शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

भारत पाटील यांचे व्यसनमुक्तीसाठी अनवाणी प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 01:53 IST

पन्हाळा तालुक्यात दौरा : सहा महिन्यांपासून उपक्रम, चांगला प्रतिसाद, दारूची बाटली आडवी होत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा संकल्प

भीमगोेंडा देसाई ल्ल कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील हे पन्हाळा तालुका व्यसनमुक्त करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून अनवाणी प्रबोधन करीत आहेत. पुढील तीन वर्षांत संपूर्ण तालुका व्यसनमुक्त करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. जोपर्यंत तालुक्यातील सर्व गावांतील दारूची बाटली आडवी होणार नाही, तोपर्यंत पायांत चप्पल न घालण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. ‘निर्मल भारत’च्या प्रभावी कामांमुळे राज्यात चर्चेत आलेले पाटील यांच्या व्यसनमुक्त अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. पाटील यांचे गाव पन्हाळा तालुक्यातील कोडोली. ते सन २००७ ते २०१०अखेर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्या कालावधीत त्यांनी ‘निर्मल अभियाना’ला लोकचळवळीचे स्वरूप देत कोल्हापूर जिल्हा परिषदेला देशपातळीवर पोहोचविले. समाजहितासाठी ते अभिनव उपक्रम राबवीत असतात. तंबाखू, सिगारेट, दारू यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या घटना तालुक्यात वाढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कोणाचे वडील, कोणाचा भाऊ, कोणाचा पती व्यसनाला बळी गेल्याने अस्वस्थ झाले. ८ डिसेंबर २०१५ रोजी वाढदिवसादिवशी त्यांनी तालुका व्यसनमुक्त करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दारूची बाटली आडवी होईपर्यंत पायांत चप्पल न घालण्याच्या संकल्पाची अंमलबजावणी त्यांनी सुरू केली. प्रबोधनासाठी त्यांनी माहिती पुस्तिका काढली आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ३६ शाळांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आहे. व्यसनाचे दुष्परिणाम सांगून आयुष्यात कधीही व्यसन करणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांना दिली आहे. व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी रोज वडिलांच्या पाया पडून विनंती करण्याचा मंत्र त्यांनी दिला. तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करून ते व्यसनविरोधी जागृतीची ज्योत पेटवीत आहेत. दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत, सेवा संस्था, कारखाने यांना भेट देणे, राजकीय नेत्यांना निवेदने देणे, दारू दुकानदारांना भेटून विक्री न करण्याची विनंती करणे अशा कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. १५ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना रायगड, प्रतापगड दर्शन घडवून आणणार आहेत. गडावर नेऊन व्यसनमुक्तीची शपथ देतील. अशा प्रकारे जागृतीच्या माध्यमातून ते व्यसनमुक्तीसाठी आवाहन करणार आहेत. त्याची दखल न घेतल्यास २६ जानेवारी २०१७ पासून लोकशाही मार्गाने आंदोलन करून लक्ष वेधणार आहेत.