्य कोणत्याही प्रश्नावर शंभर टक्के अचूक उत्तरे आलेली नाहीत. यावरून देशाप्रतीच्या प्राथमिक माहितीचाही किती अभाव आहे, याची जाणीव या सर्व्हेवरून झाली.भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन आज, शनिवारी साजरा होत आहे. यानिमित्त प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’च्यावतीने विविध वयोगटांतील, तसेच शंभर नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला. यात दहा प्रश्न विचारण्यात आले होते.

प्रजासत्ताक दिन कसा साजरा करावा? या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी लावणे, जिलेबी खाणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणे म्हणजे देशाचा उत्सव असे त्याचे स्वरूप राहू नये, असे म्हटले आहे. स्वच्छता, भ्रष्टाचाराचा बीमोड, स्त्री सन्मान, आरोग्य, शिक्षण, सर्वधर्म समभाव, अशा देश व समाज हिताच्या गोष्टींचे कर्तव्य पार पाडावे. नव्या पिढीला राष्ट्राची माहिती मिळावी, निवृत्त जवान, शहीद जवान यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करावा, गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी, रस्त्यावरचे आयुष्य जगणाऱ्यांना मदत करावी, अशा संकल्पना मांडल्या आहेत.राजपथ, राष्ट्रपती आणि राज्यपालप्रजासत्ताक दिनाचा दिल्लीतील मुख्य सोहळा राजपथवर राष्ट्रपतींच्या हस्ते होतो. मुंबईतील कार्यक्रम राज्यपालांच्या हस्ते होतो, तर राष्ट्रध्वजामध्ये तीन रंग आहेत. सुट्टी आणि धम्माल यादृष्टीने या दिवसाचे नियोजन केले जात असल्याने ६० टक्क्यांहून अधिक लोक ध्वजारोहणाला उपस्थित नसतात.लोकमत सर्व्हेमधून मिळालेली उत्तरे अशी :प्रश्न : २६ जानेवारी हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातोउत्तर : प्रजासत्ताक दिन : ९७ टक्के, स्वातंत्र्यदिन : ३ टक्के.

प्रश्न : दिल्लीमध्ये २६ जानेवारीचा मुख्य सोहळा कोठे होतो?उत्तर : लाल किल्ला : ४५ टक्के, राजपथ ३५ टक्के, राष्ट्रपती भवन : २० टक्के.

प्रश्न : दिल्लीतील मुख्य सोहळ्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते? उत्तर : राष्ट्रपती : ३८ टक्के , पंतप्रधान : ६२ टक्के.प्रश्न : भारताच्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत?उत्तर : तीन : ६८ टक्के, चार : ३२ टक्के.

प्रश्न : मुंबईमध्ये २६ जानेवारीचे मुख्य ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते?उत्तर : राज्यपाल : ३० टक्के, मुख्यमंत्री : ७० टक्के.

प्रश्न : भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये कोणते चिन्ह वापरण्यात आले आहे?उत्तर : अशोक चक्र : शंभर टक्के.

प्रश्न : कोल्हापूरमध्ये २६ जानेवारीचा मुख्य शासकीय कार्यक्रम कोठे होतो?उत्तर : शाहू स्टेडियम : ५५ टक्के, पोलिस ग्राऊंड : २८ टक्के, शिवाजी स्टेडियम : १७ टक्के.

प्रश्न : कोल्हापूरमधील कार्यक्रमात ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होेते?उत्तर : पालकमंत्री : ५८ टक्के, जिल्हाधिकारी २८ टक्के, आयुक्त : १२ टक्के, विशेष पोलीस महानिरीक्षक : २ टक्के.ध्वजारोहण कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित असता का?होय : ४० टक्के, नाही : ६० टक्के.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनkolhapurकोल्हापूर