शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उध्दव ठाकरेंचे सरकारबरोबर पटत नाही मग ते घटस्फोट का घेत नाही ? - नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 17:33 IST

राज्यात नवीन पक्षाची आवश्यकता होती.  ती उणीव भरुन काढण्यासाठी मी नवीन पक्ष काढला आहे. लोकांना काम करणारा नेता हवा आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरात आपल्याला शिवसेनेच्या आमदारांची संख्या शुन्य करायची आहे असे नारायण राणे म्हणाले.

कोल्हापूर - राज्यात नवीन पक्षाची आवश्यकता होती.  ती उणीव भरुन काढण्यासाठी मी नवीन पक्ष काढला आहे. लोकांना काम करणारा नेता हवा आहे त्यामुळे राज्यातून अनेक जण माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्यास इच्छुक आहेत असे नारायण राणे शुक्रवारी म्हणाले. पक्ष स्थापनेनंतर नारायण राणे यांनी कोल्हापूरातून महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे.  आज संध्याकाळी कोल्हापूरात नारायण राणे जाहीरसभा घेणार आहेत. त्यातून ते पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट करतील. 

आज पत्रकारांशी बोलताना त्यांना शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. कोल्हापूरात आपल्याला शिवसेनेच्या आमदारांची संख्या शुन्य करायची आहे असे नारायण राणे म्हणाले. उध्दव ठाकरे यांना राजकारण कळत का?, उध्दव ठाकरे यांना कोणत्याही खात्याची माहिती नाही. उध्दव ठाकरे यांना सरकारचे पटत नसेल तर घटस्फोट का घेत नाही ? सरकार बरोबर नाक घासत तीन वर्षे काढली नाना पटोलेकडून काहीतरी घ्यावे असा टोला त्यांनी उद्धव यांना लगावला. 

विधानपरिषदत पोटनिवडणुकीत मत फुटणारच होती असे नारायण राणे म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जण आपल्या संपर्कात आहेत असेही त्यांनी सांगितले. नाना पटोलेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताना म्हणाले कि, नाना पटोलेंनी कुठे जाव, काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा माझ्या पक्षाशी काहीही संबंध नाही. ते आधीपासूनच भाजपावर नाराज होते असे नारायण राणे म्हणाले. सरकारवर जनता नाराज असेल तर आम्ही जनते बरोबर राहू असे त्यांनी सांगितले. माझा पक्ष लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणार असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकील्ला आहे. मुलाचा राजीनामा हा त्याच नुकसान ठरेल असे राणे म्हणाले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे