शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

‘यूजीसी’कडे दहा विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या ४०५ तक्रारी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 14:51 IST

राज्यातील १० विद्यापीठे आणि एका संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विविध स्वरूपांतील ४०५ तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) प्रलंबित आहेत. त्यांच्या निवारणाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.

ठळक मुद्दे‘यूजीसी’कडे दहा विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या ४०५ तक्रारी प्रलंबितमहाराष्ट्रातील चित्र; निवारणाची प्रतीक्षा

संतोष मिठारीकोल्हापूर : राज्यातील १० विद्यापीठे आणि एका संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विविध स्वरूपांतील ४०५ तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) प्रलंबित आहेत. त्यांच्या निवारणाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.यूजीसीने विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ‘आॅनलाईन विद्यार्थी तक्रार निवारण पोर्टल’ सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सुविधा, आदींबाबत काही तक्रारी असल्यास त्या थेटपणे मांडण्यासाठी या पोर्टलची सुविधा यूजीसीने उपलब्ध करून दिली आहे. तक्रार आॅनलाईन नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिल्यांदा या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागते.

तक्रार नोंदविल्यानंतर त्याबाबतच्या कार्यवाहीची स्थिती त्यांना जाणून घेता येते. यावर स्मरण आणि स्पष्टीकरणाची सुविधा आहे. यूजीसीकडे आतापर्यंत देशभरातील ५३२ विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांच्या ५८०३ तक्रारी प्रलंबित आहेत. त्यात महाराष्ट्रातील १० विद्यापीठे आणि एका शैक्षणिक संस्थेतील ४०५ तक्रारींचा समावेश आहे. त्यामध्ये परीक्षाविषयक मूल्यांकन आणि मानसिक छळ, आदी स्वरूपातील तक्रारींचा समावेश आहे.

राज्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

  1. टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस : २४१
  2. मुंबई विद्यापीठ : ७६
  3. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ : २१
  4.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : १९
  5. शिवाजी विद्यापीठ : १८
  6. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : १०
  7. एसएनडीटी युनिव्हर्सिटी : ८
  8.  सोलापूर विद्यापीठ, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आॅफ हेल्थ सायन्स : प्रत्येकी पाच
  9. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ : प्रत्येकी एक 

देशभरातील ३१०९ तक्रारींचे निवारणदेशभरातील एकूण १५१ विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांतील ३१०९ तक्रारींचे निवारण झाले असून, त्यात महाराष्ट्रामधील ८७ तक्रारी आहेत. त्यामध्ये पुणे विद्यापीठ (७४), भारती विद्यापीठ (६), सोलापूर विद्यापीठ (४) आणि सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी (३) यांचा समावेश आहे.

 

उच्च शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेण्याचा यूजीसीचा प्रयत्न चांगला आहे. मात्र, तक्रारींचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यात प्रामुख्याने परीक्षाविषयक मूल्यांकन आणि महाविद्यालय, शिक्षण संस्था, विद्यापीठातील मानसिक छळ, आदींबाबतच्या तक्रारींचा समावेश असतो. स्वरूप वेगवेगळे असल्याने त्यांचे निवारण लवकर होणे आवश्यक आहे. ते लक्षात घेऊन यूजीसीने या तक्रार निवारण प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करावे. त्याची जबाबदारी विद्यापीठांवर सोपावावी आणि यूजीसीने स्वत: लक्ष ठेवावे.- डॉ. अरुण आडसूळ, शिक्षणतज्ज्ञ

शिक्षण हे विद्यार्थीकेंद्रित असले पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात अडचणी, शंका किंवा तक्रारी असल्यास विद्यापीठ प्रशासनाने गंभीरपणे विचार करून त्यावर मार्ग काढला पाहिजे. विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थी अभ्यासक आहे. शिक्षण त्याचा अधिकार आहे, याची जाणीव महत्त्वाची आहे. उच्च शिक्षणामध्ये लालफितीचा अडथळा दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सक्रिय होण्याची गरज आहे.- अतुल देसाई, अध्यक्ष, आभास फाउंडेशन, कोल्हापूर. 

 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर