शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

उमेश कत्ती यांच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्याने कर्नाटकचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 16:39 IST

बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. दस्तूरखुद्द कत्ती यांनीच दोन दिवसांपूर्वी हुक्केरी येथे एका कार्यक्रमात उघडपणे यासंदर्भातील सुतोवाच केले आहे.त्यामुळे भाजपासह कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे उमेश कत्ती यांच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्याने कर्नाटकचे राजकारण तापले कर्नाटकात खळबळ : हुक्केरी येथील एका कार्यक्रमात केले सुतोवाच

राम मगदूम गडहिंग्लज : बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. दस्तूरखुद्द कत्ती यांनीच दोन दिवसांपूर्वी हुक्केरी येथे एका कार्यक्रमात उघडपणे यासंदर्भातील सुतोवाच केले आहे.त्यामुळे भाजपासह कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

१० वर्षांपूर्वी त्यांनी जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केला.त्यानंतर त्यांना कॅबिनेटमंत्रीपदासह बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील मिळाले होते.परंतु, आता राज्यात भाजपची सत्ता येऊनदेखील मंत्रीमंडळात समावेश न झाल्याने ते गेल्या कांही महिन्यांपासून नाराज आहेत.दरम्यान,कनिष्ठ बंधू माजी खासदार रमेश यांना राज्यसभेवर संधी मिळावी म्हणून त्यांनी फिल्डींग लावली होती. त्यासाठी 'उत्तर कर्नाटकातील आमदारांसाठी स्नेहभोजन' ठेवून त्यांनी नेतृत्वावर दबाव आणला होता.त्यावेळी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी मंत्री मंडळात स्थान देण्याचे त्यांना आश्वासन दिले होते.सोमवारी (२२) हुक्केरी येथे 'विश्वराज ट्रस्ट'तर्फे आशा वर्कर्सना जीवनावश्यक वस्तू वाटपप्रसंगी त्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला. त्यासाठीचा अनुभव व योग्यताही आपल्याकडे आहे, हे सांगायलादेखील ते विसरले नाहीत.त्यांच्या या वक्तव्याने पावसाळ्यातहीकर्नाटकचे राजकारण तापले आहे.कत्ती नेमकं काय म्हणाले..?मी, ८ वेळा आमदार झालो,१३ वर्षे मंत्री होतो.त्यामुळे पुन्हा मंत्रीपद मिळेल, परंतु आता मला त्यात स्वारस्य नाही.तुमचा आशीर्वाद असेल तर उत्तर कर्नाटकचा सुपुत्र या राज्याचा मुख्यमंत्री होईल,असा विश्वास कत्ती यांनी व्यक्त केला. 'रमेश'ना डावलल्याची खदखदलोकसभा निवडणुकीत भाजपने चिक्कोडी मतदार संघात रमेश कत्ती यांना डावलून आण्णासाहेब ज्वोल्ले यांना उमेदवारी दिली. त्याचवेळी 'रमेश'ना राज्यसभेवर पाठविण्याचे आश्र्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात रमेश यांच्या ऐवजी गोकाकच्या ईराण्णा कडाडी यांना संधी दिली.स्वतंत्र राज्याची मागणीकर्नाटकच्या राजकारणात 'दक्षिण' आणि 'उत्तर' असा वाद पूर्वीपासूनच राहिला आहे. एस.आर.बोम्मई व जगदीश शेट्टर यांचा अपवाद वगळता उत्तर कर्नाटकाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळालेली नाही.त्यामुळे उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्याची मागणी कत्तींनी यापूर्वीच केली आहे. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव