शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयवादात उडता उडेना कोल्हापुरचे विमान ,गेली सहा वर्षे सेवेची केवळ प्रतीक्षाच; जिल्ह्याच्या विकासाला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:50 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव गेल्या चार वर्षांत एकदा नव्हे, तर दोन वेळा मंत्रिमंडळात झाला. मात्र,

संतोष मिठारी ।कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव गेल्या चार वर्षांत एकदा नव्हे, तर दोन वेळा मंत्रिमंडळात झाला. मात्र, प्रत्यक्षात विकासासाठी पूरक ठरणारी विमानसेवा सुरू झालेली नाही. नामकरण झाले, त्याच्या श्रेयवादावरही उड्या पडल्या परंतू जे मुख्य आहे ते विमान मात्र अजूनही धावपट्टीवर यायला तयार नाही.

विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी कोल्हापुरातील राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनी, छत्रपती राजाराम महाराजप्रेमी आणि कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनकडून वारंवार केली जात होती. यावर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने जून २०१४ मध्ये विमानतळाच्या नामकरणाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला; पण, प्रत्यक्षात नामकरणाबाबत शासन निर्णय झाला नाही. त्यामुळे केंद्र शासनाकडे हा ठरावच गेला नाही.

यानंतर भाजप-सेना सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा या संघटनांनी नामकरणाची मागणी केली. त्याची दखल घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक यांनी नामकरणाबाबत शासनाकडे पाठपुरावा केला. पालकमंत्री पाटील यांनी नामकरणाबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ जानेवारी २०१८ ला मंजुरी दिली. नामकरण झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी विमानसेवादेखील लवकरच सुरू होईल, अशी आश्वासने दिली. मात्र, प्रत्यक्षात या दृष्टीने अपेक्षित गतीने कार्यवाही होत नसल्याने संबंधित आश्वासनेदेखील हवेतच राहिली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली विमानसेवा लवकरच सुरू होण्याची आशा पल्लवित झाली होती; पण, त्यावरदेखील पाणी फिरले आहे. विमानसेवा सुरू नसल्याने जिल्ह्याच्या उद्योग-व्यवसायांच्या विकासातील मोठा अडथळा ठरत आहे.तोपर्यंत हवेतच इमले..विमानतळाच्या नामकरणाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याने आगामी अधिवेशनात हा प्रस्ताव दोन्ही सभागृहांमध्ये ठरावाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा ठराव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. केंद्र शासनाने मंजुरी दिल्यावरच त्याचे नामकरण होईल, तोपर्यंत तरी सगळे हवेतीलच इमले आहेत.सगळेच ठप्प...कोल्हापूरची विमानसेवा आठवड्यातील मंगळवारी, बुधवारी आणि रविवारी पुरविली जाणार असून, तिचा प्रारंभ दि. २४ डिसेंबरपासून होईल, असे खासदार संभाजीराजे, खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिसेंबर २०१७ च्या दुसºया आठवड्यात जाहीर केले.यातच कोल्हापूर-मुंबई ही सेवा सहा दिवसांसाठी असावी, असा आग्रह ‘एअर डेक्कन’ने धरला. सहा दिवसांच्या सेवेसाठी परवानगी मिळावी, अशी मागणी जीव्हीके कंपनीकडे केली.‘एअर डेक्कन’ आपल्या आग्रहावर ठाम असल्याने आणि जीव्हीके कंपनीकडून मागणी मान्य झाली नसल्याने, या मागणीबाबत दिल्ली येथील केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयात १९ डिसेंबरला झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. आता ही सेवा पुढे कधी सुरु होणार याबाबत कुणाकडेच ठोस उत्तर नाही.

 

उड्डाण योजनेअंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरविण्यासाठी मान्यता मिळालेल्या ‘एअर डेक्कन’कडून अजून सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे सेवा पुरविण्यासाठी विमान कंपनी बदलून द्यावी, यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव चोबे यांची भेट घेणार आहे.- खासदार धनंजय महाडिक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ