शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

उमेश कत्ती यांच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्याने कर्नाटकचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 16:39 IST

बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. दस्तूरखुद्द कत्ती यांनीच दोन दिवसांपूर्वी हुक्केरी येथे एका कार्यक्रमात उघडपणे यासंदर्भातील सुतोवाच केले आहे.त्यामुळे भाजपासह कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे उमेश कत्ती यांच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्याने कर्नाटकचे राजकारण तापले कर्नाटकात खळबळ : हुक्केरी येथील एका कार्यक्रमात केले सुतोवाच

राम मगदूम गडहिंग्लज : बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. दस्तूरखुद्द कत्ती यांनीच दोन दिवसांपूर्वी हुक्केरी येथे एका कार्यक्रमात उघडपणे यासंदर्भातील सुतोवाच केले आहे.त्यामुळे भाजपासह कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

१० वर्षांपूर्वी त्यांनी जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केला.त्यानंतर त्यांना कॅबिनेटमंत्रीपदासह बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील मिळाले होते.परंतु, आता राज्यात भाजपची सत्ता येऊनदेखील मंत्रीमंडळात समावेश न झाल्याने ते गेल्या कांही महिन्यांपासून नाराज आहेत.दरम्यान,कनिष्ठ बंधू माजी खासदार रमेश यांना राज्यसभेवर संधी मिळावी म्हणून त्यांनी फिल्डींग लावली होती. त्यासाठी 'उत्तर कर्नाटकातील आमदारांसाठी स्नेहभोजन' ठेवून त्यांनी नेतृत्वावर दबाव आणला होता.त्यावेळी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी मंत्री मंडळात स्थान देण्याचे त्यांना आश्वासन दिले होते.सोमवारी (२२) हुक्केरी येथे 'विश्वराज ट्रस्ट'तर्फे आशा वर्कर्सना जीवनावश्यक वस्तू वाटपप्रसंगी त्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला. त्यासाठीचा अनुभव व योग्यताही आपल्याकडे आहे, हे सांगायलादेखील ते विसरले नाहीत.त्यांच्या या वक्तव्याने पावसाळ्यातहीकर्नाटकचे राजकारण तापले आहे.कत्ती नेमकं काय म्हणाले..?मी, ८ वेळा आमदार झालो,१३ वर्षे मंत्री होतो.त्यामुळे पुन्हा मंत्रीपद मिळेल, परंतु आता मला त्यात स्वारस्य नाही.तुमचा आशीर्वाद असेल तर उत्तर कर्नाटकचा सुपुत्र या राज्याचा मुख्यमंत्री होईल,असा विश्वास कत्ती यांनी व्यक्त केला. 'रमेश'ना डावलल्याची खदखदलोकसभा निवडणुकीत भाजपने चिक्कोडी मतदार संघात रमेश कत्ती यांना डावलून आण्णासाहेब ज्वोल्ले यांना उमेदवारी दिली. त्याचवेळी 'रमेश'ना राज्यसभेवर पाठविण्याचे आश्र्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात रमेश यांच्या ऐवजी गोकाकच्या ईराण्णा कडाडी यांना संधी दिली.स्वतंत्र राज्याची मागणीकर्नाटकच्या राजकारणात 'दक्षिण' आणि 'उत्तर' असा वाद पूर्वीपासूनच राहिला आहे. एस.आर.बोम्मई व जगदीश शेट्टर यांचा अपवाद वगळता उत्तर कर्नाटकाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळालेली नाही.त्यामुळे उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्याची मागणी कत्तींनी यापूर्वीच केली आहे. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव